स्वस्ति प्रजाभ्य: परिपालयन्ताम्
न्याय्येन मार्गेण महीं महीशा: ।
(सर्व प्रजाजन आनंदी राहोत. राज्यकर्त्यांनी प्रजेचा प्रतिपाळ समुचित रीतीनेच करावा.)
धर्मनिरपेक्षता नव्हे, अधर्म
स्व.राजीव गांधी यांच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा वास्तविक सौम्यच म्हणता येईल. अशा कांडातील गुन्हेगार पकडल्यानंतर तातडीने न्यायप्रक्रिया होऊन आरोप सिद्ध होत असेल तर त्यास चौकात उलटे टांगून..... परंतु हे केवळ अविवेकी चीड व्यक्त करणारे शब्द आहेत. ते प्रत्यक्षात येणे इथल्या सुसंस्कृत सभ्यतेला पेलणार नाहीत. म्हणून राज्यघटनेनुसार भारतीय कायद्यातील कठोरता फाशीपुरती मर्यादा गाठते. गुन्ह्यानंतर प्रदीर्घ काळ उलटल्यावर सुनावलेली फाशी अंमलात येण्याची गरज आहे. अशा वेळी तामीळनाडूतील विधानसभेने ठराव करून या फाशीच्या निर्णयास अडथळा आणला. गुन्हेगारांचे `तामीळत्त्व' आणि एलटीटीईशी लागेबांधे एवढ्यातून विधानसभेने हा ठराव केला आणि फाशीच्या अंमलबजावणीस स्थगिती आली. देव करो आणि तसे काही न होवो; - परंतु कसाबच्या फाशीला कश्मिरी मुस्लिम बहुल विधानसभेने किंवा ईशान्येच्या कोणा िख्र्चाश्न गुन्हेगारास नागा-मिझो विधानसभेने अभय मागितले तर आपली भूमिका काय असणार? - हा प्रश्न क्षोभ वाढवू शकतो.
यापूर्वी एकदा दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्तीची म्हणून सर्वत्र धूम उडवून देण्यात आली. वाट्टेल तसली पत्र्याची टोपणे लोकांनी पाच-सातशे रुपयांना घेतली. आजही तो कायदा तसाच आहे पण कोणी तरी खाल्ल्या पैशाचा ढेकर दिल्यावर अंमल मात्र अंमळ ढिला पडला. त्या धामधुमीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले की, हेल्मेट सक्तीमधून शिख लोकांना सूट दिली जाते कारण त्यांच्या डोक्यावर फेटा असतो. मग त्याच (अ) न्यायाने कोल्हापुरी फेटा व राजस्थानी वा कच्छी पागोटे बांधणाऱ्या माणसांना सूट का नाही? हा प्रश्न निरर्थक ठरतो कारण इथे निरपेक्षतेच्या ढांेगाने उघडपणी धर्मसापेक्ष राज्यकारण चालते.
हिंदुत्त्ववाद हाच मुळात मनाची क्षितिजे विस्तारणारा, मानवतेवर आधारित समाजाची संकल्पना साकारू पाहणारा विशालहृदयी विचार आहे. समुत्कर्षासाठी प्रयत्नशील असणाऱ्या त्या विचाराने उदारमतवाद स्वीकारला, अतिरेक नव्हे. या मानवी कर्तव्य प्रणालीस हिंदूधर्म मानले. या देशातील विशाल परंपरा व वैविध्य यांतून उत्क्रांत झालेले असोत, आक्रमण-अतिक्रमणातून आलेले असोत किंवा स्थलांतर-संकरातून निर्माण झालेले असोत; येथे अनेक धर्म-जाती-पंथ-संप्रदाय अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी कुणीही इथून बाहेर हाकलला जाऊ शकत नाही अथवा जर्मनी-पाकिस्तानने केले तसे अत्याचारी हत्त्याकांडही होऊ शकत नाही. जे लोक भारतात - किंवा कोणत्याही राष्ट्नत - स्थायिक आहेत त्यांना परस्पर सौहार्दाचे प्रयत्न करीत एकत्रच नांदावे लागेल. कोणाला काहीही वाटले तरी ही अपरिहार्यता लक्षात घेऊनच या देशाची घटना तयार केली गेली. परंपरा, वर्तमान स्थिती आणि भावी विकास यांचा साकल्याने विचार करून धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत सामुदायिक सहजीवनासाठी संमत करण्यात आला.
परंतु तेव्हापासूनच ही निरपेक्षता म्हणजे केवळ अहिंदू धर्मीयांचे स्वार्थी लाड करणे इतकाच अर्थ राजकारणी सत्ताबहाद्दरांनी लावला. प्रशासन, शिक्षण, सुव्यवस्था, समाजस्वास्थ्य, मानव्यशास्त्रे अशा सगळया क्षेत्रांत निव्वळ ढोंगबाज धर्म-जातिकारण बोकाळले आहे. इस्लामी किंवा िख्र्तासी, यहुदी, बौद्ध मंगोलियन वगैरे धर्मपंथीय देशांतून तसे सापेक्ष धर्मकारण चालतेच. काळेगोरे व शिया सुन्नी ही भांडणे तेथे असतात. पण भारतातही आता धर्मनिरपेक्षतेचे वैशिष्ट्य सांगण्यापुरतेच शिल्लक राहून प्रत्यक्ष राजकीय व्यवस्था मात्र अहिंदूंच्या बाजूने स्पष्ट झुकल्याचा प्रत्यय येतो. या विरोधात `समान नागरी कायदा' मागितला जातो. पण त्यासही बऱ्याचदा धार्मिक भेदाभेदाचा वास येत असतो. कायदा एकच असला पाहिजे तो लष्करी असो वा नागरी. त्यात धर्माचा विचार होऊच नये. मुस्लिमांना काय `मिळते' आणि हिंदू `वंचित' राहतात असला विचारच या देशात प्रगट होता कामा नये, तरच ती निरपेक्षता. इथे मात्र तुलना होते ती यांचा गणपती अन् त्यांचा िख्रास्मस वा ईद!! इथे निरपक्षतेऐवजी भेद व उच्चनीचता बहुसंख्येच्या आधारे मोजल्या जातात. त्यातून तामीळी विधानसभेचा बेगुमानपणा प्रगट झाला आहे.
जी माणसे व त्यांचे पक्ष धर्मनिरपेक्षता `मिरवतात' ती हिंदुद्वेषी म्हटली जातात, इतके त्यांचे एकांगीपण असते. लालू काय अन् मुलायम-करात-मायावती ही स्वत: हिंदू माणसे आहेत. राजकीय अभिलाषेतून ती अन्यधर्मीयांना चुचकारत असतात. त्यांना हिंदुत्त्व आणि निरपेक्षता यांच्याशी कर्तव्य नाही ही परिस्थिती आहे. त्यांच्या स्वार्थाला धुमारे फुटले की मग शाहू-आंबेडकर काय अन् कसाब-एलटीटी काय सगळेच धार्जिणे!! ही स्वार्थांधता आहे - हे लोक स्वार्थनिरपेक्ष होऊ शकत नाहीत. परंतु नरेंद्र मोदींच्या मागे सतत कायद्याचे शुक्लकाष्ठ लावून बेजार करायचे अन् अफझल, कसाब किंवा तमीळ वाघांची शिक्षा टोलवीत राहायचे ही धर्मनिरपेक्षता किंवा अन्यायाविषयी भीरुता नव्हे, ते आेंगळ राजकारण व भोंगळ अराजक आहे. त्यात कोणतीही धर्मनिरपेक्षता नसून उघड अधर्म आहे.
***
Comments
Post a Comment