Skip to main content

Lekh on B. D. Tilak


डॉ.बी.डी.टिळक : स्थितीशी संघर्ष
कहाणी सुमारे १५० वर्षांपूर्वीची. एकत्र कुटुंबपद्धत होती. एकमेकांच्या मदतीला धावून जात. एका माऊलीचे यजमान चार लहान मुले पदरात असताना निवर्तले. माऊलीला भावाने आश्रय दिला. भावाला दोन लहान मुले होती. त्याच्या तिसऱ्या मुलाचा जन्म झाला पण दहा दिवसाचे आतच बाळंतीण भावजयीचे निधन झाले. माऊलीने आपल्या व भावाच्या परिवाराचा भार उचलला. माऊलीचे शेंडेफळ अंगावर पीत होते. माऊलीने नवजात अर्भकालाही स्वदूध देण्यास सुरुवात केली. दु:खी वातावरण असल्याने नवजाताचे बारसे झाले नाही. त्याला सर्वजण `बाळ'या नावाने संबोधू  लागले. `बाळ'ने स्वत:चे नाव बाळकृष्ण सांगण्यास सुरुवात केली. ही माऊली म्हणजे माझ्या आईची आई - माझी आजी.
बाळ अतिशय हुशार. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात उत्कृष्ट गुणांसह पदवी मिळविली आणि टाटांची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला प्रयाण केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळविली. त्यांचे सहाध्यायी डॉ.वुडवर्ड हे नोबेल प्राईझचे मानकरी होते. हे आमचे बाळमामा - डॉ.बी.डी.टिळक. भारताचे ललामभूत शास्त्रज्ञ. महान देशभक्त. परदेशात चांगल्या संधी असूनही आपल्या देशबांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून भारतात परतले. मुंबई विद्यापीठात असि.प्रोफेसर म्हणून रुजू झाले तेव्हा ते सायकलवरून जात असत. स्वकर्तृत्त्वावर पुण्याच्या राष्ट्नीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे डायरेक्टर झाले. ते कार्यरत असताना एन.सी.एल.ने रजतजयंती साजरी केली, त्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आल्या होत्या. डॉ.टिळक यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण झाले ते ऐकण्याचे मला भाग्य लाभले होते.
त्यांच्या मृत्यूप्रसंगीचे शल्य मला आजही टोचते. त्याचे असे झाले - त्यांची दुसरी हृदय शल्यक्रिया मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये झाली. तिथेच त्यांचे निधन झाले, त्याची वार्ता त्यांच्या पत्नी व मुलाला दुपारी तीन वाजता सांगण्यात आली. केसपेपरवर १२.३० ला निधन झाल्याची नोंद होती. सर्व सोपस्कार करून पार्थिव पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आले. डॉ.टिळकांच्या निवासस्थानी विद्यापीठातील व एन.सी.एल.मधील शास्त्रज्ञ वगैरे मोठमोठी मंडळी जमली होती. पार्थिवासह दुपारी १ च्या सुमारास `वैकंठ'ला पोचलो. दाहिनीचा वीजपुरवठा बंद होता. चौकशी करता सांगण्यात आले,`अर्ध्या तासाने वीजपुरवठा चालू होईल.' दोन-अडीच तास झाले तरी अर्ध्या तासाचे पालुपद सुरू होते.
मी वीजमंडळातून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त होतो, पण आता मला कोण ओळखणार? ऑपरेटर म्हणाला,``अजून परमिट आले नाही त्याशिवाय वीज चालू करता येणार नाही.'' ऑपरेटरने जोशीसाहेबांना फोन जोडून दिला. मी विचारले,``आपण सिस्टीम इंप्रुव्हमेंट सर्कलला होता काय? मी केळकर बोलतो आहे.'' मी परिस्थिती सांगितली. गेलेली व्यक्ती व जमलेल्या व्यक्तींचे थोरपण सांगून गांभीर्य कळविले. `ऑपरेटरला फोन द्या.'' जोशी म्हणाले. जोशीसाहेबांनी त्त्वरित सूत्रे हलविली. वीजपुरवठा सुरू झाला. सर्व मंडळी पार्थिव घेऊन दाहिनीजवळ थांबली होती. मी शेवटचे अभिवादन केले.
- दि. वि. केळकर
३२,श्रीलेखा सोसा.,कोथरुड, पुणे - ३८
फोन (०२०)२५४४६५५२, ९४०३७६९१६४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...