गुन्हेगार प्रतिनिधी
सध्या ५४७ खासदारांपैकी २७४ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लिली थॉमस या व्यक्तीने या भयंकर वस्तुस्थितीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. या केसमध्ये संविधानातील कलम ८(४) ला आव्हान दिले आहे. फाली नरिमन हे लिली थॉमस यांचे वकील आहेत. हे कलम काय सांगते?
एखाद्या सामान्य माणसाने (सध्याच्या परिभाषेत आम आदमीने) गुन्हा केल्याचे शाबित झाले तर तुरुंगातून सुटलेल्या तारखेपासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढता येणार नाही. पण लोकप्रतिनिधीला मात्र या ८(४) कलमान्वये वेगळा न्याय आहे. या कलमाने गुन्हा शाबित होऊनही त्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्याला गुन्हेगार ठरविता येणार नाही.
गुन्हेगार लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या या सुरक्षाचक्रामुळे गुन्हेगारांची लोकसभा अशी कुख्याती आपल्या लोकसभेची झाली आहे आणि काठावरच्या बहुमतामुळे अशा लोकप्रतिनिधींची मदत घेऊनच सत्ताधारी पक्ष राज्य करीत आहे ही भयावह स्थिती नरीमन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून दिली आहे.
सर्वांना समान न्याय या तत्त्वाला या कलम ८(४) मुळे धक्का पोहोचतो तेव्हा त्याचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे मत न्यायमूर्ती पटनाईक व मिश्रा यांनी व्यक्त केले असून केंद्राला आपले मत कळवण्यासाठी नोटीस दिली आहे.
आता तरी गुन्हेगार लोकप्रतिनिधींची लोकसभेतून हकालपट्टी होणार काय?
- अशोक तेलंग, सांगली
जात जन्माधारी
`चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्वा गुणकर्म विभागश:' असे जरी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये घोषित केले असले तरी महाभारत काव्यामध्येसुद्धा जन्मावरूनच वर्ण ठरत असे दिसते. याचे उत्तम उदाहरण कर्णाचे आहे. भगवान परशुरामांनी जरी त्याला गुणावरून क्षत्रिय ठरविले असले तरी कर्णाने `दैवायत्तंं कुले जन्म । मदायत्तं तु पौरुषम्' हे उद्गार काढले.ते `गुणकर्मविभागश:' याच्या उलट वाटतात. शेवटपर्यंत तो सूतपुत्र मानला गेला. श्रीकृष्णांना त्याचे जन्मरहस्य माहीत होते तरी त्यांनी युद्धामध्ये त्याला सूतपुत्र म्हणूनच संबोधले, मृत्यूपर्यंत तो सूत्रपुत्रच राहिला. जाती व वर्ण, हे गुण आणि कर्मावरून महाभारत काव्यामध्येसुद्धा ठरत नसावेत, तर जन्मावरूनच ठरत असे दिसते. म्हणून गुणकर्मविभागश: हे नुसते उच्चारण आहे. प्रत्यक्षाचरण नाही, असे म्हणायचे.
गुण कर्मावरून वर्ण कसे निश्चित केले जात असत? किंवा ते करणारी अशी कोणती यंत्रणा होती? वेदकाळापासून किंवा वेदकाळी हे काही ज्ञात नाही; आज उपलब्ध नाही. आज तर जन्मावरूनच जाती ठरतात, हे नक्की. म्हणून `गुणकर्मावर वर्ण किंवा जाती ठरतात' हे काही वर्णव्यवस्थेचे समर्थन होऊ शकत नाही. जन्मावरून वर्ण किंवा जाती ठरणे कसे योग्य किंवा अयोग्य, हा प्रश्न येथे अप्रस्तुत. आजसुद्धा सरकार दरबारी जो जातीचा दाखला मिळतो, तो जन्माच्या आधारावरच. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील वचनानुसार नाही!
जाणकारांनी यावर मार्गदर्शन करावे.
- र. ग. दांडेकर
आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१
सध्या ५४७ खासदारांपैकी २७४ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लिली थॉमस या व्यक्तीने या भयंकर वस्तुस्थितीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. या केसमध्ये संविधानातील कलम ८(४) ला आव्हान दिले आहे. फाली नरिमन हे लिली थॉमस यांचे वकील आहेत. हे कलम काय सांगते?
एखाद्या सामान्य माणसाने (सध्याच्या परिभाषेत आम आदमीने) गुन्हा केल्याचे शाबित झाले तर तुरुंगातून सुटलेल्या तारखेपासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढता येणार नाही. पण लोकप्रतिनिधीला मात्र या ८(४) कलमान्वये वेगळा न्याय आहे. या कलमाने गुन्हा शाबित होऊनही त्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्याला गुन्हेगार ठरविता येणार नाही.
गुन्हेगार लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या या सुरक्षाचक्रामुळे गुन्हेगारांची लोकसभा अशी कुख्याती आपल्या लोकसभेची झाली आहे आणि काठावरच्या बहुमतामुळे अशा लोकप्रतिनिधींची मदत घेऊनच सत्ताधारी पक्ष राज्य करीत आहे ही भयावह स्थिती नरीमन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून दिली आहे.
सर्वांना समान न्याय या तत्त्वाला या कलम ८(४) मुळे धक्का पोहोचतो तेव्हा त्याचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे मत न्यायमूर्ती पटनाईक व मिश्रा यांनी व्यक्त केले असून केंद्राला आपले मत कळवण्यासाठी नोटीस दिली आहे.
आता तरी गुन्हेगार लोकप्रतिनिधींची लोकसभेतून हकालपट्टी होणार काय?
- अशोक तेलंग, सांगली
जात जन्माधारी
`चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्वा गुणकर्म विभागश:' असे जरी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये घोषित केले असले तरी महाभारत काव्यामध्येसुद्धा जन्मावरूनच वर्ण ठरत असे दिसते. याचे उत्तम उदाहरण कर्णाचे आहे. भगवान परशुरामांनी जरी त्याला गुणावरून क्षत्रिय ठरविले असले तरी कर्णाने `दैवायत्तंं कुले जन्म । मदायत्तं तु पौरुषम्' हे उद्गार काढले.ते `गुणकर्मविभागश:' याच्या उलट वाटतात. शेवटपर्यंत तो सूतपुत्र मानला गेला. श्रीकृष्णांना त्याचे जन्मरहस्य माहीत होते तरी त्यांनी युद्धामध्ये त्याला सूतपुत्र म्हणूनच संबोधले, मृत्यूपर्यंत तो सूत्रपुत्रच राहिला. जाती व वर्ण, हे गुण आणि कर्मावरून महाभारत काव्यामध्येसुद्धा ठरत नसावेत, तर जन्मावरूनच ठरत असे दिसते. म्हणून गुणकर्मविभागश: हे नुसते उच्चारण आहे. प्रत्यक्षाचरण नाही, असे म्हणायचे.
गुण कर्मावरून वर्ण कसे निश्चित केले जात असत? किंवा ते करणारी अशी कोणती यंत्रणा होती? वेदकाळापासून किंवा वेदकाळी हे काही ज्ञात नाही; आज उपलब्ध नाही. आज तर जन्मावरूनच जाती ठरतात, हे नक्की. म्हणून `गुणकर्मावर वर्ण किंवा जाती ठरतात' हे काही वर्णव्यवस्थेचे समर्थन होऊ शकत नाही. जन्मावरून वर्ण किंवा जाती ठरणे कसे योग्य किंवा अयोग्य, हा प्रश्न येथे अप्रस्तुत. आजसुद्धा सरकार दरबारी जो जातीचा दाखला मिळतो, तो जन्माच्या आधारावरच. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील वचनानुसार नाही!
जाणकारांनी यावर मार्गदर्शन करावे.
- र. ग. दांडेकर
आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१
Comments
Post a Comment