Skip to main content

6 Nov. 2017

शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।

भारतातली एक प्रसिद्ध कामगार संघटना (ट्न्ेड युनियन) सिटू ने जालना येथे श्रमिक साहित्य संमेलन आयोजित केले होते, ते गेल्या १०-११ सप्टेंबरला पार पडले. त्या संमेलनाचे उद्घाटक नागनाथ कोत्तापल्ले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले,-
``एकदा विवेक हरवला की माणूस स्वत: होऊनच गुलाम होतो. त्याचे स्वातंत्र्य गेले की नवा विचार करण्याची शक्तीच तो हरवून बसतो. त्यातही माणूस जातीसंस्थेचा गुलाम झाला की, त्या जातीच्या रिंगणातच तो गरगरत राहतो. त्याचे सारे अवकाशच मर्यादित होते. नंतर सर्वच जातींचे भ्रष्ट लोक -उद्योगपती, राजकारणी, धर्माभिमानी सगळेच -आपले हितसंबंध, स्वार्थ जपण्यासाठी जातव्यवस्थेची भलावण करतात. परिणामी कुठल्याही जातीत जे पीडित-शोषित-श्रमिक असतात, ते एकत्र येऊ शकत नाहीत. दुर्बलांच्या लढ्यातील एकतेचा सर्वांत मोठा अडथळा म्हणजे ही जातीय मानसिकता असते. भारतीय माणूस आज दुहेरी कात्रीत सापडला आहे. एका बाजूला जागतिकीकरणातून आलेल्या निर्दयी भांडवलदारांकडून होणारे शोषण; आणि दुसरीकडे या निर्दयी व्यवस्थेशी संघर्ष करू शकणाऱ्या एकतेचे जातींमध्ये विखुरलेपण.
``लेखक, कलावंत, विचारवंत, इतिहासकार, शिक्षक, शास्त्रज्ञ अशांनी काही नवा विचार करायचा, मांडायचा असेल तर त्या चाकोरीतून बाहेर यायला हवे आहे. कुणाचा जन्म कुठेही होवो, लेखक-विचारवंतांना आपापल्या जातीच्या धर्माच्या बाहेर पडावे लागेल. त्या कक्षा भेदण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करावे लागतील; तरच लेखकांच्या हाती काही चांगले लागेल, आणि ते लोकांपर्यंत पोचेल.''
संमेलनाध्यक्ष आ.ह.साळुंखे म्हणाले, -``शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम या दोन्ही गोष्टी एकमेकीच्या हातात हात घालून चालू शकतात; त्यांना एकमेकीपासून वेगळे काढण्याची आवश्यकता नाही. आपल्या संतांनी त्यांच्या जीवनातून तेच दाखवून दिले आहे. त्यांच्यापैकी कोणा एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजणे गैर व निंदनीय आहे. श्रेष्ठता आणि कनिष्ठता जन्मासोबत जोडल्याने भारतीय समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता काळ बदलला आहे. समाजातील सर्वांनाच आपापल्या प्रयत्नांतून कष्टांतून आपापले व्यक्तिमत्व फुलविण्याची योग्य संधी मिळविण्यासाठी वातावरण आणि वास्तव तयार करणे हे आपले स्वप्न असायला हवे. ते साकार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.''

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...