Skip to main content

27 November 2017

गगन आणि गिरी या गुणांचा महात्मास्वामी गगनगिरी

विश्वगौरव गगनगिरी महाराज यांचा जन्मदिवस ३० नोव्हेंबर(१९०६)  
त्यानिमित्ताने महायोगी सत्पुरुषाचे हे स्मरण-
भारतात लोकप्रिय असलेले गगनगिरी महाराज भक्तिभावाने पूजिले जातात. इतिहासप्रसिद्ध चुलकी चालुक्य सम्राट पुलकेशी (बदामी-कर्नाटक) राजवंशातील सरदार पाटणकर घराण्यात मंदुरे या गावी श्रीक्षेत्र जांभुळवन, कोयना खोरे, ता-पाटण, जि-सातारा, प.पू. गगनगिरींचा दि.३० नोव्हेंबर १९०६ दत्तजयंतीच्या दिनी जन्म झाला. गगनगिरी महाराज ऊर्फ श्रीमंत श्रीपत(राजे) गणपत(राजे) पाटणकर हुजूरवाडेकर (फर्स्ट क्लास सरदार अॅण्ड जहागीरदार डेक्कन व कोल्हापूर) हे वागोजीबाजी हुजूरवाड्याच्या (हुजूर सीनीयर) शाखेचे १४वे वंशज होत. ते गहिनी गगनगड गादीचे वंशपारंपरिक जायदादी वतनदार म्हणून प्रसिद्ध होते.
बालवयातच श्रीपतीवरील माता-पित्यांचे छत्र हरपले. वारकरी संप्रदायातील सखुआजी व नारायण आजोबांच्या (इतिहास प्रसिद्ध माने या मातुल घराण्यातील चरेगांव-उंब्रज, ता-कराड) सान्निध्यात त्यांना भक्तिमार्गाची ओढ व गोडी वाटू लागली. वयाच्या ७व्या वर्षी  जन्मजात राजपदाचा त्याग करून नवनाथी झुंडीत सामील होऊन हिमालयाकडे जाण्याचे त्यांनी निश्चित केले. फिरत फिरत ते झाशी जवळील चित्रकूट पायथ्याशी स्वामी चित्रानंदजी यांच्या आश्रमात आले. त्यांनी बालश्रीपतींना योगविद्या व अध्यात्मविद्येचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. एक दिवस त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून उपदेश केला व दीक्षा दिली.  चित्रानंद स्वामी यांनी हिमालय यात्रेला प्रस्थान केले. ते तीर्थयात्रेसाठी निघून गेले.
बालश्रीपती पदयात्रेस एकटेच निघाले. हिमालयात कठोर तपश्चर्या केली, भ्रमंती केली. निसर्गाला गुरू मानून दीर्घकाळ योगाभ्यास केला. पू.महाराज १९२८ सालापूर्वी गहिनी गगनगडावर प्रथम आले. आपला निवास तिथे केला. किल्ले गहिनी गगनगडावर(गगनबावडा) अनेक वर्षे तपश्चर्या केल्यामुळे त्यांना `गगनगिरी' हे नाव प्राप्त झाले. जवळच्याच किटाच्या रानात मौनव्रत धारण करून १२ वर्षे तपश्चर्या केली. ते स्वावलंबी व प्रयोगशील होते, भारतीय योगशास्त्रामध्ये नवनवीन सोप्या पद्धतींचा अवलंब त्यांनी केला.
सांगशी नदीकाठी पळसंबे, रामलिंग, दाजीपूर येथे पाटाच्या डंगात(पाटणकर डंग), अंबोळगड दक्षिणेत व गुजरात येथे देखील त्यांनी तप केले. १९४५ ते १९५० या काळात राजापूरनजिकच्या आंगल्यास त्यांनी कायाकल्प केला. विजयदुर्गाहून(कोकण) ते बोटीने मुंबईला गेले. त्यांनी दादी हिरजी या पारशांच्या अंत्यविधी भूमीत श्री मारुती मंदिरात, वाळकेश्वराजवळ एकांतस्थळी मुक्काम केला. मुंबईत असताना श्री.सयाजीराव गायकवाड, श्री.माधवराव शिंदे, छत्रपती राजाराम महाराज, पंत अमात्य भाऊसाहेब बावडेकर, महाराणी ताराबाई आदी अनेक संस्थानिक, राजेमहाराजे महाराजांच्या दर्शनासाठी येत. खोपोली व मालाड येथील मनोरी गड आश्रमालगत त्यांनी कठोर जलसाधना केली.
वृद्धापकाळी दिवसभर पाण्यात राहून तसेच प्रखर उन्हात समाधिस्थ राहून त्यांची ध्यानधारणा चालू होती. गगनगडावरील पाण्याच्या कुंडात तासनतास बुडून तप करीत. त्यामुळे माशांनी त्यांचे पाय कुरतडले व ते अधू झाले. देवकोंड येथे योगाभ्यास केला. त्यांनी भयंकर विषारी अशा चित्रमुळीचा सर्वांगावर लेप लावून पूर्वीच्या देहाची त्वचा काढून टाकली व कायाकल्प केला. असा कायाकल्प त्यांनी तीन वेळा केला. गिरीकंद, गुंफा, अरण्ये हीच महाराजांची निवासस्थाने. महाराज अतिशय शांत, प्रेमळ व निर्मळ स्वभावाचे होते, मानवी जीवनात सदैव आनंदी राहाण्याचा, सुखी जीवनाचा मंत्र शिकवीत. वेदाबरोबर विज्ञानाचे महत्व जाणून लोकांना ज्ञानाचे महत्व सांगत.
काही शतकांपूर्वी महाराष्ट्नत, गुजराथेत व दक्षिण भारतात चालुक्यवंशी राजांचे राज्य होते. दक्षिणापटवंशीय सम्राट म्हणूनही त्यांची ओळख होती. या कुळातील वीरपुरुषांनी क्षत्रिय धर्माची तेजस्वी परंपरा राखली. क्षत्रिय पाटणकर घराण्याला राजवंशाप्रमाणे ईश्वरी देणगी देखील लाभली आहे. म्हणूनच या पुण्यशील घराण्यात जन्मास आलेले गगनगिरी महाराज हे एक युगपुरुष होते. चालुक्य वंशीय साळुंखे उर्फ पाटणकर घराणे भारद्वाज गोत्री असून पहिल्या पुलकेशीपासून वंशास प्रारंभ झाला.
शिवाजी महाराजांच्या रायगडावरील राज्याभिषेक सोहळयात बिनीचे सरदार असलेल्या कमळोजी नाईक साळुंखे-पाटणकरांना शिवाजी महाराजांनी मानाची वस्त्रे (१मंदील, १झगा, १इजार, १दुपेटा, १दुमजन एकूण ५ वस्त्रं) व समशेर देऊन, राजश्री यशवंतराव नागोजीराव  पाटणकरांना मोत्याची कंठी देऊन बहुमान केला. पण त्या परंपरेच्या अभिमानात किंवा पिढीजात वैभवात हे श्रीपती महाराज रमले नाहीत. त्यांनी उच्चकोटीची परमसिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली व ते स्वामी गगनगिरी महाराज झाले.
गगनगिरी महाराजांच्या जनकल्याणाच्या कार्याची दखल घेऊन जागतिक विश्वधर्म  संस्थेने (शिकागो. अमेरिका) `विश्वगौरव पुरस्कार' दि.१४ ऑगस्ट १९९७ रोजी महाराजांना देऊन गौरव केला. या सदगुरूंना अनेक पुरस्कार व मानचिन्ह देऊन जणू वंदनच केले. महाराष्ट्न् सरकारनेही व्यसनमुक्ती पुरस्कार दिला. उच्च आध्यात्मिक प्रगती साधून देखील वास्तवतेचे भान ठेवून संसार व संन्यास, योग व वैराग्य, विज्ञान व अध्यात्म तसेच नामस्मरणाचे महत्व यांचे सुबोध मार्गदर्शन स्वामी करीत असत. ``दु:खावर मात करणाऱ्या आनंद यात्रेकडे मी सर्वांना नेण्याचा प्रयत्न करतो.'' असे महाराज नेहमी सांगत.
गहिनी गगनगड, (ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर), पाताळगंगा योगाश्रम खोपोली (ता.खालापूर, जि.रायगड), गगनगिरी सिद्ध तपोवन, मनोरी(प.मालाड, मुंबई), दाजीपूर(तळकोकण) या चार प्रमुख आश्रमांबरोबर इतर ठिकाणी आश्रमस्थानांची स्थापना केली आहे. ते व्यसनमुक्ती, प्रदूषण मुक्ती, सत्संग, इ. कार्यकम राबवीत असत. त्यांच्या आश्रमात वृक्षारोपण, वैद्यकीय चिकित्सा शिबिरे, गुणवंत सत्कार, गरजू गोरगरिबांना-आदिवासींना वस्तूंचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले जात. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमही होत असत.
गगनगिरी महाराजांनी २००३च्या कुंभमेळयात त्र्यंबकेश्वर येथे संतनगरी उभारली. तेथे अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय झाली. त्यांना १०२ वर्षांचे आयुष्य लाभले.
या जगात अनादिकाळापासून एैश्वर्य, सत्ता व सौंदर्य या गोष्टींसाठी संघर्ष चालू आहे. या गोष्टींच्या आहारी न जाता नीतिमूल्यांची जपणूक, पुरुषार्थ आणि परमार्थ यांचा समन्वय, परिस्थितीप्रमाणे योग्य ते बदल, देशाभिमान हे महाराजांचे सांगणे होते.  शील व कुल या गोष्टींना महत्व देऊन मानवता धर्माचे पालन करा. मदत करता आली नाही तरी कोणालाही त्रास देऊ नका. मनुष्यसंग्रह हा धनसंचयापेक्षा श्रेष्ठ व खऱ्या वैभवाकडे नेणारा आहे. आपला कामधंदा उत्तम प्रकारे करीत ईश्वराची भक्ती करा. धैर्य, कष्ट व संयम या त्रिसूत्रीच्या जोरावर विकास घडवून आणा. अपेक्षारहित स्वावलंबनाची भूमिका स्वीकारून आनंदमय जगावे ते ईश्वरालाही प्रिय होईल. असा त्यांचा संदेश होता.
-सुनील दत्तात्रय दापुरकर, पुणे
फोन-९४२३००३२६७

 संपादकीय

विरोधही घटनात्मक हवा.

भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की, त्याने आपल्या राज्यघटनेचे श्रद्धापूर्वक  जबाबदारीने पालन केले पाहिजे. लहान पोरे टोरेही त्यांच्या शाळेत नागरिकत्वाची प्रतिज्ञा घेतात, आणि निवडून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने तर तशी शपथ घेअून तिचे प्राणपणाने पालन करणे अपेक्षित असते. परंतु अलीकडच्या काळात आपले मंत्रीसंत्री आणि आमदार खासदारही त्या शपथेचे गांभीर्य  न  ठेवता, `शप्पत गेली खड्यावर....' असे टारगट पोरांप्रमाणे म्हणतात. अलीकडच्या प्रत्येक आंदोलनात त्याचा प्रत्यय  येत असतो. आंदोलन करणे, अन्यायाविरोधात दाद मागणे हे तर लोकशाहीत अमान्य नाही, पण ते करतानाही घटनेनुसार चाललेल्या कारभारात खीळ घालण्यासाठी जी बेताल वर्तणूक सुरू झाली आहे, ती पाहिल्यावर घटना पाळायची तरी कुणी; असा प्रश्न येतो.

घटनेनुसार कायदेमंडळात होणारेे कायदे अंमलात येणे बंधनकारक आहेतच. त्यात कुणावर अन्यायही भासमान होत असतो. मराठी समाजाला  -विशेषत: दक्षिण पश्चिम महाराष्ट्नला अत्यंत झोंबत राहणारा राजकीय अन्याय म्हणून बेळगावचा अुल्लेख करायला हवा. भाषावार प्रांतरचना करण्याचे ठरल्यावर जुन्या मुंबआी आिलाख्याचे द्विभाषी राज्य झाले. तरीही संयुक्त महाराष्ट्नची चळवळ सुरू झाल्यावर मुंबआी महाराष्ट्नला मिळू न देण्याची कारस्थाने झाली, ती यशस्वी न झाल्यामुळे तो राग बेळगाववर निघाला आणि बेळगाव कर्नाटकात दामटून घातले गेले. हा धडधडीत अन्याय होताच, पण कायदेशीर आणि सनदशीर राज्याचा अुद्घोष करत असताना, विरोधातील चळवळी घटनाबाह्य होअू नयेत याची काळजी आज वाहायलाच हवी. त्यासाठी घटनात्मक चौकटीत राहून चिंतामणराव देशमुख यांनी त्या काळी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तर ते मात्र अेकटे पडले; बाकीच्या कुणीच त्यावेळी काही केले नाही.

आजकालपर्यंत शिवसेना राष्ट्न्वादी काँग्रेस शेकाप आणि काँग्रेसवालेही `बेळगावचा व सीमाभागाचा प्रश्न' म्हणून सतत अुल्लेख करत असतात. आणि त्या कारणावरून कुठे काही वातावरण तापलेच तर त्याचा आपल्या फायद्यापुरता अुपयोग करता येआील तेवढे पाहात डरकाळया फोडत असतात. असले राजकारण करणे हा त्या बापड्यांचा धंदा असला तरी, आितपत राजकारण साधण्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. ते त्यांनी केले म्हणून बिघडत नाही. पण राज्यघटनेच्या चौकटीत जर कर्नाटक राज्याने काही धोरणात्मक निर्णय घेतले तर ते आपल्या लोकप्रतिनिधींनी झुगारून देणे निखालस चूक आहे. बेळगाव महाराष्ट्नत येण्यासाठी जी काही घटनात्मक कृती असेल ती करण्याला कुणी अडविलेले नाही. ते तर दाखविण्यापुरते चालूही आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल आहे. कुठे काही समिती वगैरे आहे. ते चालू राहिले तरी त्याची फारशी तातडी आता कुणाला दिसतही नाही. आपल्याकडे  `प्रश्न सोडविण्याचा अेक मार्ग म्हणजे तो   न सोडविता तसाच कुजवत ठेवणे'  या तत्वावर भरवसा  ठेवणारे राज्यकर्ते असल्यामुळे बेळगाव महाराष्ट्नला मिळण्याची शक्यताही तितपतच क्षीण वाटू लागली आहे.

ही वस्तुस्थिती  असल्यामुळे साहजिकच कर्नाटकला बेळगावच्या बाबतीत भोचकपणा करण्यालाही घटनात्मक आधार प्राप्त होतो. कर्नाटकने बेळगावच्या बाबतीत काहीही निर्णय घेतला तरी महाराष्ट्नला तो रोखण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार राहात नाही. त्या कोणत्याही निर्णयाविरोधात जी कुठे काही दाद मागायची असेल ती मागावी, पण कर्नाटकने घातलेले घटनात्मक बंदी हुकूम मोडून मराठी नेत्यांनी तिथे मेळावा घेण्याचे समर्थन करता येत नाही. त्यासाठी पूर्व अर्थमंत्री जयंत पाटील, आणि अन्य विद्यमान आमदार मंडळी कर्नाटकचा बंदी हुकूम मोडून हजर राहिले याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे कर्नाटकने म्हटले आहे, ते सयुक्तिक ठरते. अर्थात या गुन्ह्यांचा तपास तो काय होणार, खटला कसा चालणार, आणि झालीच तर शिक्षा तरी काय होणार या प्रश्नांची अुत्तरे म्हणून `काहीही होणार नाही' आितकेच म्हणता येते. तथापि बरीच मंडळी आपली राज्यघटना आणि तिचे महानत्व मोठ्या तोंडाने सांगत शिकवत असतात, त्याबद्दल तेच किती बूज ठेवतात अेवढे दिसून येते.

बेळगावचे नाव बदलून बेळगावी करण्याचा निर्णय घेण्यात कर्नाटकची खोच आहे, पण ते घटनाबाह्य नव्हे. त्या गावाला तिथल्या जनतेने यापुढेही बेळगावच म्हणत राहिले तर कुणाची हरकत येअू शकत नाही. कालांतराने जे नाव जनता रूढ करते तेच टिकते. औरंगाबादला  संभाजीनगर करण्यात किती औचित्य आहे! पण सरकार ते अैकत नाही तरी तेथील जनतेने म्हणायला का प्रारंभ केला नाही? रा स्व संघाचे लोक तसे आवर्जून म्हणतात तर त्यांची टवाळी होते, हाच खरे तर अन्याय आहे. जे ते सरकारनेच केले तरी ते मानले जात नाही. कुठल्याही सार्वजनिक संस्थेला कोणतेही नाव दिले तरी दंगे धुडगूस सुरू होतो, हे घटनेचे बंधन म्हणायचे काय? निदान सरकारला तरी तो घटनात्मक अधिकार द्यायला हवा की नको?

 त्याविरोधात लोकमत जागे ठेवणे हे तर लोकशाहीत अपेक्षित आहे, पण त्याअैवजी आपण छत्रपतींचे खरेच वारसदार असल्याच्या भ्रमात गनिमी काव्याची भाषा करत छुप्या मार्गाने त्या राज्याचे बंदी हुकूम मोडून मेळावे घेणे कसे चालू शकते? यापूर्वी शरद पवार आणि छगन भुजबळ यांनीही तो पराक्रम कसा केला त्याचीही अुजळणी झाली. गोवा मुक्तीच्यावेळी परकी सरकारच्या विरोधातील आंदोलनांत  तशी बंदी मोडणे वेगळे होते. गांधीजींनी असा कित्येकदा कायदेभंग केला, ते सरकार परकीय होते, परकीय घटना आपल्यास लागू असल्याचे आपण स्वातंत्र्यप्रेमी  मानत नव्हतो; आिथे तसे नाही. शरद पवार हे तर प्रगल्भ राजकारण धुरंदर आहेत असे आपण समजतो, त्यांच्या महाराष्ट्नत त्यांनी समजा टाटांना दिलेल्या कारखानदारीच्या परवान्याविरोधात, `गरीबांच्या कनवाळू'  ममताबाआींनी अुग्र आंदोलन केले तर कसे चालेल? ते घटनेचा स्पष्ट  भंग ठरेल. ममताबाआी तो करतीलही, पण म्हणून आमच्या समजंस आमदारांनी तो करावा काय?

शरद पवार यांनी सध्या भा ज पक्षाच्या राज्य-सरकारवर टीकेचे धोरण ठेवले आहे. त्यात तथ्य असेलही, पण त्यास विरोध   करण्यासाठी   विरोधी पक्ष म्हणून काय धोरण दिसते? त्यांनी म्हटल्याचे प्रसिध्द झाले आहे की, सरकारवर दबाव आणण्यासाठी विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही. ही संसदीय रीत म्हणता येत नाही. हल्ली तर हंगामा करून विधिमंडळ बंद पाडणे हेच संसदीय कामकाज समजले जात असते. राज्यघटनेनुसार विधिमंडळ अस्तित्वात आलेले आहे, तिथून अभ्यासू  चर्चेने राज्यकारभार चालविण्याची जबाबदारी  सरकार पक्षाआितकीच - किंबहुना काही जास्तच, -विरोधी पक्षांची असते. आपली सरकारे प्रभावी नाहीत याचे अेक संसदीय कारण म्हणजे विरोधी पक्षही समर्थ नाहीत, हे आहे. सरकार मनमानी करते या सबबीखाली सभागृहात गोंधळ घालणे हा घटनापालनाच्या दृष्टीने गुन्हाच म्हणावा लागतो. शरद पवारांनी त्यांच्या लोकप्रतिनिधित्वाची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सत्कार होत आहेत आणि ते भूषणावह आहेच. पण त्यांच्याआितक्या अनुभवाचा नेता कामकाज बंद पाडण्याच्या मार्गाने लोकांचे प्रश्न कसे मार्गी लावणार हे अगम्य आहे. ते घटनात्मक होआील काय? धावत्या गाडीसाठी उत्तम ब्रेक असावा तो प्रवास बंद पाडण्यासाठी नव्हे, तर धावत्याचा अपघात टाळण्यासाठी असतो.

आपल्याला ब्रिटिश काळात लागलेल्या सवयी जात नाहीत. आिंग्रजांनी  भाषा आणि संस्कृती मागे ठेवली असे  बरेच लोक म्हणतात; पण आपण त्या काळातील विरोधाच्या पध्दती तरी बदलायला हरकत नाही. गाड्या अडविणे, रस्ते रोखणे, काचा फोडणे, माऱ्यामाऱ्या करून सरकारी अधिकाऱ्यांची बेआिज्जत करणे ही आंदोलकांची रीत परक्या सरकारविरोधात ठीक होती. त्याही काळी क्रांतिकारकांनी सरकारच्या तिजोऱ्या लुटण्याचे; आणि रयतेला कोणताही त्रास न देण्याचे बंधन पाळले होते. आज कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी ते जनतेचेच असते. विरोधी पक्षही सरकारला चर्चेने धारेवर धरून `राबवू' शकतो. पण तो घटनात्मक व घटनादत्त अधिकार अंगी बाणविण्याला मोठीच तपश्चर्या हवी. आजच्या आंदोलकांनी ती करायला हवी, अन्यथा लोकांचा घटनेवरचाच विश्वास अुडेल आणि धुडगुशी आंदोलनांनी काहीतरी मिळते असे मानले जाआील. बाकीच्यांचे सांगवत नाही, पण निदान जबाबदार सभ्य लोकप्रतिनिधींनी तरी संसदीय समंजस आंदोलनांचा अवलंब करून सच्च्या लोकशाहीचे मार्ग अनुसरावेत. त्यांच्याकडूनही तशी `अुग्र' आंदोलने चालूच राहिली  तर  कधीतरी लोकही  तसल्याच अुग्रपणाने `लोकशाही' राबवू लागतील आणि  देशाला  ते फारच महाग पडेल असा धोका वाटतो.

अमर मराठी
नोव्हेंबर अंकातील मराठी भाषेसंबंधी लेख वाचले. अनंत काणेकर म्हणत असत `मराठी समृद्ध व्हावयास हवी आणि हे काम साहित्यिकांचे नाही.  इंग्रजी भाषा समृद्ध झाली कारण त्या लोकांनी जगभर मोहिमा काढून अनेक देश पादाक्रांत केले तरीही तेथील भाषांतील शब्द घेऊन इंग्रजी समृद्ध झाली, तसेच त्या लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांत शोध लावले, त्यांतील शब्दसंपत्तीची इंग्रजीत भर पडली. मराठी लोकांनी हे केले असते तर त्यांचीही भाषा समृद्ध झाली असती.'
आपण इंग्रजी शब्द वापरतो याचे अनेकांना वाईट वाटते; पण कोणीही शुद्ध मराठी बोलत नाही. हे वाक्य पहा. `जमिनीचा ताबा मिळण्यासाठी मामलेदार कचेरीत गुदरलेल्या फिर्यादीचा निकाल काल जाहीर झाला.' या वाक्यात एकही इंग्रजी शब्द नाही, पण `साठी' आणि `झाला' यांव्यतिरिक्त एकही शुद्ध मराठी शब्द नाही.
मराठीचे भवितव्य अजिबात वाईट नाही. अनेक वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके, नाटके, वैचारिक ग्रंथ या भाषेत प्रसिद्ध होतात; चित्रपट, नाटके चालतात आणि गाजतात, साहित्य संमेलने कवी संमेलने भरतात, राष्ट्नीय पुरस्कार मिळतात, रेडीओ टीव्ही ओसंडून वाहतात, प्रत्येक महाविद्यालयात मराठी शिकवली जाते. ती भाषा मृत होणे शक्यच नाही. परप्रांतीय येणारच. त्यांना रोखायचे असल्यास भारतीय संघराज्यातून फुटून निघावे लागेल. त्यांना बंदी घालणे घटनेविरोधी होईल. मुंबईत राहाणाऱ्या परप्रांतियांनी मराठी बोलले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या मराठीप्रेमी `सेना' वा साहित्य `परिषदां'नी परप्रांतियांना मराठी शिकवण्याचे वर्ग चालविले पाहिजेत.
   -डॉ.शरद अभ्यंकर-वाई फोन-९४२२४००६४३

पुतळे आणि स्मारके
एकदा नेत्यांना आमदारकी मिळाली की त्यांच्या `आयुष्याचे सोने' होते. बंगला, गाडी, नोकर-चाकर, फुकटातले फोन, सवलती, कँटीन, प्रवासभत्ते वगैरे वगैरे चालून येते. एकदा ती चटक लागली की, सत्तेबाहेर जीव तडफडतो, तळमळतो. हार-तुरे, भाषणबाजी, मुजरे करणारे हुजरे, सुरक्षा या गोष्टी हातातून निसटतात. जीव तडफडतो मग सत्ताधारी पक्षावर तोंड सुख घेणे, आणि गैरलागू बडबडणे सुरू होते. हे जाणते नसून जनतेने सत्तेबाहेर काढलेले आहेत हे त्यांच्या बिनबुडाच्या बडबडण्यातून लोकांच्या लक्षात येते. कधी  बळीराजा, तर कधी मनुवाद! काहीच नसले तर जुनी मढी उकरून काढून आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अन्वयार्थ लावत फिरणे हे काम सुरू. सत्तेबाहेर फेकले गेलेले नेते काय बडबडतात  हे पाहून हसायचे तरी किती आणि कुठे!
बिनकामाचे नेते मग स्मारके पुतळे असले उद्योग सुरू करतात. सत्ताधारीही आपण मोठे कार्य करीत आहोत असा आव आणत, कोट्यवधींची तरतूद करतात. श्रीशिवछत्रपती यांनी कधी असल्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांचे गड-किल्ले आणि त्यांची यशोगाथा हेच मोठे स्फूर्तीस्थान आहे. जो तो आपापल्या लाडक्या नेत्यांचे पुतळे उभारण्याचा हट्ट धरतो. आणि काहीजण असलेले पुतळे उखडून टाकण्याचा उद्योग करतात. असे बरेच पुतळे उभे आहेत. सत्तेबाहेरच्या नेत्यांना ते उद्योग पुरवतात.
-शंकर देव, पेण(रायगड)  फोन- ९१७५२१६३७१

ओवीबद्ध राज्यघटना 
भारताची राज्यघटना आदर्श मानली जाते.तथापि कायदेशीर संकल्पना, बोजड शब्दरचना यांमुळे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्याऐवजी ती सोप्या भाषेत आणि रंजक अशा ओवी छंदात असली तर लोकांना भिडेल, कळेल अशा हेतूने एक अनोखा प्रयोग होत आहे.
सातारा येथील तरुण वकील सौरभ देशपांडे यांनी तीन वर्षांच्या प्रयत्नांतून राज्यघटनेचे सोप्या शब्दांत ओवीबद्ध रूपांतर केले असून, मुंबईच्या `ग्रंथाली' तर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. घटनेच्या मूळ आशयाला धक्का न लावता सुमारे ३५०० ओव्यांमध्ये हे रूपांतर करण्यात आले आहे. ते ४०० पृष्ठांच्या ग्रंथरूपाने सिद्ध होत आहे. माजी राष्ट्न्पती प्रतिभाताई पाटील यांची प्रस्तावना असून खा.डॉ.नरेंद्र जाधव यांचे आशीर्वाद नमूद आहेत. डिसेंबर अखेर ग्रंथ प्रकाशित होत असून छापील किंमत रु.४००/- आहे. सवलतीच्या किंमतीत नोंदणी करणाऱ्यांना तो रु.२००/- मध्ये मिळेल. सामान्य लोक, संस्था, स्पर्धा परीक्षेेचे विद्यार्थी, कार्यकर्ते, पत्रकार, वकील आदी सर्वांसाठी हा ग्रंथ संग्राह्य ठरेल अशी देशपांडे यांची अपेक्षा आहे.
संपर्क-अॅड.सौरभ देशपांडे, सातारा  फोन-९४२१४३८४०४  किंवा
       प्रा.ए.व्ही.देशपांडे, पाटण फोन-७७४१८११४३४

भारतीय कंपन्यांत १.१३लाख अमेरिकन नोकर

अमेरिकेमध्ये भारतीय कंपन्यांनी १८ अब्ज डॉलर(साधारण १.१७ लाख कोटि रुपये) गुंतविले असून, तेथे १.१३ लाख रोजगार निर्मिती केली गेली आहे. भारतीय उद्योग महासंघ अर्थात `सीआयआय'द्वारे `इंडियन रूट्स अमेरिकन सॉइल' नावाचा अहवाल तयार केला असून, त्यातून ही माहिती पुढे आली आहे. भारतीय कंपन्यांनी तेथे समाजाचे दायित्व निभावताना १४.७ कोटि डॉलरचे(सुमारे ९६० कोटि रुपये) दान कार्य तसेच संशोधन आणि विकास कार्यासाठी ५८.८ कोटि डॉलर (सुमारे ३,८३५ कोटि रुपये) खर्च केले आहेत.
अमेरिकेच्या सीमेत पोर्टोरिको मध्ये व्यवसाय करणाऱ्या १०० कंपन्यांच्या वार्षिक अहवालातील तपशील तपासता, त्यांनी केलेल्या गुंतवणुका आणि रोजगार निर्मितीची ही आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये कार्यरत या कंपनीमध्ये १,१३,४२३ कर्मचारी स्थायी स्वरूपात सेवेत आहेत.
भारतीय कंपन्यांचा व्यवसाय असलेल्या अमेरिकेतील पाच मोठी राज्ये न्यू जर्सी (८,५७२ नोकऱ्या), टेक्सास (७,२७१), क्रॅलिफोर्निया (६,७४९), न्यूयॉर्क (५,१३५) आणि जॉर्जिया (४,५५४) आहेत. गुंतवणूक न्यूयॉर्क (१.५७ अब्ज डॉलर), न्यूजर्सी (१.५६ अब्ज डॉलर), मॅसेच्युसेट्स (९३.१ कोटि डॉलर), क्रॅलिफोर्निया (५४.२ कोटि डॉलर) आणि वायोमिंग (४३.५ कोटि डॉलर). यांतील ८५% भारतीय कंपन्यांनी भविष्यात अमेरिकेतील गुंतवणूक आणखी वाढविण्याच्या योजना आखल्या असल्याचे अहवालाचे निरीक्षण आहे. ८७% कंपन्या आणखी नोकरदारांना सामावून घेणार आहेत..
भारत मुख्यालय असलेला सर्वात मोठा बहुराष्ट्नीय उद्योगसमूह टाटांनी उत्तर अमेरिकेत मोठी गुंतवणूक केली आहे. उभय देशांच्या सरकारांचे राजनैतिक संबंध दृढ होत असल्याचे पाहाता आपल्याला संधीतून आणखी गुंतवणूक करणे भागच आहे, असे टाटा सन्सचे उत्तर अमेरिकेतील निवासी संचालक जेम्स शापिरो यांनी स्पष्ट केले.

श्रीदत्त दर्शनाचा आनंद
मार्गशीर्ष पौर्णिमेला(यंदा ३ डिसेंबर) दत्तजयंती आहेे. 
त्या निमित्ताने श्री.मराठे गुरुजींनी दिलेली माहिती-
श्री दत्तात्रेयांच्या अवताराचे रहस्य श्रीधर स्वामीकृत रामविजय ग्रंथात आहे. ही देवता विविध पुराणांतील उल्लेखांमुळे प्राचीनत्व सिद्ध करते. पुराणातील कथेनुसार अत्री ऋषी आणि त्यांची भार्या अनसूया यांच्या आश्रमी तिन्ही देव बालके झाले. तो दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा! त्या तिन्ही बालकांचा `त्रैमूर्ती अवतार' म्हणजे `दत्त अवतार' म्हणून प्रसिद्ध झाला. विष्णूंच्या २४ अवतारांपैकी हा एक दत्त अवतार मानला जातो. वायुपुराण, ब्रम्हपुराण, ब्रम्हांड पुराण, कूर्मपुराण, विष्णुपुराण, धर्मोत्तर व पद्मपुराणात यांचे संदर्भ आढळतात.
दत्त अवतारास प्रमाणभूत मराठी ग्रंथ `गुरुचरित्र' होय. महानुभावांच्या सह्याद्रीवर्णन दत्तात्रय बालक्रीडा याचा प्रभाव महाराष्ट्न् व कर्नाटक प्रांतात होऊन दत्त संप्रदायाचे लाखो भक्त आहेत. कावडीबाबांच्या `दत्तप्रबोध' ग्रंथात अनसूया, यदू, सहस्त्रार्जुन, एकनाथ, दासोपंत, परशुराम, गोरणनाथ या दत्तभक्तांचे अनुभव कथन आहे.
विविध कथा व चरित्रांमध्ये दत्तप्रभू हे संचार, योग, ज्ञान, संन्यास, भक्ती, वैराग्य रूपाने आढळतात. दत्तात्रेयांचे एकमुखी, त्रैमूर्ती अवतार, पंचमुखी रूपातील उल्लेख आहेत. दत्तात्रेयाचे रूप वैराग्यसूचक आहे. गळयात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्म, हातात दंड, कमंडलू, त्रिशूळ, डमरू, शंख,चक्र आदी आयुधांसह अंगावर `मृगचर्म' असते.
दिगंबर, अवधूत, नरहरी हे दत्तांचे अवतारी रूप आहे. दत्तात्रेयांच्या १६ अवतारांचा उल्लेख पुराणात आढळतो. दत्तात्रेयांचे समवेत कामधेनू, श्वान, औदुंबरवृक्षांच्या छायेतील रूप असते. काही वेळा दत्त महाराज राजयोगी रूपात असल्याचे आढळते.
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती हे कलियुगातील अवतार. नृसिंहसरस्वती यांनी इ.स.१३७८ ते १४५८ या कालावधीत दत्तसेवेचा प्रसार केला. कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, औदुंबर, कोल्हापूर, नृसिंहवाडी, बडोदा, गिरनार, हैद्राबाद अशा स्थानी मराठी, कन्नड, गुजराती, तेलुगु प्रांतात दत्त उपासना व दत्त देवस्थाने असून त्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. काही ठिकाणी दत्तात्रेय माऊलींचे पादुकापूजन तर काही ठिकाणी मूर्तीपूजा आढळते. श्रीमत् शंकराचार्य विरचित गुरुपादुकास्तव, वासुदेवानंद सरस्वतीकृत नित्यपूजा संहिता, संकल्प, ध्यान, दत्तात्रय स्तवन, करुणाष्टक, गुरुवाष्टक, सहस्त्र नामावली, नारायणसूक्त, शांतीसुक्त, क्षमापन स्तोत्र, संकीर्तन आदंीचा पूजाविधीत उल्लेख आढळतो. पारायण, गुरुचरित्र सप्ताह, संगीत सेवा, मानसपूजा वगैरे विधी नित्य पूजेत असतात.
श्री सत्यसाईबाबा, गोदामाता, उपासनी महाराज, नारायण महाराज, कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती महाराज, शंकर महाराज, वासुदेवानंद सरस्वती, दीक्षित स्वामी, योगानंद सरस्वती, कावडीबाबा, चिदंबरस्वामी, भैरव अवधूत आदी उपासक दत्त सांप्रदायिक आहेत. गुरुचरित्रकार गंगाधर सरस्वती यांनी गुरुचरित्राची मौलिक उपासना केली आहे.
शके १८२३ साली दत्तभक्त वामनराव वैद्य विरचित गुरुलीलामृताने महाराष्ट्नत मोठा लौकिक मिळविला. वासुदेवानंद टेंबेस्वामींचे दत्त माहात्म्य, वामन नरहरी कामत रचित पंत बाळेकुंद्री महाराजकृत दत्तावताराचे माहात्म्य, १८८९ सालातील वि.गो.नातू महाराज लिखित दत्तचरित्रसार, महानुभावीय दत्तग्रंथ आदी ग्रंथांद्वारे दत्त माहात्म्याचा मोठा प्रसार चालतो. महानुभाव, वारकरी, समर्थ, नाथ हे ही उपासनेशी संबंधित संप्रदाय म्हणून ओळखले जातात. दत्त संप्रदायातील तत्वज्ञान कितीही वास्तव असले तरी सामान्य भक्तांच्या बुद्धीचा आढावा घेऊन नित्यकर्मात कथांचा-बोधकथांचा उल्लेख लक्ष वेधून घेतो. सांप्रदायिक आचार धर्मासाठी दत्त क्षेत्रावर भस्मविलेपन, रुद्राक्षमाला परिधान, नीरव शांतता, नदीकाठ, औदुंबर वृक्ष, अन्नदान, कीर्तन-प्रवचन सेवा, अनुष्ठाने, ध्यान आदींना विशेष महत्व आढळून येते. गाणगापूर, अक्कलकोट, कारंजा, माहूर, माणिकनगर, बेट केडगाव, साकुरी, सटाणे, बाळेकुंद्री, दत्तवाडी, साखळी गोवा, बडोदा दत्तसंस्थान, तारकेश्वर स्थान, नीळकंठेश्वर, अबूवरील गुरुशिखर, गिरनार पर्वतावरील गुरुपादुका, चिकुर्डे, आष्टी, कसबे डिग्रज, शिरोळ येथील दत्त पादुकास्थान, जवाहर द्वीप, क्षेत्र देखण, क्षेत्र देवगड नेवासे, नेपाळमधील भटगाव, दक्षिण भारतातील शुचिंद्रम, वगैरे दत्तदेवस्थानांची उभारणी झाली आहे.
      -नंदकुमार मराठे, कोल्हापूर  फोन- ०२३१-२५४१८२३

या दृष्टीने पाहावे!
ताजमहालच्या दर्शनाविषयी  
म वि कोल्हटकर यांचे पत्र(सप्टेंबरमधील अंक) वाचले. त्यांनी ताजमहालविषयी बरेच अैकले होते, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांना जरा निराशा आलेली दिसते.
कोणत्याही कलाकृतीबाबत असे विचार संभवू शकतील;  कारण सौंदर्य ढोबळ मानाने अमक्याच अेका गोष्टीत आहे असे सांगता येत नाही. ताजमहालबद्दल अगदी थोडक्यात सांगायचे तर, ती स्वच्छ पांढऱ्या -मोतिया-रंगाच्या संगमरवरी दगडात बांधलेली आिमारत असल्याने ती केव्हाही स्वच्छ नितळ दिसते. विशेषत: पूर्ण चंद्रप्रकाशात त्यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे तिचे अस्तित्व वेगळेच दिसते. मूळ आिमारतीची बांधणी जवळजवळ दोन पुरुष अुंचीच्या चौथऱ्यावर आहे, आणि त्यामागे यमुनेच्या पात्रात पृष्ठभूमीवर आितर कोणतीही मानवनिर्मित आिमारत नसल्याने  ते शिल्प वर्षानुवर्षे लोक तसेच पाहात आहेत. त्यातील प्रत्येक स्कंधाची  प्रमाणबद्धता अेकमेकांना पूरक आहे. अुदा. घुमट व त्या बाजूचे मिनार; अथवा त्या चबूतऱ्याच्या चारी टोकांवर अुभे असलेले मिनार यांची नजरेला अेक परिपूर्ण व प्रमाणबध्द रचना जाणवते. त्यात सौंदर्य आहे. शिवाय त्यातील कलाकुसर -अुदा० त्या आिमारतीच्या पृष्ठभागावर अतिशय बारीक फुलाफुलांची कलाकुसर - ही विविध रंगांतील चपट्या दगडांत खुबीदारपणे त्या मूळ दगडावर कोरली आहे. त्यामुळे अुन्हापावसाने त्याचे रंग आजही विटलेले वाटत नाहीत.आिमारतीला अनुरूप सभोवतीच्या बगीच्यांची रचना... ही काही सौंदर्यस्थले सांगितली. अेखाद्या महाकाय साध्या शिळेतही सौंदर्य दडलेले असते, हेही शेवटी खरेच की!
-वैकुंठ सरदेसाआी, १२०६ अ डेक्कन जिमखाना, पुणे ४
फोन-(०२०)२५५२०९६८

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन