Skip to main content

Lok Kya Boltat

गुन्हेगार प्रतिनिधी
सध्या ५४७ खासदारांपैकी २७४ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लिली थॉमस या व्यक्तीने या भयंकर वस्तुस्थितीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. या केसमध्ये संविधानातील कलम ८(४) ला आव्हान दिले आहे. फाली नरिमन हे लिली थॉमस यांचे वकील आहेत. हे कलम काय सांगते?
एखाद्या सामान्य माणसाने (सध्याच्या परिभाषेत आम आदमीने) गुन्हा केल्याचे शाबित झाले तर तुरुंगातून सुटलेल्या तारखेपासून सहा वर्षे त्याला निवडणूक लढता येणार नाही. पण लोकप्रतिनिधीला मात्र या ८(४) कलमान्वये वेगळा न्याय आहे. या कलमाने गुन्हा शाबित होऊनही त्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्याला गुन्हेगार ठरविता येणार नाही.
गुन्हेगार लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या या सुरक्षाचक्रामुळे गुन्हेगारांची लोकसभा अशी कुख्याती आपल्या लोकसभेची झाली आहे आणि काठावरच्या बहुमतामुळे अशा लोकप्रतिनिधींची मदत घेऊनच सत्ताधारी पक्ष राज्य करीत आहे ही भयावह स्थिती नरीमन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून दिली आहे.
सर्वांना समान न्याय या तत्त्वाला या कलम ८(४) मुळे धक्का पोहोचतो तेव्हा त्याचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचे मत न्यायमूर्ती पटनाईक व मिश्रा यांनी व्यक्त केले असून केंद्राला आपले मत कळवण्यासाठी नोटीस दिली आहे.
आता तरी गुन्हेगार लोकप्रतिनिधींची लोकसभेतून हकालपट्टी होणार काय?
- अशोक तेलंग, सांगली


जात जन्माधारी
`चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्वा गुणकर्म विभागश:' असे जरी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये घोषित केले असले तरी महाभारत काव्यामध्येसुद्धा जन्मावरूनच वर्ण ठरत असे दिसते. याचे उत्तम उदाहरण कर्णाचे आहे. भगवान परशुरामांनी जरी त्याला गुणावरून क्षत्रिय ठरविले असले तरी कर्णाने `दैवायत्तंं कुले जन्म । मदायत्तं तु पौरुषम्' हे उद्गार काढले.ते `गुणकर्मविभागश:' याच्या उलट वाटतात. शेवटपर्यंत तो सूतपुत्र मानला गेला. श्रीकृष्णांना त्याचे जन्मरहस्य माहीत होते तरी त्यांनी युद्धामध्ये त्याला सूतपुत्र म्हणूनच संबोधले, मृत्यूपर्यंत तो सूत्रपुत्रच राहिला. जाती व वर्ण, हे गुण आणि कर्मावरून महाभारत काव्यामध्येसुद्धा ठरत नसावेत, तर जन्मावरूनच ठरत असे दिसते. म्हणून गुणकर्मविभागश: हे नुसते उच्चारण आहे. प्रत्यक्षाचरण नाही, असे म्हणायचे.
गुण कर्मावरून वर्ण कसे निश्चित केले जात असत? किंवा ते करणारी अशी कोणती यंत्रणा होती? वेदकाळापासून किंवा वेदकाळी हे काही ज्ञात नाही; आज उपलब्ध नाही. आज तर जन्मावरूनच जाती  ठरतात, हे नक्की. म्हणून `गुणकर्मावर वर्ण किंवा जाती ठरतात' हे काही वर्णव्यवस्थेचे समर्थन होऊ शकत नाही. जन्मावरून वर्ण किंवा जाती ठरणे कसे योग्य किंवा अयोग्य, हा प्रश्न येथे अप्रस्तुत. आजसुद्धा सरकार दरबारी जो जातीचा दाखला मिळतो, तो जन्माच्या आधारावरच. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील वचनानुसार नाही!
जाणकारांनी यावर मार्गदर्शन करावे.
- र. ग. दांडेकर
आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...