Skip to main content

about pressure cooker


प्रेशर कुकरचा योग्य वापर
इंधन (गॅस) आणि वेळ वाचवून अन्न चांगले शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. पहिली व पुढील प्रत्येक शिटी होण्याच्या वेळी कुकरमध्ये दाबाखाली असलेल्या वाफेचे तापमान साधारणपणे ११५ अंश सेल्सियस असते. हे तापमान अन्न चांगले आणि कमी वेळात शिजण्यास मदत करते. ज्यावेळी आपण मुद्दाम शिटी किंवा शिट्ट्या करून इतक्या तापमानाची गरम वाफ बाहेर घालवितो, त्या प्रत्येक वेळी ही वाफ तयार करण्यास लागलेला गॅस आपण फुकट जाळत असतो. म्हणजेच तीन शिट्ट्या करावयास समजा दोन मिनिटे लागत असतील तर दिवसातून दोन वेळा म्हणजे चार मिनिटे म्हणजे महिन्याची १२० मिनिटे, म्हणजेच दोन तास कारण नसताना गॅस जळत असतो. कुकरवरील शिटी होण्याची सुविधा ही शिट्या `करण्यासाठी' नसून आपत्काळात त्या `होण्यासाठी'आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे.
प्रेशर कुकरचे कार्यतत्त्वच मुळी `दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे हा आहे' ज्यावेळी आपण शिट्या करून दाबाखालील गरम वाफ (ज्यामुळे अन्न लवकर शिजणार आहे) बाहेर घालवितो त्यावेळी आपण प्रेशर कुकरच्या कार्यतत्त्वाविरुद्ध (स्टीम अंडर प्रेशर) आणि `प्रेशर  कुकर' या नावाविरुद्ध कार्य करून तीन किंवा अनेक शिट्या होण्यासाठी जळणारा गॅस वाया घालवीत असतो. अवैज्ञानिकदृष्ट्या प्रेशर कुकरचा वापर केल्यास सर्वसाधारणपणे प्रत्येक सिलेंडरमागे २० टक्के गॅस फुकट जात असावा असा अंदाज आहे. म्हणजे प्रत्येक सिलिंडरमागे ८० रु.चा गॅस वाया जातो. गॅसवर मिळणाऱ्या सरकारी अनुदानासह देशपातळीवर विचार केल्यास हे नुकसान करोडो रुपयांत असावे.
हे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आपणाला वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त दाबाखालील गरम वाफेचा शिटी न करता उपयोग करणे हाच उपाय आहे. त्यासाठी खालील दोन बाबींवर आग्रहपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे -
१) नेहमीप्रमाणे कुकर लावा. परंतु सुरुवातीपासून गॅस एकदम बारीक म्हणजे सिमवर ठेवून अन्न शिजण्यास वेळ द्या.
२) अशा स्थितीत जेव्हा पहिली शिटी होईल असे वाटेल त्यावेळी, (शिटी होऊ न देता) गॅस बंद करा आणि नेहमीप्रमाणे खूप वेळानंतर कुकर उघडा.
कडधान्यासह कोणताही शाकाहारी पदार्थ पूर्णपणे शिजलेला मिळेल. मांसाहारी पदार्थांसाठी संबंधितांनी अनुभव घ्यावा. अन्नाच्या चवीत चांगला गुणात्मक फरक पडतो काय याकडे लक्ष ठेवा.
आपणाला वरील सर्व बाबतीत सकारात्मक फरक आढळल्यास देशहितासाठी आपला अनुभव इतरानंा सांगा.
- डॉ.जगदीश सदाशिव सरदेशपांडे, पुणे (मोबा.९२७०१०६०५०)
संकलन : जस्मिन केळकर

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन