Skip to main content

Mr.' I '

मिस्टर `आय'
एका शहरात चार मित्र गप्पा मारत चालले होते. त्यांंची नावे होती मिस्टर नोबडी, समबडी, एनीबडी आणि एव्हरीबडी! या चौघांच्या पुढे एक व्यक्ती जात होती तिचे नाव होते मिस्टर निग्लिजंट! हे साहेब रस्त्याने चालताना केळी खाऊन त्याची साल रस्त्यातच फेकत होते. मागे चालणाऱ्या चौघांना हे मुळीच आवडलं नाही. रस्त्यात साली टाकणंं योग्य नाही याबद्दल चौघाचं एकमत होतं. पण चौघांपैकी एकहीजण मि.निग्लिजंटना तसे सांगण्यास तयार नव्हता वा केळीची साले स्वत: उचलणे त्यांना मान्य नव्हते. साली उचलणेबाबत त्यांची चर्चा चालली होती.
१) समबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले `हे काम क्षुल्लक आहे. एनीबडी क्रॅन डू इट!'
२) एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी म्हणाले, `समबडी हॅज टू डू धीस जॉब!'
३) नोबडी, एनीबडी, समबडी यांचं म्हणणं होतं, `एव्हरीबडी हॅज टू डू धीस वर्क!'
४) नोबडी पुटपुटला, `हू अॅम आय? आय एम नोबडी!'
सारांश - केळयांची साले रस्त्यात पडली होती. हे चारजण फक्त चर्चा करीत होते. या चौघांचे  मागून जी व्यक्ती येत होती तिचे नाव `मि.आय' होते. मि.आय या चौघांची चर्चा ऐकत होते. ते चौघांना म्हणाले, ``वेल, जंटलमेन, मी तुमची चर्चा ऐकतोय. तुमची कृतीपेक्षा चर्चेवर जास्त भक्ती दिसतेय. मला कृती करणे आवडतं आणि मुख्य म्हणजे ही केळयाची सालं उचलणं मला सहज शक्य आहे.'' असं म्हणून मि.आय यांनी केळयाची सालं उचलून रस्त्यालगत कचराकुंडीत टाकली.
ही गोष्ट माझ्या वाचनात आल्यावर मी अनेकवेळा `मि.आय' झालो आहे. सुरुवातीला संकोच वाटत असे पण आता अंगवळणी पडलंय! माझ्यासमोर रस्त्यात कोणी थुंकलं, कचरा टाकला तर व्यक्तीची `अवस्था' बघून मी मि.आयच्या भूमिकेत शिरतो. किमान जाणीव तरी देतो. प्रत्येक वेळी सर्वांना आवडतेच असे नाही पण माझे वास्तव्य असलेले पर्यटनशहर स्वच्छ राखणे माझे कर्तव्य आहे. या कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो.
- म. त्र्यं. घारपुरे, सावंतवाडी
(भ्रमणध्वनी - ९४२२३८१७८०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...