लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्ट
स्वातंत्र्याआधीच्या सिंध भूमीतील लुल्ला कुटुंब फाळणीनंतर भारतात आले. त्यापैकी श्री.तोताराम भोजराज (टीबी) लुल्ला हे परिस्थितीपरत्वे सांगलीत स्थायिक झाले. करसल्लागार पेशातून त्यांनी प्रपंच सावरला, कुटुंबाला चांगले दिवस आले. त्यांचा मुलगा श्री.किशोर यांनी त्या व्यवसायात प्रगती केली आणि इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आणि समरस होऊन भागही घेतला. त्यातूनच एकंदर सामाजिक स्थितीचे आकलन त्यांना होऊ शकले. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्नेही कार्यकर्त्यांशी सातत्याने होणारे विचारमंथन यातून वेगळया दिशेने चालण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यांच्याही पुढची पिढी आता व्यवसायात आल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करण्यासाठी कुटुंबाचा न्यास (ट्न्स्ट) स्थापन झाला.
श्री.टी.बी.लुल्ला यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी श्रद्धादिन म्हणून समाजाप्रती रु.२५ लाखाची अर्घ्यदानाची आेंजळ अर्पण करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने ती ओतत राहावी ही इच्छा व्यक्त करताना लुल्ला परिवार पुढे म्हणतो -
`आम्हा कुटुंबियांच्या मनातील कृतज्ञता भाव जाणून घेऊन आपण अर्घ्यदानाची पहिली आेंजळ समाजप्रवाहात एकत्रितपणे अर्पण केली होती. आम्हावरच्या ऋणांचा भार त्या आेंजळीतून काहीसा हलका करावा, अशी त्यावेळी कल्पना होती. परंतु पहिले अर्घ्य प्रवाही पडण्यामुळे समाजऋण अद्यापि शिल्लक राहिल्याचे जाणवून स्वत:चेच रितेपण लक्षात आले. म्हणून मग आमच्या ती.डॅडींच्या स्मृतिदिनानिमित्त तशीच आणखी एक आेंजळ समाजाप्रती अर्पण करावी, असे योजिले आहे. आप्तस्वकीय मित्रपरिवारांसह आम्हा कुटुंबियांच्या वतीने ही आेंजळ आपण समर्पित करूया. समाजात अनेक सेवाभास्कर कार्यरत आहेत. त्यांना हे अर्घ्य देण्यासाठी आपण सहभागी होऊन ऋणानुबंध दृढ करावेत.
उद्दिष्ट आणि कार्यपद्धती
`अर्घ्यदान' उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. त्या आेंजळीची व्याप्ती क्रमाक्रमाने वाढत राहिली आहे. हा वार्षिक स्मृतिसमारंभ उत्सवी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्नेहशील कार्यकर्त्यांचा `परिवार' संघटित होऊन प्रत्येक पाऊल धीमे, सावध आणि दृढपणाने टाकत वाटचाल करत आहे.
कोणतीही संस्था किंवा न्यास यांच्यापुढे कार्य आचरणासाठी एक निश्चित उद्दिष्ट असते. कुणी अपंगांसाठी काम करते, कुणी महिलांसाठी, शिक्षणासाठी, रुग्णांसाठी, जित्याजागत्या मानव किंवा प्राण्यांसह चराचरासाठी स्वयंस्फूर्त सामाजिक कार्य चालत असते. लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टने आपल्याकरिता अशा विविध क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्था (एनजीओज) डोळयांपुढे ठेवल्या आहेत. या संस्था किंवा एकाण्डे कार्यकर्ते सामाजिक समस्या निवारणासाठी जिवापाड परिश्रम घेत असतात; परंतु त्यांच्यापुढेही समस्यांचे अडथळे उभे असतातच. परदु:खाचे निवारण करण्यासाठी स्वत:च्या अडचणींकडे डोळेझाक करावी लागते. `आपल्या घरी सगळी आबादीआबाद झाली तर त्यानंतर आता जरा दुसऱ्याला काही हातभार लावतो' असं कुणा कार्यकर्त्याला म्हणता येत नाही. उलट आपल्या घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा हा उद्योग अनेकांच्या टीकेचाही विषय होतो व त्याची सुरुवात काही वेळी घरापासून होते. या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या संस्थांच्या अडचणी हळूहळू विस्तारत जातात. निधीची टंचाई, मनुष्यबळाची त्रुटी, हिशेब व कार्यालयीन कामाचे अज्ञान, परस्पर अविश्वास व दुरावा, शासकीय नियमांचे बोचरे पिंजरे.... असे अनेक कंगोरे सामाजिक कामांतही त्रासाचे असतात. याशिवाय शासकीय यंत्रणा तर अशा `स्वयंस्फूर्त व सामाजिक' कार्याला आपल्या शैलीदार पद्धतीनुसार गुन्हेगारी मानून चालत असल्याचा अनुभव उद्वेग वाढवितो.
अशा सर्व परिस्थितीतून वाट काढण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी या संस्था व कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांची जिद्द जागती ठेवण्याचा प्रयत्न हा न्यास करीत आहे. या संस्थांच्या एकत्रीकरणाकरिता काही किमान समान कार्यक्रम द्यावा, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व्हावे, समस्यांची चर्चा व्हावी, एकत्र काम करण्याचा सराव असावा, सत्प्रवृत्तांचा संघटित दबावगट तयार व्हावा हा उद्देश लुल्ला ट्न्स्टसमोर आहे. अर्थातच या सेवाभास्करांना अर्घ्यदानाची अल्पशी आेंजळ यथाशक्तीने अर्पण करणे हे केवळ निमित्तमात्र. त्या कारणे स्वत:मधील विनम्र भावनाच या सेवाभास्करांना अर्पण करण्यात लुल्ला ट्न्स्टला धन्यता वाटते.
स्वातंत्र्याआधीच्या सिंध भूमीतील लुल्ला कुटुंब फाळणीनंतर भारतात आले. त्यापैकी श्री.तोताराम भोजराज (टीबी) लुल्ला हे परिस्थितीपरत्वे सांगलीत स्थायिक झाले. करसल्लागार पेशातून त्यांनी प्रपंच सावरला, कुटुंबाला चांगले दिवस आले. त्यांचा मुलगा श्री.किशोर यांनी त्या व्यवसायात प्रगती केली आणि इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आणि समरस होऊन भागही घेतला. त्यातूनच एकंदर सामाजिक स्थितीचे आकलन त्यांना होऊ शकले. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्नेही कार्यकर्त्यांशी सातत्याने होणारे विचारमंथन यातून वेगळया दिशेने चालण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यांच्याही पुढची पिढी आता व्यवसायात आल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करण्यासाठी कुटुंबाचा न्यास (ट्न्स्ट) स्थापन झाला.
श्री.टी.बी.लुल्ला यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी श्रद्धादिन म्हणून समाजाप्रती रु.२५ लाखाची अर्घ्यदानाची आेंजळ अर्पण करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने ती ओतत राहावी ही इच्छा व्यक्त करताना लुल्ला परिवार पुढे म्हणतो -
`आम्हा कुटुंबियांच्या मनातील कृतज्ञता भाव जाणून घेऊन आपण अर्घ्यदानाची पहिली आेंजळ समाजप्रवाहात एकत्रितपणे अर्पण केली होती. आम्हावरच्या ऋणांचा भार त्या आेंजळीतून काहीसा हलका करावा, अशी त्यावेळी कल्पना होती. परंतु पहिले अर्घ्य प्रवाही पडण्यामुळे समाजऋण अद्यापि शिल्लक राहिल्याचे जाणवून स्वत:चेच रितेपण लक्षात आले. म्हणून मग आमच्या ती.डॅडींच्या स्मृतिदिनानिमित्त तशीच आणखी एक आेंजळ समाजाप्रती अर्पण करावी, असे योजिले आहे. आप्तस्वकीय मित्रपरिवारांसह आम्हा कुटुंबियांच्या वतीने ही आेंजळ आपण समर्पित करूया. समाजात अनेक सेवाभास्कर कार्यरत आहेत. त्यांना हे अर्घ्य देण्यासाठी आपण सहभागी होऊन ऋणानुबंध दृढ करावेत.
उद्दिष्ट आणि कार्यपद्धती
`अर्घ्यदान' उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. त्या आेंजळीची व्याप्ती क्रमाक्रमाने वाढत राहिली आहे. हा वार्षिक स्मृतिसमारंभ उत्सवी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्नेहशील कार्यकर्त्यांचा `परिवार' संघटित होऊन प्रत्येक पाऊल धीमे, सावध आणि दृढपणाने टाकत वाटचाल करत आहे.
कोणतीही संस्था किंवा न्यास यांच्यापुढे कार्य आचरणासाठी एक निश्चित उद्दिष्ट असते. कुणी अपंगांसाठी काम करते, कुणी महिलांसाठी, शिक्षणासाठी, रुग्णांसाठी, जित्याजागत्या मानव किंवा प्राण्यांसह चराचरासाठी स्वयंस्फूर्त सामाजिक कार्य चालत असते. लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टने आपल्याकरिता अशा विविध क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्था (एनजीओज) डोळयांपुढे ठेवल्या आहेत. या संस्था किंवा एकाण्डे कार्यकर्ते सामाजिक समस्या निवारणासाठी जिवापाड परिश्रम घेत असतात; परंतु त्यांच्यापुढेही समस्यांचे अडथळे उभे असतातच. परदु:खाचे निवारण करण्यासाठी स्वत:च्या अडचणींकडे डोळेझाक करावी लागते. `आपल्या घरी सगळी आबादीआबाद झाली तर त्यानंतर आता जरा दुसऱ्याला काही हातभार लावतो' असं कुणा कार्यकर्त्याला म्हणता येत नाही. उलट आपल्या घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा हा उद्योग अनेकांच्या टीकेचाही विषय होतो व त्याची सुरुवात काही वेळी घरापासून होते. या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या संस्थांच्या अडचणी हळूहळू विस्तारत जातात. निधीची टंचाई, मनुष्यबळाची त्रुटी, हिशेब व कार्यालयीन कामाचे अज्ञान, परस्पर अविश्वास व दुरावा, शासकीय नियमांचे बोचरे पिंजरे.... असे अनेक कंगोरे सामाजिक कामांतही त्रासाचे असतात. याशिवाय शासकीय यंत्रणा तर अशा `स्वयंस्फूर्त व सामाजिक' कार्याला आपल्या शैलीदार पद्धतीनुसार गुन्हेगारी मानून चालत असल्याचा अनुभव उद्वेग वाढवितो.
अशा सर्व परिस्थितीतून वाट काढण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी या संस्था व कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांची जिद्द जागती ठेवण्याचा प्रयत्न हा न्यास करीत आहे. या संस्थांच्या एकत्रीकरणाकरिता काही किमान समान कार्यक्रम द्यावा, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व्हावे, समस्यांची चर्चा व्हावी, एकत्र काम करण्याचा सराव असावा, सत्प्रवृत्तांचा संघटित दबावगट तयार व्हावा हा उद्देश लुल्ला ट्न्स्टसमोर आहे. अर्थातच या सेवाभास्करांना अर्घ्यदानाची अल्पशी आेंजळ यथाशक्तीने अर्पण करणे हे केवळ निमित्तमात्र. त्या कारणे स्वत:मधील विनम्र भावनाच या सेवाभास्करांना अर्पण करण्यात लुल्ला ट्न्स्टला धन्यता वाटते.
Comments
Post a Comment