आठवा तो काळ
`आपले जग' ३४ वर्षपूर्ती अंक मिळाला. एखादे औद्योगिक संस्थान, पक्ष किंवा पुढारी, संघटना पाठीशी नसतानाही प्रदीर्घ काळ दर्जेदार लिखाण घेऊन वाचकापुढे जाण्याचे अवघड काम, सर्वहिताचा विशाल दृष्टिकोन ठेवून हे व्रतपत्र तुम्ही चालू ठेवले आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील मुकुंदराव किर्लोस्कर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण, भरीव योगदान असताना त्यांच्या निधनाची वार्ता ठळक न देता कुठेतरी एका कोपऱ्यात इतर वृत्तपत्रांनी दिलेली पाहून, त्यांच्यावर संपादकीय लेख वगैरेही नाही हे पाहून खेद झाला.
`माझे शिक्षक आणि मी' हा श्री.नसीराबादकरांचा लेख आवडला. त्यांनी उल्लेखलेल्या शिक्षकांपैकी गुरुवर्य डॉ.शं.गो.तुळपुळे यांचाच लाभ मला झाला. दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विभागप्रमुख होते. त्यावेळी मी त्या कॉलेजात होते.
माझे वडील उच्च विद्याविभूषित, जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर - एम.ए. होते. पण सनातनी वृत्ती. स्नानसंध्या, सोवळेओवळे कडक पाळणारे होते. आमच्या घरी रोज चार-पाच माधुकरी, तसेच दोन-तीन वारकरी (म्हणजे गरीब मुले एकेक दिवस एकेक घरी जेऊन शिक्षण घेत त्यातील) जेवायला असत शिवाय आंधळे पांगळे भिकारीही यायचे. सणावारी घरी येणाऱ्या कामवाल्यांना ताटे वाढून देत असत. तर मेहेतर (भंगी) यालाही भरगच्च पान वाढून त्यावर दक्षिणा ठेवून आमचे वडील स्वत: उभे राहून हात जोडून, त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याला पान देत असत. तो अगदी संकोचून म्हणायचा, ``अवो, तुमी बामणदेवता. मस नमस्कार करताव'' तर वडील म्हणायचे, ``अरे बाबा, तुझे ऋण कधी फिटणार नाही. आई जे लहानपणी करायची ते तू माझ्या मोठेपणी करतोस.'' हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. आमच्या आईची ही एक आठवण. (मागे तुम्ही `ऐसी कळवळयाची जाती' असा लेख लिहिला होता - तीच तऱ्हा) आमची आई स्वत: शिळी पोळी (म्हणजे आदल्या दिवशीचीच) घ्यायची आणि भिकाऱ्याला ताजी वाढायची आणि म्हणायची `शिळी खाऊन त्याचे पोट दुखले तर त्याला औषध कोण देईल?' `दया धर्म का मूल है ।', `पुण्य परउपकार' ही तत्त्वे त्यांनी आचरून शिकवली. वडीलांचा आणखी नियम म्हणजे स्वदेशीच वापरणे. सूत काढणे, खादी वापरणे इ. साखर विलायती असल्यामुळे कित्येक वर्षे आमच्या घरात साखर नव्हती. अशा तऱ्हेने देशभक्ती त्यांनी आम्हाला शिकवली.
`पानिपत संग्राम - हार से जीती बाजी' हे तुंबळ लढाईचे वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. मराठ्यांची विजिगीषा अवर्णनीय आहे. धर्मापेक्षा देशाला मानणारे आणि त्याउलट धर्मासाठी देशाला उध्वस्त करणारे! कुरुक्षेत्र, पानिपत हे दोन्ही भूप्रदेश जवळजवळच आहेत आणि ही भूमी रक्ताला चटावलेली आहे. एक कविता पुसटशी आठवते -
कौरव पांडव संगर तांडव द्वारकाली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत
लढले पानपती ।
पानिपतचे वैशिष्ट्य म्हणजे परकी आक्रमणापासून देश वाचवण्यासाठी मराठे शर्थीने लढले आणि त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी देशाला वाचवले म्हणून हा जयच म्हणायचा. आणखी एक गोष्ट, ब्राह्मण लोक इतके लढवय्येही असतात (पेशवे) आश्चर्य वाटते. पूर्वीही द्रोणाचार्य वगैरे होतेच. (ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्यांनी याचीही जाण ठेवावी.) पेशव्यांचे वंशज पुण्यात आहेत आणि मला आनंद वाटतो की ते माझ्या जावयांचे सख्खे मामा आहेत.
- सुधा आपटे,
`राधाई', कोर्टामागे, नृसिंह मंदिराजवळ,
किल्ला भाग, मिरज ४१६४१०
`आपले जग' ३४ वर्षपूर्ती अंक मिळाला. एखादे औद्योगिक संस्थान, पक्ष किंवा पुढारी, संघटना पाठीशी नसतानाही प्रदीर्घ काळ दर्जेदार लिखाण घेऊन वाचकापुढे जाण्याचे अवघड काम, सर्वहिताचा विशाल दृष्टिकोन ठेवून हे व्रतपत्र तुम्ही चालू ठेवले आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील मुकुंदराव किर्लोस्कर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण, भरीव योगदान असताना त्यांच्या निधनाची वार्ता ठळक न देता कुठेतरी एका कोपऱ्यात इतर वृत्तपत्रांनी दिलेली पाहून, त्यांच्यावर संपादकीय लेख वगैरेही नाही हे पाहून खेद झाला.
`माझे शिक्षक आणि मी' हा श्री.नसीराबादकरांचा लेख आवडला. त्यांनी उल्लेखलेल्या शिक्षकांपैकी गुरुवर्य डॉ.शं.गो.तुळपुळे यांचाच लाभ मला झाला. दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विभागप्रमुख होते. त्यावेळी मी त्या कॉलेजात होते.
माझे वडील उच्च विद्याविभूषित, जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर - एम.ए. होते. पण सनातनी वृत्ती. स्नानसंध्या, सोवळेओवळे कडक पाळणारे होते. आमच्या घरी रोज चार-पाच माधुकरी, तसेच दोन-तीन वारकरी (म्हणजे गरीब मुले एकेक दिवस एकेक घरी जेऊन शिक्षण घेत त्यातील) जेवायला असत शिवाय आंधळे पांगळे भिकारीही यायचे. सणावारी घरी येणाऱ्या कामवाल्यांना ताटे वाढून देत असत. तर मेहेतर (भंगी) यालाही भरगच्च पान वाढून त्यावर दक्षिणा ठेवून आमचे वडील स्वत: उभे राहून हात जोडून, त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याला पान देत असत. तो अगदी संकोचून म्हणायचा, ``अवो, तुमी बामणदेवता. मस नमस्कार करताव'' तर वडील म्हणायचे, ``अरे बाबा, तुझे ऋण कधी फिटणार नाही. आई जे लहानपणी करायची ते तू माझ्या मोठेपणी करतोस.'' हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. आमच्या आईची ही एक आठवण. (मागे तुम्ही `ऐसी कळवळयाची जाती' असा लेख लिहिला होता - तीच तऱ्हा) आमची आई स्वत: शिळी पोळी (म्हणजे आदल्या दिवशीचीच) घ्यायची आणि भिकाऱ्याला ताजी वाढायची आणि म्हणायची `शिळी खाऊन त्याचे पोट दुखले तर त्याला औषध कोण देईल?' `दया धर्म का मूल है ।', `पुण्य परउपकार' ही तत्त्वे त्यांनी आचरून शिकवली. वडीलांचा आणखी नियम म्हणजे स्वदेशीच वापरणे. सूत काढणे, खादी वापरणे इ. साखर विलायती असल्यामुळे कित्येक वर्षे आमच्या घरात साखर नव्हती. अशा तऱ्हेने देशभक्ती त्यांनी आम्हाला शिकवली.
`पानिपत संग्राम - हार से जीती बाजी' हे तुंबळ लढाईचे वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. मराठ्यांची विजिगीषा अवर्णनीय आहे. धर्मापेक्षा देशाला मानणारे आणि त्याउलट धर्मासाठी देशाला उध्वस्त करणारे! कुरुक्षेत्र, पानिपत हे दोन्ही भूप्रदेश जवळजवळच आहेत आणि ही भूमी रक्ताला चटावलेली आहे. एक कविता पुसटशी आठवते -
कौरव पांडव संगर तांडव द्वारकाली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत
लढले पानपती ।
पानिपतचे वैशिष्ट्य म्हणजे परकी आक्रमणापासून देश वाचवण्यासाठी मराठे शर्थीने लढले आणि त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी देशाला वाचवले म्हणून हा जयच म्हणायचा. आणखी एक गोष्ट, ब्राह्मण लोक इतके लढवय्येही असतात (पेशवे) आश्चर्य वाटते. पूर्वीही द्रोणाचार्य वगैरे होतेच. (ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्यांनी याचीही जाण ठेवावी.) पेशव्यांचे वंशज पुण्यात आहेत आणि मला आनंद वाटतो की ते माझ्या जावयांचे सख्खे मामा आहेत.
- सुधा आपटे,
`राधाई', कोर्टामागे, नृसिंह मंदिराजवळ,
किल्ला भाग, मिरज ४१६४१०
Dear all It was known yo me that your Paper is 34 years old A great accomplishment.I had also organised a magazine KURLA SANCHAR was registered between 2002 to 2007 But after shifting fron Kurla to Thane I stopped its publication.
ReplyDelete