कोषातील संघटनकार्य
आपल्याकडे सामाजिक संघटना उदंड आहेत. त्यापैकी बऱ्याचशा निष्क्रीय आहेत, हे टोकाचे विधान बाजूला ठेवायला हवे, कारण सक्रीय असणाऱ्या संस्था-संघटनांची संख्याही कमी नाही. समाजातील प्रश्न लक्षात घेतले तर, ते सोडवू पाहणाऱ्या संस्था संघटनांची संख्या प्रश्नांच्या तुलनेत पुरेशी आहे असे निश्चितपणाने म्हणता येते. समस्या ज्या आणि जेवढ्या आहेत, त्यापेक्षा त्या जास्त भासविल्या जातात हे एक, आणि ज्या समस्यांवर उत्तर शोेधण्याचे उद्दिष्ट असतेे, ते बाजूलाच राहून दिशा भरकटते हे दुसरे निरीक्षण पटण्यासारखे आहे.
समस्या नाहीत असे नव्हे. पण त्यांचे नेमके आकलन करण्याची कुवत संघटकांत नसते. पर्यावरण ऱ्हास ही समस्या आहेच, पण हा ऱ्हास कशामुळे होतो हा वादविषय ठरतोे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी काय करायचे? - तर ज्येष्ठ नागरिक संघापासून अंगणवाडीतल्या पोरांपर्यंत सर्वांनी हातात फलक घेऊन `पर्यावरणाचे रक्षण । जाळू नका जळण ।' असले येडचाप उखाणे गात फेरी काढायची! याला जर जनजागृतीचे समाजकार्य म्हणायचे असेल तर कसले प्रश्न सुटणार! मुळात ज्या उद्देशाने संघटन करायचे ते उद्देश स्पष्ट हवेत, जे होतील ते प्रयत्न त्या उद्देशासाठीच व्हावेत, आणि त्यांची दिशा नेमकी असावी. इतके झाले तरी जी काय चार पावले पडायची, ती परिणामकारक होतील. बालकांना फुलपाखरांमागे धावायला, फुलांचा हार करायला आणि कैऱ्या काढायला शिकवावे यांमुळे पर्यावरण समजेल. ज्येष्ठ नागरिकांची संघटना करताना, उर्वरित निवृत्त आयुष्यात आनंद निर्माण व्हावा हे उद्दिष्ट असते. त्यात अनुभवांचे प्रसारण, चांगल्यासाठी प्रबोधन, पुढच्या पिढ्यांचे संस्करण ही कर्तव्ये आहेत. सांघिक रित्या ती करता यावीत. कोणा ज्येष्ठ संघाने नातवंडांसाठी गणित-विज्ञानाची तोंडओळख, स्तोत्रे, सोपे देशी खेळ यांसाठी सातत्याने प्रयत्न चालविल्याचे ऐकिवात नाही; परंतु स्वत:ची आरोग्यतपासणी, पेन्शनवाढ, हास्यक्लब किंवा सेकंड हनीमून हे चालू आहे.
संस्था-संघटनांचे उद्दिष्ट सतत डोळयापुढे नाचते ठेवले, आणि प्रत्येक कृतिकार्यक्रम त्याच्याशी ताडून पाहता आला तर, इतक्या संघटना असून समाजातील समस्या कमी का होत नाहीत याचे उत्तर सापडेल.
अलीकडे प्रत्येक ज्ञातिसंघटनासुद्धा सामाजिक कार्य करण्याचा आवेश आणते; पण ज्ञातिबांधवांचे सहभोजन किंवा वधुवर सूचक मंडळ यापुढे गाडी जात नाही. ज्ञातींची वा कुळांची संमेलने प्रारंभी २-३-४ ठीक होतात. त्यावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे, पुन्हा दरवर्षी जमू, निधी जमवू वगैरे संकल्प होतात. वास्तविक जिथे हजार दोन हजाराची किमान उपस्थिती असायला हवी, त्या कुलसंमेलनात शेपाऊणशेची संख्याही `प्रचंड प्रतिसादा'ची मानावी लागते. त्यातही परस्पर दृढ परिचयास प्राधान्य देण्याऐवजी सुश्राव्य कवितागायनास स्थान असते. सहभोजनावेळी शेजारी कोण बसले याची चौकशी न करता, दुपारचे सत्र संयोजकांवर सोपवून बाहेर पडले की आपण `संघटनेच्या माध्यमातून सामाजिक एकत्त्व साधले' असे वाटून घेत घर गाठावे!! संघटन प्रभावी कसे होणार; आणि प्रश्न कसे सुटणार?
आणखी एक नवी टूम म्हणजे, आहेत त्या संघटनांत दुफळी करून संघटनांची संख्या वाढविणे. निव्वळ अतिरेकी म्हणून काम करणाऱ्या संघटनासुद्धा कित्येक आहेत. मुजाहिद्दिन म्हणे, कायदा, तोयबा काय नि काय!! तशा दुफाळलेल्या संघटना कोब्रा कट्ट्यांपासून ब्रिगेडपर्यंत आहेत. फार कशाला! आजकालच्या विद्यापीठांमध्ये आपल्या हुशारीला न्याय मिळत नाही म्हणून स्वतंत्र विद्यापीठे काढू पाहणारे संघटन, उद्दिष्टांशी प्रामाणिक कसे म्हणावे हा पेच आहे.
याच अर्थ जे काही घडते आहे, जितके साध्य झाले आहे ते सर्व चूक, फुकट... असे मुळीच नव्हे. पण मूळ प्रश्न जर महाबिकट आहे असे वाटत असेल तर तो सोडविण्यासाठी केलेले हे संघटन इष्ट ते साध्य करू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याकरिता संघटन कोणतेही वा केवढेही असो त्याचे उद्दिष्टांच्या आधारे मूल्यमापन वेळोवेळी करायला हवे. कित्येक संस्था, कित्येक न्यास, कित्येक संघटना आज निष्क्रिय, निद्रिस्त, मृतप्राय आहेत. मोजायलाच गेलो तर त्यांची संख्या इतकी की, तीच एक समस्या ठरेल. एकाच गावात, एकाच गल्लीत तीन तीन गणपती बसतात तसाच तो प्रकार. त्यांतून साधते काय? - तर तिप्पट वर्गण्या, तिप्पट गोंगाट, तिप्पट खर्च आणि सांस्कृतिक एकतेची तिप्पट भांडणे!!
कुटुंबाचे, कुळाचे, ज्ञातीचे, शैक्षणिक संस्थेचे, विशिष्ट समाजगटाचे एकत्र येणे सामाजिक दृष्टीने निर्विवाद महत्त्वाचे आहे. पण त्यांविषयीच्या ओढाताणीतून उगीच मोठेपण कुरवाळत राहणे पुरेसे नाही. त्या त्या वयाला, पेशाला, विचाराला... एकूण भूमिकेला शोभेल अशा प्रत्येक कृतिकार्यक्रमांतून संघटनेच्या मूळ उद्दिष्टाकडे पाऊलभर पुढे जाणे घडायला हवे. तसे घडत राहिले तर समस्या कमी होतीलच पण सध्या अस्तित्त्वात आहेत तितक्या संस्था संघटनाही गरजेच्या राहणार नाहीत. उगीच `कृण्वतो विश्वमार्यम्' हे उद्दिष्ट उच्चारत सामुदायिक भोंडला आयोजित करावा, यात आनंद घेणाऱ्यांना विश्वाचा आवाका आणि आर्यत्त्वाचे सामर्थ्य माहीत नसावे इतके उघड होते.
आपल्याकडे सामाजिक संघटना उदंड आहेत. त्यापैकी बऱ्याचशा निष्क्रीय आहेत, हे टोकाचे विधान बाजूला ठेवायला हवे, कारण सक्रीय असणाऱ्या संस्था-संघटनांची संख्याही कमी नाही. समाजातील प्रश्न लक्षात घेतले तर, ते सोडवू पाहणाऱ्या संस्था संघटनांची संख्या प्रश्नांच्या तुलनेत पुरेशी आहे असे निश्चितपणाने म्हणता येते. समस्या ज्या आणि जेवढ्या आहेत, त्यापेक्षा त्या जास्त भासविल्या जातात हे एक, आणि ज्या समस्यांवर उत्तर शोेधण्याचे उद्दिष्ट असतेे, ते बाजूलाच राहून दिशा भरकटते हे दुसरे निरीक्षण पटण्यासारखे आहे.
समस्या नाहीत असे नव्हे. पण त्यांचे नेमके आकलन करण्याची कुवत संघटकांत नसते. पर्यावरण ऱ्हास ही समस्या आहेच, पण हा ऱ्हास कशामुळे होतो हा वादविषय ठरतोे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी काय करायचे? - तर ज्येष्ठ नागरिक संघापासून अंगणवाडीतल्या पोरांपर्यंत सर्वांनी हातात फलक घेऊन `पर्यावरणाचे रक्षण । जाळू नका जळण ।' असले येडचाप उखाणे गात फेरी काढायची! याला जर जनजागृतीचे समाजकार्य म्हणायचे असेल तर कसले प्रश्न सुटणार! मुळात ज्या उद्देशाने संघटन करायचे ते उद्देश स्पष्ट हवेत, जे होतील ते प्रयत्न त्या उद्देशासाठीच व्हावेत, आणि त्यांची दिशा नेमकी असावी. इतके झाले तरी जी काय चार पावले पडायची, ती परिणामकारक होतील. बालकांना फुलपाखरांमागे धावायला, फुलांचा हार करायला आणि कैऱ्या काढायला शिकवावे यांमुळे पर्यावरण समजेल. ज्येष्ठ नागरिकांची संघटना करताना, उर्वरित निवृत्त आयुष्यात आनंद निर्माण व्हावा हे उद्दिष्ट असते. त्यात अनुभवांचे प्रसारण, चांगल्यासाठी प्रबोधन, पुढच्या पिढ्यांचे संस्करण ही कर्तव्ये आहेत. सांघिक रित्या ती करता यावीत. कोणा ज्येष्ठ संघाने नातवंडांसाठी गणित-विज्ञानाची तोंडओळख, स्तोत्रे, सोपे देशी खेळ यांसाठी सातत्याने प्रयत्न चालविल्याचे ऐकिवात नाही; परंतु स्वत:ची आरोग्यतपासणी, पेन्शनवाढ, हास्यक्लब किंवा सेकंड हनीमून हे चालू आहे.
संस्था-संघटनांचे उद्दिष्ट सतत डोळयापुढे नाचते ठेवले, आणि प्रत्येक कृतिकार्यक्रम त्याच्याशी ताडून पाहता आला तर, इतक्या संघटना असून समाजातील समस्या कमी का होत नाहीत याचे उत्तर सापडेल.
अलीकडे प्रत्येक ज्ञातिसंघटनासुद्धा सामाजिक कार्य करण्याचा आवेश आणते; पण ज्ञातिबांधवांचे सहभोजन किंवा वधुवर सूचक मंडळ यापुढे गाडी जात नाही. ज्ञातींची वा कुळांची संमेलने प्रारंभी २-३-४ ठीक होतात. त्यावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे, पुन्हा दरवर्षी जमू, निधी जमवू वगैरे संकल्प होतात. वास्तविक जिथे हजार दोन हजाराची किमान उपस्थिती असायला हवी, त्या कुलसंमेलनात शेपाऊणशेची संख्याही `प्रचंड प्रतिसादा'ची मानावी लागते. त्यातही परस्पर दृढ परिचयास प्राधान्य देण्याऐवजी सुश्राव्य कवितागायनास स्थान असते. सहभोजनावेळी शेजारी कोण बसले याची चौकशी न करता, दुपारचे सत्र संयोजकांवर सोपवून बाहेर पडले की आपण `संघटनेच्या माध्यमातून सामाजिक एकत्त्व साधले' असे वाटून घेत घर गाठावे!! संघटन प्रभावी कसे होणार; आणि प्रश्न कसे सुटणार?
आणखी एक नवी टूम म्हणजे, आहेत त्या संघटनांत दुफळी करून संघटनांची संख्या वाढविणे. निव्वळ अतिरेकी म्हणून काम करणाऱ्या संघटनासुद्धा कित्येक आहेत. मुजाहिद्दिन म्हणे, कायदा, तोयबा काय नि काय!! तशा दुफाळलेल्या संघटना कोब्रा कट्ट्यांपासून ब्रिगेडपर्यंत आहेत. फार कशाला! आजकालच्या विद्यापीठांमध्ये आपल्या हुशारीला न्याय मिळत नाही म्हणून स्वतंत्र विद्यापीठे काढू पाहणारे संघटन, उद्दिष्टांशी प्रामाणिक कसे म्हणावे हा पेच आहे.
याच अर्थ जे काही घडते आहे, जितके साध्य झाले आहे ते सर्व चूक, फुकट... असे मुळीच नव्हे. पण मूळ प्रश्न जर महाबिकट आहे असे वाटत असेल तर तो सोडविण्यासाठी केलेले हे संघटन इष्ट ते साध्य करू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याकरिता संघटन कोणतेही वा केवढेही असो त्याचे उद्दिष्टांच्या आधारे मूल्यमापन वेळोवेळी करायला हवे. कित्येक संस्था, कित्येक न्यास, कित्येक संघटना आज निष्क्रिय, निद्रिस्त, मृतप्राय आहेत. मोजायलाच गेलो तर त्यांची संख्या इतकी की, तीच एक समस्या ठरेल. एकाच गावात, एकाच गल्लीत तीन तीन गणपती बसतात तसाच तो प्रकार. त्यांतून साधते काय? - तर तिप्पट वर्गण्या, तिप्पट गोंगाट, तिप्पट खर्च आणि सांस्कृतिक एकतेची तिप्पट भांडणे!!
कुटुंबाचे, कुळाचे, ज्ञातीचे, शैक्षणिक संस्थेचे, विशिष्ट समाजगटाचे एकत्र येणे सामाजिक दृष्टीने निर्विवाद महत्त्वाचे आहे. पण त्यांविषयीच्या ओढाताणीतून उगीच मोठेपण कुरवाळत राहणे पुरेसे नाही. त्या त्या वयाला, पेशाला, विचाराला... एकूण भूमिकेला शोभेल अशा प्रत्येक कृतिकार्यक्रमांतून संघटनेच्या मूळ उद्दिष्टाकडे पाऊलभर पुढे जाणे घडायला हवे. तसे घडत राहिले तर समस्या कमी होतीलच पण सध्या अस्तित्त्वात आहेत तितक्या संस्था संघटनाही गरजेच्या राहणार नाहीत. उगीच `कृण्वतो विश्वमार्यम्' हे उद्दिष्ट उच्चारत सामुदायिक भोंडला आयोजित करावा, यात आनंद घेणाऱ्यांना विश्वाचा आवाका आणि आर्यत्त्वाचे सामर्थ्य माहीत नसावे इतके उघड होते.
Comments
Post a Comment