Skip to main content

common man


व्यवस्था सुधारण्यासाठी सामान्य माणूसही काहीतरी करू शकतो.
`आभाळ फाटलंय' हे खरंच; पण आपल्या परीनं त्यास एक टाका घालू....

लगे रहो कॉमन मॅन....!

ठिकाण - गणेशोत्सवाचे एक मंडळ
एक हालता पौराणिक देखावा सुरू आहे. एका बाजूला एका स्टुलावर एक मुलगा गणपतीचा मुखवटा घालून नाचतोय. पार्श्वभूमीला कुठलेतरी हिडीस गाणे लागले व हा गणपती त्यावर यथेच्छ हिंदकळतोय. दृश्य पाहणाऱ्या दोन-तीनशे लोकांना खटकलं. पण सगळेजण निमूट पाहात होते. गणपती पाहायला निघालेल्या पाच-सात कॉलेजवयीन मुलींच्या गटाला हे पाहवेना. त्या पुढे झाल्या. सरळ त्या मुलाला हाताला धरून खाली उतरवले व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे घेऊन गेल्या. गणपतीच्या उत्सवात गणपतीचा मुखवटा घालून असा बीभत्स नाच करणे चुकीचे आहे, हे पटवून दिले व आपला निषेध नोंदवून तो प्रकार बंद पाडला.

ठिकाण - मुलींच्या कॉलेजचा कट्टा
११ वीतल्या एका मुलीला कुठलातरी एक मुलगा सतत फोन करून त्रास देतोय. फ्रेंडशीप कर हा आग्रह. `मला तुझे सगळे माहीत आहे. तुझे घर, कॉलेज, क्लास, फोन नंबर, येण्या-जाण्याच्या वेळा, रस्ता...' असे सांगितल्यावर मुलगी घाबरली. पाच-सहा दिवस हा प्रकार सुरू होता. मुलीने मैत्रिणींना सांगितले. घरी सांगायची सोय नव्हती. त्या दिवशी कट्ट्यावर सगळया चिवचिवत असताना पुन्हा त्याचा फोन आला. तिला काय करावे सुचेना. ग्रुपमधल्या एका मैत्रिणीने शांतपणे स्वत:च्या मोबाईलवरून त्या मुलाचा नंबर डायल केला. त्याने हॅलो म्हटल्याबरोबर माहिती असलेल्या नसलेल्या सर्व प्रकारच्या शिव्यांच्या फैरी त्या मुलावर झाडल्या व `फ्रेंडशिप हवी तर ये समोर, एक सोडून दहा मिळतील' असे सुनावले.या मुलानेच घाबरून फोन कट केला व अक्षरश: दहाव्या सेकंदाला त्या `बिचाऱ्या' मुलीच्या मोबाईलवर त्याचा मेसेज आला `सॉरी, सॉरी, सॉरी... पुन्हा तुला फोन करणार नाही'
`अरे'ला जिथल्या तिथे `कारे' केले तर बरेच छोटे छोटे प्रश्न स्वत:लाच सोडवता येतात.  अत्याचाराला तर बळी पडणार नाहीच, पण बारीकसारीक छेडछाडही सहन करणार नाही असे म्हणण्याचे आंतरिक बळ प्रथम कमवायला हवे. तेच नसले तर मग मिरचीपूड, चाकू किंवा कराटेच काय पिस्तुलही आपले रक्षण करू शकणार नाही.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...