Skip to main content

padmakar kelkar


 ब्राईट स्टार  
श्री. पद्माकर केळकर यांनी गव्हर्मेट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे येथून १९७२ साली प्रथम वर्ग विशेष प्राविण्यासह बी.ई.(इले.अॅन्ड टेलीकम्युनिकेशन) आणि १९७४ साली प्रथम वर्गात एम.ई. ही पदवी संपादन केली. यानंतर काही काळ त्यांनी अडवानी अर्लिकॉन कंपनीत काम पाहिले व त्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (ढरींर खपीींर्ळींीींश ेष र्ऋीपवराशपींरश्र ठशीशरीलह) या संस्थेत काम सांभाळले.
काही वेगळे करावे या उद्देशाने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. सुमारे ३० वर्षांपूर्वी `ब्राईट स्टार्स इलेक्ट्नॅनिक्स' या नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आणि स्वत:चे नाव कमविलेे आहे.
परदेशातल्या प्रवासात श्री.केळकरांनी तेथे मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या `स्वयंचलित फिरते तुषार सिंचन' संचाचा अभ्यास केला आणि अशा प्रकारचा संच हा आगामी काळात भारतात शेतीसाठी खूपच उपयुक्त ठरेल असे वाटून, त्यांनी सौर उर्जाचलित फिरती तुषार यंत्रणा विकसित केली आहे.
 तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करते. या यंत्रणेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे `पाण्याचे सुयोग्य व परिपूर्ण नियोजन'. पिकाच्या आवश्यकतेनुसार, सध्याच्या भारनियमनाच्या काळातही पिकांना सुयोग्य आणि पर्याप्त पाणी देण्याची सोय या यंत्रणेद्वारे झाली आहे. तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून पिकांवर कीटकनाशक, खते आणि तणनाशके यांची फवारणीसुद्धा केली जाऊ शकते. या यंत्रणेच्या वापराने जमिनीचा कस कमी होणे, धूप होणे इ. हानी होत नाही. अशा प्रकारची यंत्रणा सध्या भारतात कोठेही वापरली जात नाही. पण भविष्यकाळाचा विचार करता हीच यंत्रणा आपणास पुरेपूर उपयुक्त होईल असा केळकरांना विश्वास वाटतो. ही यंत्रणा प्रयोगादाखल राजगुरूनगर येथील राष्ट्नीय कांदा व लसूण संशोधन संचालनातील प्रक्षेत्रावर बसविली आणि या प्रयोगाचे निष्कर्षही समाधानकारक आहेत. या यंत्रणेचा वापर कांदा, लसूण, बटाटा, गहू इ. पिकांसाठी होईल. या  तंत्रज्ञानावर केळकरांनी दोन पेटंटसाठी अर्ज केेलेला आहे. या संदर्भात त्यांचे देश व परदेशातही अनेक ठिकाणी पेपर वाचले व गौरविले गेलेले आहेत. या प्रणाली संदर्भात  `इनोव्हेशन २००८' मध्ये त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच श्री. केळकर  र्आीींेारींळेप ेष ऊराी । लरपरश्री मध्येही  कार्यरत आहेत. देशविदेशांत त्यांनी यासंदर्भात पेपर्स वाचले आहेत. तसेच त्यांनी तीन निरनिराळया पेटंटसाठीही अर्ज केले आहेत.
(`समवेत' )
पत्ता : श्री. पद्माकर केळकर
४३/२, एरंडवणा,  ऑफ कर्वे रोड, पुणे ३८
झह.(०२०) २५४३०७६८, २५४६१००७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...