Skip to main content

17-24 Dec 2018

माझा विदेशी नाताळ 
यंदाचा नाताळ क्रॅनडात साजरा करायला मिळणार म्हणून मी खूश होतो. आता इतके मित्र-मैत्रिणी झालेत म्हणजे चार-पाच ठिकाणी तरी जेवणाची आमंत्रणं मिळणार म्हणून मी आधीपासूनच दात घासून बसलो होतो. पण कसचं काय! िख्रास्मसमध्ये (म्हणे) इथं लांबच्या माणसांना फारसं जवळ करत नाहीत. म्हणजे `तसं' जवळ करतात. भरपूर गळामिठ्या आणि पाप्यांसह मला शुभेच्छा मिळाल्या. पण गळयात दोन हात टाकले तरी घरापासून मात्र आपल्याला चार हात लांब टाकतात. एकतर माझे बरेच मित्र-मैत्रिणी सडेफटिंग राहात होते, त्यामुळे तेच कुठे ना कुठे - बहुतांशी आईवडिलांच्या किंवा बायकोच्या गावाला जाणार होते. आणि तसाही नाताळ हा प्रामुख्यानं कुटुंबीय आणि गट्टीतल्या फॅमिली फ्रेंडस्बरोबर साजरा केला जातो. त्याउलट पुढच्या आठवड्यात येणारी वर्षाखेर हा सार्वजनिक उत्सव असतो. रोषणाई, आतषबाजी, एकमेकांकडे येणं-जाणं वगैरे. तेव्हा नाताळमध्ये फक्त आईवडील, बहीणभाऊ - मुलं - नातवंडं एवढंच! एरवी चार दिशांना तोंडं असल्यामुळं त्यांना ह्या कौटुंबिक संमेलनाचंही अप्रुप असतं.
आपल्याकडच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मला इथला नाताळ अगदीच `सुना सुना' वाटला. `घराघरांवर वस्त्र तोरणे' असाही काही प्रकार नव्हता. पिचत कुठेतरी खिडक्यांवर दिव्यांच्या माळा पाकपुक करत होत्या, पण अपवादानंच! बाजारपेठा आणि मॉल्समधली सजावट मात्र कल्पकतेचे सगळे निकष पार करणारी होती. डोळयाचं पारणं फिटावं अशी!
आपणच आपला धर्म सोडलाय. सगळे िख्र्चाश्न कसे इमाने इतबारे श्रद्धेने चर्चमध्ये जातात अशी ओरड बऱ्याचदा आपल्याकडे ऐकू येते. ते काही फारसं खरं नाही. नाताळच्या दिवशी नवे कपडे-बिपडे घालून लोक सहकुटुंब चर्चमध्ये जातात ही गोष्ट खरी आहे. पण त्यापैकी `चर्चमध्ये जातात' यापेक्षा `नवे कपडे घालून' हे जास्त महत्त्वाचं आहे. पापभीरूपणे, मुलांना माहिती व्हावं म्हणून, किंवा केवळ संस्कारांमुळे `देखल्या िख्र्तास दंडवत' घालणारेच जास्त! गोऱ्यांवरचा धर्माचा पगडा कमी झाल्यामुळे की काय कोण जाणे, पण बऱ्याच चर्चमध्ये धर्मगुरू किंवा त्यांच्या प्रभावळीमध्ये गोऱ्यांपेक्षाही जास्त काळयांचा, विशेषत: आफ्रिकन लोकांचा जास्त भरणा होता...भक्तगणातही तेच!
एकदा रस्त्यात चाललेलं एक शूटींग बघताना तिथल्या एका स्वयंसेविकेशी ओळख होऊन तिने मला नाताळच्या एका संगीत कार्यक्रमाची प्रवेशपत्रिका दिली होती. ते शूटींग त्या कार्यक्रमासंबंधीचंच होते. त्यामुळं मी आवर्जून कार्यक्रमाला गेलो. शिवाय नाताळच्या दिवशी मला चर्चमध्ये जायची उत्सुकता होतीच.
चर्चमधली स्वच्छता आणि टापटीप तशी एरवीही वाखाणण्यासारखं असते. मग िख्रास्मसच्या दिवशी तर विचारायलाच नको. खांबाखांबावर पुष्पगुच्छ आणि मेणबत्त्यांची आरास केली होती. विजेच्या माळांपेक्षा ज्योत थरथरणारा मेणबत्तीचा प्रकाश जास्त जिवंत वाटत होता. त्या वातावरणात चर्चच्या प्रशस्त सभागृहात घुमणारा तो घनगंभीर घंटानाद, ते ऑर्गनचे स्वर आणि शंभरेक माणसांनी एका सुरात म्हणलेली ती िख्र्तास्जन्माची गाणी अंगावर रोमांच आणणारी होती. बधिर कर्ण करणारे कर्कश्श कर्णे लावून केल्यामुळे आपल्याकडे जन्माष्टमी किंवा दत्तजयंतीचे पाळणे ऐकवत नाहीत.
संगीत कार्यक्रमानंतर हौशी कलाकारांची एकांकिका होती. एका तथाकथित प्रतिष्ठित, श्रीमंत कलाकारांच्या नाटकाच्या तालमीत खायला मिळेल या आशेपोटी दोन उनाड भिकारी मुलं शिरतात. नाटकात काम करायला तयार होतात आणि हळूहळू मतपरिवर्तन होऊन दोन्ही गट मानवतेच्या पातळीवर एकत्र येतात असा प्रसंगाला साजेसा आशय होता. नाटकातल्या नाटकाच्या निमित्तानं येशूच्या जन्माची कथा त्यात गुंफली होती. कलाकार हौशी असूनही आपापली कामं चोख केली होती. लोकांकडून त्यांनी उस्फूर्त वाहवा मिळवली.
नाताळच्या रात्री बारा वाजता िख्र्तासचा जन्मोत्सव साजरा होतो. चर्चमध्ये खास प्रार्थना असतात असं ऐकून मी त्या रात्री सेंट जोसेफ ओरॅटरीमध्ये गेलो. गावापासून थोडी लांब, डोंगरउतारावर असणारी ती चर्चची इमारत आणि त्यावरचे घुमट प्रकाशझोतांच्या सजावटीमुळं निरभ्र आकाशात खुलून दिसत होते. आत मंद प्रकाश तेवत होते. अपेक्षेपेक्षा बरीच गर्दी जमली होती. हळूहळू ते सभागृह माणसांनी भरून गेलं.
थोड्या वेळानं त्यांच्या प्रार्थना सुरू झाल्या. माझी एक गडबड झाली होती. इकडे येताना ही चर्च फ्रेंच आहे हे मी डोक्यात घेतलं नव्हतं. अर्थात त्या प्रार्थना इंग्रजीत असल्या तरी जुन्या पद्धतीच्या इंग्रजीमुळं आणि संदर्भ माहिती नसल्यामुळं निम्मं शिम्मं डोक्यावरून गेलंच असतं. पण इथे तर सगळंच फ्रेंचमध्ये! नव्वदीच्या घरातले एक वृद्ध धर्मगुरू दर दोन मिनिटांनी उभं राहून काहीतरी सांगायचे आणि मग `ऊ..ऊ...ऊ' करून प्रार्थना सुरू व्हायची. अशी बरीच आवर्तनं झाली. मधूनच येणारे ऑर्गन आणि व्हायोलिनचे संमिश्र स्वर सोडले तर बाकी काही मनाला भिडणारं नव्हतं. तार सप्तकातली ती ऑपेरा पद्धतीची गाणी `जू बाळा जु जु रे' पैकीच होती. निदान ओव्यांच्या शब्दामधला ओलावा तरी जाणवतो. इथे भाषाही समजत नव्हती! ह्या नाताळमध्ये मला काहीच ताळतंत्र दिसेना. आजूबाजूला पाहिलं तर `माझिया जातीचे' बरेचजण दोन्ही तळव्यांमागे जांभया लपवत होते. ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्याची उगाच चेष्टा कशाला करा म्हणून मी उठून बाहेर आलो.
सभोवतीचा सारा आसमंत शांतपणे पहुडला होता. समोर पसरलेल्या शहरातले दिवे धुक्यातून वाट काढत मिणमिणत होते. `उतरली तारका दळे जणू नगरात' अशा त्या वातावरणात मला `त्या माजघरातील मंद दिव्याची वात' व्याकूळ करू लागली. दूरवर उठणारे ते व्हायोलीनचे कातर स्वर ऐकत मी टेकडी उतरायला सुरुवात केली.
-चारुदत्त आपटे, क्रॅनडा   ईमेल-charu_apte @gmail.com

स्मृती जयांची चैतन्यफुले
पुणे येथे गीताधर्ममंडळ हे गीताधर्माचा प्रसार करणारे मंडळ आहे. गीतादर्शन हे मासिकही येथूनच निघते. गीताधर्ममंडळाशी श्री.सदाशिवशास्त्री गोपाळराव भिडे यांचे नाव एकरूप झालेले आहे. आधुनिक काळातील ते `गीताधर्म संस्थापकच' म्हणाना! पूर्ण अंध असूनही प्रगाढ विद्वत्ता, अमोघ वक्तृत्वकला, महान लेखन, गीताधर्म मंडळाची संस्थापना, गीताधर्माचा प्रचार...सदाशिवशास्त्री अनेक क्षेत्रात अग्रेसर होते.
सदाशिवराव तथा बलवंतराव यांचा जन्म ५ डिसेंबर १८७६ या दिवशी झाला. जन्मस्थळ सांगली. १८८४मध्ये देवीची साथ सुरू झाली, सदाशिव तापाने फणफणला. छोट्या सदाशिवचे डोळेच गेेले! विद्या मिळविण्याकरता या अंध मुलाने कठोर परिश्रम केले. अंधत्व नक्की झाल्यावर काही महिन्यांतच सदाशिवाची मुंज करण्यात आली, शाळेत जाऊन शिकणे अशक्य होते. मग त्याला केवळ पठण करून येणारी वेदविद्या शिकविण्याचे ठरले. हरीपूर येथील वेदमूर्ती महादेवभट्ट गोडबोले यांच्या वेदपाठशाळेत त्याला घालण्यात आले.
भिकाजीपंत(मोठे बंधू) त्याला संस्कृत शब्द शिकवीत, गोष्ट वाचून दाखवीत. मातोश्री त्यांस घेऊन पुराण ऐकण्यास जात असत. सदाशिवच्या अंगी लहानपणापासून दोन विलक्षण गुण होते. एक धारणाशक्ती व दुसरे स्पर्शज्ञान. ओळखीची मंडळी घरी आली तर तो स्पर्शज्ञानाने ओळखत असे. हरीपुरातील सर्व रस्ते -त्यातील वळणांसह सदाशिवला अगदी पाठ होते. अमुक व्यक्तीच्या घरी जायचे असे सांगताच तो नेमका जाऊन उभा राहात असे. अंधपणाची अडचण जणू नाहीशीच झाली. केवळ वेदपठणाने त्यांच्या तेजस्वी बुद्धीचे समाधान झाले नाही. देशसेवकांच्या स्फूर्तिदायक चरित्रांच्या श्रवणाने सदाशिवची महत्वाकांक्षा प्रज्वलित झाली.
वाटवेशास्त्री यांनी सदाशिवला प्रथम रघुवंश व नंतर मेघदूत काव्य शिकविले. सदाशिवचे अध्ययन शेवटपर्यंत चालू होते. डोळे नसताना इतकी विद्वत्ता संपन्न केली याचे कारण लक्षपूर्वक ऐकणे व मनन करणे, हेच ज्ञानग्रहणाचे साधन होते. इतके शिक्षण होईतो, तो १७-१८ वर्षांचा झाला होता.
१९०४मध्ये तासगावास आल्यावर त्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केली. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या ४० झाली. बी.ए., एम.ए.चे विद्यार्थीही आपल्या शंका निरसन करून घेण्याकरिता तेथे येत. श्रीमद्भगवद्गीतेचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल होता. निष्काम कर्मे करण्याचाच गीतेचा संदेश आहे, गीतेने संन्यासाऐवजी कर्तव्यकर्मावर जोर दिलेला आहे, असे सदाशिवशास्त्रींचे मत होते.
त्यानंतर लोकमान्य टिळकांचा प्रख्यात ग्रंथ गीतारहस्य प्रसिद्ध झाला. लोकमान्यानी गीतेचा कर्मयोगपर अर्थ लावला होता. शास्त्रीबुवांना फार आनंद झाला. त्यांनी लगेच, लोकमान्यांचा अर्थ दृढ करण्यासाठी रहस्यदीपिका नामक ग्रंथ लिहिला आणि हस्तलिखित पुण्याला लोकमान्यांकडे पाठविले. जुन्या पठडीतला शास्त्री ठामपणे आपल्या पाठीशी उभा राहतो, हे पाहाताच लोकमान्याना फार फार आनंद झाला. पुण्याला गायकवाड वाड्यात या दोघा कर्मयोग्यांची १०-१२ दिवस चर्चा झाली. प्रतिदिनी ४-५ तास चर्चा चाले. लोकमान्यानी शास्त्रीबुवांचे बहुतेक शब्दार्थ मान्य केले. १९३२मध्ये ही रहस्य-दीपिका प्रकाशित झाली.
शास्त्रीबुवांचा विवाह झाला होता. तासगावच्या श्री.भिकंभट देवधरांची कन्या या त्यांच्या पत्नी, सासरचे नाव गंगाबाई. पाच मुले वारली, १९१५मध्ये पत्नीही वारल्या. शास्त्रीबुवा गीता-वेदान्त पचविलेले खरे कर्मयोगी होते. ९ डिसेंबर १९३९ रोजी शास्त्रीबुवांचे देहावसान झाले.
-सु.ह.जोशी, पुणे
फोन नं.-९९२२४१९२१०

अंगारक चतुर्थी
मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस अंगारक चतुर्थी , अंगारिका किंवा अंगारकी असे म्हणण्याचा प्रघात आहे. अेरवीच्या संकष्टीप्रमाणेच या पूर्ण दिवशी अुपवास करतात, चंद्रोदयाला अुपवास सोडतात.
मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे महत्व सांगणारी कथा गणेशपुराणात (अुपासना खंड, अध्याय ७४) सांगितली आहे. भारद्वाज मुनीना भूमीपासून, जास्वंदीच्या फुलासारखा लाल पुत्र झाला. त्याचे नाव भौम. योग्य समयीं मुनींनी त्यास उपदेश करून गणेशाचा शुभ मंत्र दिला. इंद्रियांचे नियमन करून मनामध्ये हेरंबाचे ध्यान करीत त्याने परममंत्राचा(एकाक्षरी) नर्मदातीरी जप केला. माघ वद्य चतुर्थीला मंगळवारी दशभुज गणपतीने त्यास दर्शन दिले. गणेशाने त्यास वर देताना म्हटले की, ही तिथी सर्व संकटांचे हरण करणारी व व्रत करणाऱ्या इष्टफल देणारी होईल. हे भौमा, तू देवांसह अमृत प्राशन करशील व जगामध्ये `मंगल' या नावाने प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे व पृथ्वीपुत्र असल्याने तुला `अंगारक' असे म्हणतील' अशा रीतीने भौमाने - मंगलाने अंगारकाने केलेली संकष्टी चतुर्थी `अंगारक चतुर्थी' या नावाने प्रसिद्ध झाली.
समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे वसलेलं हे गणरायाचे स्वयंभू देवस्थान प्रसिद्ध आहे. सागरकिनारा स्वच्छ ठेवण्याची येथील प्रशासनानं जणू शपथच घेतली आहे. पश्चिम किनाऱ्यावर वसलेले गणपतीपुळे अत्यंत रम्य आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळयाचे स्थान प्राचीन आहे. या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी वाङ्मयात पश्चिमद्वार देवता या नावाने सांगितलेला आहे. हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वारदेवता आहेत. त्यांपैकी गणपतीपुळयातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे.
मोगलाईच्या काळात (सुमारे इ.स.१६००च्या पूर्वी) डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होेते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे राहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी. संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन, असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य. भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले, सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोताना सांगितला. त्यांनी तत्काळ त्या परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले.
गणपतीपुळे हे नाव कसे पडले? या गावात फारशी वस्ती नव्हती. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग वाळूचा आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा सिंधुसागर. त्या लगतचे गाव मंगलमूर्तीने आपल्या निवासस्थानाला योग्य असे पाहून समुद्रकिनारी निवास केला आहे. सुमद्रापुढे पुळणीच्या(वाळूच्या) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले.
गणपतीपुळे हे तसं शांत, निसर्गसंपन्न. लाल मातीत वसलेली छोटी छोटी खेडी, रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगर्द झाडी आणि समोर सोनेरी वाळूतला समुद्र. गणपतीपुळयाची वाळू चमचमणारी आणि सोनेरी आहे. समुद्र सोनेरी वाळूचा असला तरी तो धोकादायक आहे. या समुद्राचे पाणी प्रवाही असून अनेक ठिकाणी भोवरे आहेत. समुद्रही समतल नाही; तशी माहिती देणारा बोर्डही तेथे लावलेला आहे. सुरक्षारक्षक आहेत.
निसर्गदर्शन आणि देवदर्शन या दोन्ही कारणांनी गणपतीपुळे येथे लोकांची गर्दी वाढत आहे.
***

आजारापासून आश्चर्यकारक सुटका
काही दिवसांपूर्वी आपल्या अंकात मधुमेहावरील संशोधनासंबंधी दीक्षित यांचा लेख आला होता. अलिकडे औषधांच्या आणि आरोग्याच्य बाबतीत जाहिरातबाजी सुरू असते, त्यातून खरे काय नि खोटे काय यांविषयी गोंधळ अुडतो. माझा अनुभव मुद्दाम कळवतो -
मला २००६ साली हिरडीदुखी सुरू झाली. भयंकर ठणक्यामुळे जीव नकोसा झाला. दाढदुखी समजून प्रथम दंतवैद्याकडे गेलो. जवळची दाढ काढली, पण दुखण्यात फरक पडला नाही. तोंड अुघडता येत नव्हते, बोलता येत नव्हते. फक्त पातळ द्रवपदार्थ तोंडाच्या डाव्या कोपऱ्यातून घ्यावा लागे. हळूहळू चमच्याने घोट घेत राहायचे. अेरवी दिवसभर ठणका चालूच.
कोल्हापूरच्या प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांचा पत्ता घेअून त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या आजाराची पूर्ण माहिती घेअून हा मज्जातंतूचा आजार आहे असे सांगितले. लाखात अेखाद्यालाच तो होतो, अशीही पुस्ती जोडली. आवश्यक वाटणारे अेक्सरे फोटो घेतले, औषधे दिली. सुरुवातीला ८गोळया, मग ६, नंतर ४, आणि पुढे जिवंत असेतोवर रोज २गोळया घ्याव्या लागतील असे म्हणाले. घरी कणकवलीला परत आलो, पण दुखणे सुरूच होते. पुन्हा कोल्हापूर गाठले. तशा तीन फेऱ्या झाल्या. शल्यक्रिया करण्याबाबत मी विचारले, तर डॉक्टरांचे म्हणणे पडले की मज्जातंतूंच्या संबंधी शल्यक्रिया करणे फार धोक्याचे ठरेल. शिवाय माझे वय पासष्टीचे,  त्यामुळे तो नाद सोेडून दिला. काही दिवस त्रास सोसला,  पण पुन्हा तेही असह्य वाटू लागले. सावंतवाडी तालुक्यातील अेका डॉक्टरांना भेटलो. त्यांनी तेच निदान केले, तीच औषधे दिली, प्रमाणही तेच!
दहा वर्षे मी हा त्रास सहन केला. २०१६ सालापर्यंत सुमारे ६५हजार रुपये गेले, या दरम्यान १५साली मी साखर तपासून घेतली, तीवरून मधुमेह आहे हे नक्की झाले. आमच्या घरात कुणाला हा  आजार आजवर नव्हता, तो कसला मज्जातंतूचा आजार तर लाखात अेक..... तो आमच्याकडे मुक्कामाला आला. आता मधुमेहावर गोळया सुरू झाल्या. घरात दोनदा कडमडून पडलोही.
माझ्या घरात कोणी नसायचे, सारे आापापल्या ठिकाणी अुद्योगात. दुखणे सहन करण्याशिवाय करणार काय? या हतबलतेत असताना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१६मध्ये कणकवलीचेच परशुराम साधले यांची भेट झाली. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले, व्यायामप्रेमी. त्यांनी योगगुरू रामदेवबाबाच्या आश्रमात २१ दिवसांची शिबिरे दोनदा केली आहेत. मुळातच त्यांना योगाची आवड आणि सराव होता, आता  ते योगतज्ज्ञ म्हणायला हवेत. त्यांनी मला  माझ्या घरी येअून पतंजली योगविद्येची माहिती दिली. माझे जीवन जादूची कांडी फिरल्यासारखे बदलून गेले. त्यांचे अुपकार या जन्मी फिटणार नाहीत अशी आता माझी भावना झाली आहे.
हाताच्या बोटांपासून करंगळीपर्यंत आणि मनगटापासून साऱ्या बोटांना सतत घर्षण (चोळणे) करीत राहण्याची कला त्यांनी शिकवली. या सात क्रिया दोन्ही हातांवर आळीपाळीने सोयसवड मिळेल तेव्हा, फावल्या वेळी करायच्या. पायावरही तसेच घर्षण करायचे. पाणी पिण्याची पद्धत, शक्य तर अेरंडेल चपातीला लावून खाण्याची रीत असे काही अन्य अुपचारही त्यांनी सांगितले, ते सगळे सहज सोपे होते. ते करू लागल्यापासून हळूहळू कमी होत, गेल्या दोन वर्षांत माझे दुखणे पार पळूनच गेले. आितकेच नाही, तर मधुमेह नाहीसा झाला. कोणत्याही ऋतूत आता थंड गरम पाण्याने कसेही तोंड धुतो, चावताना काही त्रास नाही. शौचाला साफ होते.
निराशा संपली, जगण्याचा अुत्साह आला. त्यापूर्वी ६५हजाराचा खर्च झाला होता, पण या अुपायात कवडीचाही खर्च झाला नाही. आता मला ७६वय आहे, कोणतीही गोळी घेत नाही. काही काळ मी आजारी होतो हे विसरून गेलो म्हटल्यास चालेल. परंतु त्या वेदना विसरता येत नाहीत. आणि आज ८२ वर्षांचे असलेले योगगुरू परशुराम साधले यांनाही विसरता येणार नाही. ते आजही त्यांच्या मोटरसायकलने फिरत असतात. त्यांना धनाची कोणतीही अपेक्षाच नाही हे अर्थातच वेगळे सांगायला हवे असे नाही.
-नारायण ल.आपटे, रामनगर कणकवली 
फोन : ९४०३० ९९९८७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन