Skip to main content

mangal karyalaya in Miraj


मंगल  कार्यातील तीन व्यक्ती 
पन्नास-साठ वर्षांपूर्वीच ी मिरजेतील गोष्ट.  तीन माणसे  आमच्या घरी एक दिवस आली.
आमच्या वडिलांना सांगू लागली, ``काका, भिक्षुकीवर आता पोट भरत नाही. वाडवडिलांची शेती नाही.
उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे आता आम्हाला लाकडाच्या वखारीत जाऊनमण-दोन मण लाकडे
फोडून पैसे मिळवावे लागतील. तर आमचा चरितार्थ चालेल!'' हे त्यांचे बोलणे मी ऐकत होतो. आमच्याही घरी
भिक्षुकी होती. माझे थोरले भाऊ लष्करात नोकरीला असल्याने बाहेरून थोडे पैसे येत असत. पण त्या तीन
माणसांची मुले लहान असल्याने भिक्षुकीखेरीज दुसरे उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नव्हते.  एका प्रसंगाने
त्या तीन मंडळींनी आमच्याच गल्लीतील एका गरीब ब्राह्मण मुलाचे लग्नाचे  कार्य आपल्या हाती घेतले. अंगावर
सर्व जबाबदारी घेऊन ते पार पाडले आणि काय आश्चर्य! ह्या गरीब मुलाच्या रुपयांचा फायदा झाला!
यातूनच त्यलग्नाचे लग्नाच्या कार्यामधून तिघांना पन्नास मंगल कार्यालय काढण्याची कल्पना सुचली. नंतर लवकरच आमच्या गल्लीतील कृष्णेश्वराच् या मंदिरात हे कार्यालय चालू झाले. त्या कार्यालयाचे नाव `गजानन मंगल कार्यालय' त्यांच्या कार्यालयाचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागला. कधी एखाद्या दिवशी दोन कार्ये
त्यांना मिळू लागली. असे जवळजवळ पाच ते सहा वर्षे चालू राहिल्यावर ते तिघे वेगळे झाले. गजानन मंगल कार्यालय हे त्या कृष्णेश्वर मंदिरातच राहिले. एकाने दुसरे कार्यालय त्याच गल्लीत असलेल्या तुळसीदास बुवाच्या
मठामध्ये तर तिसरे कार्यालय तिसऱ्याने स्वत:च्या घरी चालू केले.तिघांची कार्यालये जोर पकडू लागली आणि
या तीन कार्यालयांमुळे तत्कालीन तरुणांना व गृहस्थांना कार्यालयामध्ये आणि जवळपास कामधंदा मिळू
लागला. स्त्रियांना वाढण्याचे कामतर पुरुषांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कामे मिळ ू लागली. भाजीविक्रेत्यांना उत्तम धंदा मिळाला, बॅन्डवाले व टांगेवाल्यांना धंदा मिळाला, ब्राह्मणांना दक्षिणा मिळू लागली. यांच्या कार्यालयांमुळ े मिरजेतील गवळयांचा, धान्य व्यापाऱ्यांचा व हलवायांचा व्यवसाय उत्तम प्रकारे होऊ लागला व
त्यांच्या उत्पन्नात भर पडली. ही तीन वैशिष्ट्यपूर्ण मंडळी पौष महिन्यात - जेव्हा लग्ने होत नाहीत त्यावेळी -
संपूर्ण भारतातून निरनिराळया शाखेचे वैदिक ब्राह्मण बोलावून आणून मोठमोठ्या यज्ञांचे आयोजन करीत. त्यामुळे गावोगावीचे विद्वान ब्राह्मण मिरजेत येत असत.हे तिघे ब्राह्मण व्यक्ती म्हणजे वेदशास्त्र संपन्न विष्णूपंत
आठवले, चिंतामणभट गोरे व त्रिंबकभट अभ्यंकर उर्फ काशीकर. ही तिन्ही मंडळी आज हयात नाहीत. त्यांचा दा
त्यांच्यापुढे यशस्वीपणे त्यांची मुले सांभाळत आहेत. आमच्या गल्लीतील या कार्यालयांत लग्नाचे  जिलबीच जेवण रूढ होते. त्यामुळे जिलेबी चौक नाव पडले. ती तीन कार्यालये म्हणजे - गोरे मंगल कार्यालय, काशीकर मंगल कार्यालय व गजानन मंगल कार्यालय. अडचणीच्या प्रसंगातही येणाऱ्या संधीचा योग्य वेळीच फायदा
घेतल्यास रंकाचा राव बनतो हे मला सांगावयाचे आहे. आता त्या भागात पुष्कळ कार्यालये झाली, त्यांना
आधुनिक रूपही मिळाले. पण त्या काळी सोलापूर-बेळगाव-कोकणातून केवळ लग्नकार्यासाठी या कार्यालयांकडे
लोक धावत असत, हे निर्विवाद आहे.
- डॉ.राम नेने,
(०२२-२८७३२९९०)
गोरेगाव, मुंबई
४०००६२

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...