Skip to main content

RUKHWAT


काळानुसार रुखवत
नुकताच माझ्या मुलीचा विवाह पार पडला. माझी मुलगी चि.मानसी सध्या अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्नॅईड येथील थरूपश डींरींश णपर्ळींशीीळींू मध्ये डॉक्टरेटचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. तिचा विवाह २३ डिसेंबर २०१२ ला ठाणे येथे संपन्न झाला. आमचे जावई अमित श्रीधर जोशी यांनीसुद्धा त्याच युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. मिळवली आहे व सध्या ते वॉशिंग्टन डी.सी.येथील छरींळेपरश्र खपीींर्ळींीींश ेष कशरश्रींह मध्ये पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास करीत आहेत. या विवाहानिमित्त मांडलेल्या वेगळया रुखवताची माहिती द्यावीशी वाटते.
मराठीत रुखवत म्हणून प्रचलित असलेल्या अपभ्रंश शब्दाचा मूळ शब्द आहे `रक्षावत'! प्राचीन काळी रक्षावतामध्ये देव, शास्त्र, शस्त्र, अन्न आणि वस्त्र देण्याची प्रथा होती. संसार निर्वेध व्हावा म्हणून `देव', कुटुंबाच्या संरक्षणासाठी `शस्त्र', संसार संपन्न व्हावा यासाठी `शास्त्र' आणि ऐहिक गरजा भागवण्यासाठी `अन्न' व `वस्त्र' अशा सर्व वस्तू नवपरिणित दांपत्याला देत असत. जसजसे सामाजिक स्थित्यंतर होत गेले तसतसे रक्षावतात विविध खाद्यप्रकार, कलाकुसरीच्या वस्तू, गृहोपयोगी साधने ठेवण्याचा प्रघात सुरू झाला. सध्याच्या इंटरनेट मायाजालाच्या संगतीतील नवीन पिढीची प्रतिनिधी असलेली `मानसी' ही `वाचनवेड्या' तरुणाईचीही प्रतिनिधी आहे. लहानपणापासून पुस्तकांचे वेड असलेली मानसी सतत पुस्तके जमवत गेली व अधाशीपणाने वाचत गेली. तिच्या या वाचनप्रेमामुळे आम्ही संपूर्णपणे पुस्तकांचे रुखवत मांडले. त्यात भगवद्गीतेपासून श्यामची आई, प्रकाशवाटापर्यंत अनेक पुस्तकांचा समावेश होता. त्यामध्ये कादंबऱ्या, आत्मचरित्रे, कवितासंग्रह व प्रवासवर्णनांना स्थान होते. इरावती कर्वे, गोनीदा, पुल, अनिल अवचटांपासून राजन गवस, भीष्म सहानी यांच्यापर्यंत सर्व नव्या-जुन्या पुस्तकांचा समावेश केला होता. विवाहानिमित्ताने हा उपक्रम खूपजणांना पाहता आला व स्तुत्य वाटला.
- सदानंद विनायक व मीनल सदानंद,  सी/२१, सत्य अपार्टमेंट, नौपाडा, ठाणे (प.)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...