मंगल कार्यातील तीन व्यक्ती
पन्नास-साठ वर्षांपूर्वीच ी मिरजेतील गोष्ट. तीन माणसे आमच्या घरी एक दिवस आली.
आमच्या वडिलांना सांगू लागली, ``काका, भिक्षुकीवर आता पोट भरत नाही. वाडवडिलांची शेती नाही.
उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे आता आम्हाला लाकडाच्या वखारीत जाऊनमण-दोन मण लाकडे
फोडून पैसे मिळवावे लागतील. तर आमचा चरितार्थ चालेल!'' हे त्यांचे बोलणे मी ऐकत होतो. आमच्याही घरी
भिक्षुकी होती. माझे थोरले भाऊ लष्करात नोकरीला असल्याने बाहेरून थोडे पैसे येत असत. पण त्या तीन
माणसांची मुले लहान असल्याने भिक्षुकीखेरीज दुसरे उत्पन्नाचे साधन त्यांच्याकडे नव्हते. एका प्रसंगाने
त्या तीन मंडळींनी आमच्याच गल्लीतील एका गरीब ब्राह्मण मुलाचे लग्नाचे कार्य आपल्या हाती घेतले. अंगावर
सर्व जबाबदारी घेऊन ते पार पाडले आणि काय आश्चर्य! ह्या गरीब मुलाच्या रुपयांचा फायदा झाला!
यातूनच त्यलग्नाचे लग्नाच्या कार्यामधून तिघांना पन्नास मंगल कार्यालय काढण्याची कल्पना सुचली. नंतर लवकरच आमच्या गल्लीतील कृष्णेश्वराच् या मंदिरात हे कार्यालय चालू झाले. त्या कार्यालयाचे नाव `गजानन मंगल कार्यालय' त्यांच्या कार्यालयाचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागला. कधी एखाद्या दिवशी दोन कार्ये
त्यांना मिळू लागली. असे जवळजवळ पाच ते सहा वर्षे चालू राहिल्यावर ते तिघे वेगळे झाले. गजानन मंगल कार्यालय हे त्या कृष्णेश्वर मंदिरातच राहिले. एकाने दुसरे कार्यालय त्याच गल्लीत असलेल्या तुळसीदास बुवाच्या
मठामध्ये तर तिसरे कार्यालय तिसऱ्याने स्वत:च्या घरी चालू केले.तिघांची कार्यालये जोर पकडू लागली आणि
या तीन कार्यालयांमुळे तत्कालीन तरुणांना व गृहस्थांना कार्यालयामध्ये आणि जवळपास कामधंदा मिळू
लागला. स्त्रियांना वाढण्याचे कामतर पुरुषांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कामे मिळ ू लागली. भाजीविक्रेत्यांना उत्तम धंदा मिळाला, बॅन्डवाले व टांगेवाल्यांना धंदा मिळाला, ब्राह्मणांना दक्षिणा मिळू लागली. यांच्या कार्यालयांमुळ े मिरजेतील गवळयांचा, धान्य व्यापाऱ्यांचा व हलवायांचा व्यवसाय उत्तम प्रकारे होऊ लागला व
त्यांच्या उत्पन्नात भर पडली. ही तीन वैशिष्ट्यपूर्ण मंडळी पौष महिन्यात - जेव्हा लग्ने होत नाहीत त्यावेळी -
संपूर्ण भारतातून निरनिराळया शाखेचे वैदिक ब्राह्मण बोलावून आणून मोठमोठ्या यज्ञांचे आयोजन करीत. त्यामुळे गावोगावीचे विद्वान ब्राह्मण मिरजेत येत असत.हे तिघे ब्राह्मण व्यक्ती म्हणजे वेदशास्त्र संपन्न विष्णूपंत
आठवले, चिंतामणभट गोरे व त्रिंबकभट अभ्यंकर उर्फ काशीकर. ही तिन्ही मंडळी आज हयात नाहीत. त्यांचा दा
त्यांच्यापुढे यशस्वीपणे त्यांची मुले सांभाळत आहेत. आमच्या गल्लीतील या कार्यालयांत लग्नाचे जिलबीच जेवण रूढ होते. त्यामुळे जिलेबी चौक नाव पडले. ती तीन कार्यालये म्हणजे - गोरे मंगल कार्यालय, काशीकर मंगल कार्यालय व गजानन मंगल कार्यालय. अडचणीच्या प्रसंगातही येणाऱ्या संधीचा योग्य वेळीच फायदा
घेतल्यास रंकाचा राव बनतो हे मला सांगावयाचे आहे. आता त्या भागात पुष्कळ कार्यालये झाली, त्यांना
आधुनिक रूपही मिळाले. पण त्या काळी सोलापूर-बेळगाव-कोकणातून केवळ लग्नकार्यासाठी या कार्यालयांकडे
लोक धावत असत, हे निर्विवाद आहे.
- डॉ.राम नेने,
(०२२-२८७३२९९०)
गोरेगाव, मुंबई
४०००६२
Comments
Post a Comment