Skip to main content

About Nayaran Apte


प्रा.नारायण आपटे यांची उल्लेखनीय कामगिरी

बंगळूर येथे झालेल्या `एम.सी.यू.डिझाइन कॉन्टेस्ट' या राष्ट्नीय स्तरावरील स्पर्धेत सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे प्रा.नारायण आपटे यांनी अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. टेक्सास इन्स्ट्रुमेंटस या अमेरिकी कंपनीने अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती. संशोधकांना प्रोत्साहन व त्यांच्या सृजनशीलतेला आवाहन करून त्याचा उपयोग इलेक्ट्नॅनिक्स तंत्रज्ञानात व्हावा याकरिता ही स्पर्धा होती. पहिल्या फेरीसाठी देशभरातून १२०० स्पर्धक समूह होते. त्यातील १२० स्पर्धकांची निवड झाली. अंतिम फेरीत बारा स्पर्धकांमध्ये प्रा.आपटे व प्रा.माने यांच्या उपक्रमाची निवड करण्यात आली. बेंगलोर येथे १२ स्पर्धक समूहांची स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रा.आपटे व प्रा.माने यांच्या उपक्रमास ७०० अमेरिकी डॉलरचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. अंतीम फेरीमधील बहुसंख्य स्पर्धक महाराष्ट्नतील होते.
प्रा.आपटे व प्रा.माने यांनी `बॅलन्सिंग मशीन'साठी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली सादर केली होती. सदर संशोधनाचे पेटंट घेण्याचा त्यांचा मानस आहे. प्रा.आपटे पंधरा वर्षे वालचंद अभियांत्रिकीच्या विद्युत विभागात अधिव्याख्याता असून त्यांनी पीएच.डी.साठी प्रबंध सादर केला आहे.

- नारायण गंगाधर आपटे (मोबा.९३७२८२४४५५, ९८२२५३९१७९)
०३, पेठभाग, गणपती मंदिराजवळ, सांगली

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...