Skip to main content

about post office


रजिस्टर्ड पत्रांचा पत्ता शोधण्याची जबाबदारी पोस्टाची
चेक न वटता बँकेतून परत आल्यास संबंधितांना नोटिस पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे. नोटिशीच्या पाकीटावर संपूर्ण व व्यवस्थित पत्ता लिहिल्यावर ही नोटीस पाठविण्याची कायदेशीर जबाबदारी संपुष्टात येते. अशी नोटीस रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवावी. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात `रजिस्टर्ड पत्र पोहोचविण्याबाबत सर्व प्रकारचे प्रयत्न संबंधित पोस्टमनने केलेच पाहिजेत' असे नमूद केले आहे. नुसते `पत्ता अपुरा, पत्ता सापडत नाही', `संबंधिताने पत्र स्वीकारण्यास नकार दिला', `घर सोडून गेले' अशा शेऱ्यांसह पोस्टमनला पत्र परत करता येणार नाही. त्याने शेजाऱ्यांकडे संबंधित व्यक्तीच्या नवीन पत्त्यासंबंधात चौकशी करून त्याचा नवीन पत्ता शोधून हे रजिस्टर पत्र त्याच्या नवीन पत्त्यावर दिले पाहिजे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही संबंधिताचा नवीन पत्ता न सापडल्यास त्या पोस्टमनने कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले याचा लेखी तपशील पोस्टमास्तरांना देणे न्यायालयाने बंधनकारक केले आहे.  असे प्रयत्न न केल्यास संबंधित पोस्टमनला जबाबदार धरून त्याच्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोस्टमास्तरांना दिले आहेत. संबंधित व्यक्ती फरार असेल तर नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांचा कालावधी संपताच निगोशिएबल इन्स्टुमेंट अॅक्टच्या कलम १३८ नुसार कारवाई करून त्या व्यक्तीस फरारी म्हणून घोषित करून कोर्ट त्या व्यक्तीची मालमत्ता जप्तीचे आदेश देते. पोस्टमनच्या कर्तव्याबद्दल न्यायालयाने दिलेल्या निकालावरून कोर्ट सरकारी सेवेला किती महत्त्व देते ते दिसून येते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ही नोटीस फॅक्सनेही पाठवता येते. त्या नियमात बँकेने चेक परत गेल्याचे कळविल्यापासून ३० दिवसांच्या आत नोटीस पाठविण्याचे बंधन असून पत्ता सापडेपर्यंतचा कार्यकाल मोजण्याचा प्रश्नच येत नाही.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन