Skip to main content

29 Feb.2016

महिलांच्या समस्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या कार्यासंदर्भात, प्रचारकी पद्धतींतून आजकाल काही समज रूढ झालेले आहेत. पण पूर्वीपासून कितीतरी लोक या विषयांत प्रयत्न करीत होते हे लक्षात येऊ शकेल. ब्रिटिश साम्राज्यातही महिला पदवीधर होण्याचा प्रथम मान भारतात आहे हेही विशेष वाटेल.
महिला दिनाच्या निमित्ताने...
भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातला एक संस्मरणीय दिवस म्हणजे १० मार्च १८८३. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास त्या दिवशी कधी नव्हे एवढी तोबा गर्दी उसळली होती. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दोन महिलांना बी.ए.ची पदवी मिळाली त्या दिवशी. इंग्रजी शिक्षणाच्या सुरुवातीच्या जमान्यात `ग्रॅज्युएट दिसतो तरी कसा' हे पाहायला लोक जमा होत. त्या दिवशी `ग्रॅज्युएट बाई' दिसते कशी हेच नवल होतं! या पहिल्या पदवीधर स्त्रियांची नावं होती कादंबिनी बसू आणि चंद्रमुखी बसू. उच्चशिक्षणाची पताका फडकावणाऱ्या त्या अग्रणी महिला असल्या, तरी स्त्रीशिक्षणाची तोवरची एकूण वाटचाल अतिशय खडतर नि झगडून झालेली होती. त्या दिवशीच्या कौतुकाला आधीच्या जवळपास पंचाहत्तर वर्षांची पूर्वपीठिका होती.
राजा राममोहन राय (१७७२-१८३३) यांनी स्त्रीशिक्षणाचा हिरीरीनं पुरस्कार केला होता. `विद्या आणि ज्ञान यांच्या अनमोल भांडारापासून स्त्रियांना दूर ठेवता, तरीही त्यांना अल्पबुद्धी कसं म्हणता?' असा त्यांचा रोकडा सवाल होता. १८२१ मध्ये मिस कुक नावाची शिक्षणप्रसारक महिला भारतात आली आणि १८२४ पर्यंत तिनं मुलींच्या शाळा काढल्या. पालक वरच्या वर्गाच्या मुलींना शाळेत पाठवत नसत, आणि कुकबाइंर्च्या शाळांत दलित समाजातील मुलीच येत, हे इतिहासाचं उदाहरण ध्यानात ठेवण्यासारखं आहे. या शाळांमार्फत िख्र्तासी धर्माचा प्रसार तर केला जात नाही, अशी शंका तत्कालीन समाजधुरीणांच्या मनांत आली. १८४७ मध्ये बारासात येथे पहिली बिनसरकारी, बिनमिशनरी शाळा सुरू झाली. १८४८ मध्ये गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा कायदेपंडित म्हणून जॉन इलियट डिं्न्कवॉटर बेथ्यून कलकत्त्यास आला. विलायतेत असतानाच भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी त्यानं विचार केला होता. कलकत्त्यास त्यानं कौन्सिल ऑफ एज्युकेशनचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि कळकळीनं स्त्री-शिक्षणाच्या कामात लक्ष घातलं.
त्यानं १८४९ मध्ये मुलींची एक शाळा काढली. मुलींना नेण्या-आणण्यासाठी त्यानं एक घोडागाडीही ठेवली. लोकांनी `शिव! शिव! घोर कलियुग अवतरलं!' म्हणून काव काव सुरू केली. पंडित मदनमोहन तर्कालंकार यांनी भुवनमाला व कुंदमाला या त्यांच्या मुलींना शाळेत दाखल केलं, म्हणून (बिल्वग्राम) गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकलं. ईश्वरचंद्र पुढं सरसावले. त्यांनी १८५०मध्ये बेथ्यून स्कूलला सक्रिय पाठिंबा दिला. १८६८पर्यंत त्यांचा हा सहभाग अव्याहत होता. त्यांनी स्वत: पदरमोड करून ग्रामीण भागात पन्नासावर कन्याशाळा काढल्या. एव्हाना ब्राह्म समाजाचे विचार नवी कुमक मिळाल्यासारखे स्त्री-शिक्षणवाद्यांच्या मदतीस आले. महर्षी देवेंद्रनाथ ठाकुरांनी आपली कन्या सौदामिनी हिला बेथ्यूनमध्ये पाठवलं. ब्राह्म समाजाच्या अध्वर्यूनी `हिंदू बालिका विद्यालय' काढलं. त्यानंतर १८७६ मध्ये बंग महिला विद्यालय निघालं.
आता या मंडळींचे डोळे मुलींना प्रवेशपरीक्षेची दारं उघडली जावीत याकडे लागले. त्या काळी कलकत्ता विद्यापीठच कशाला, विलायतेतही मुलींना `एंट्न्न्स एक्झॅम'ला अनुमती नव्हती. महिला विद्यालयाच्या हुशार विद्यार्थिनी या परीक्षेसाठी सज्ज होत्या. द्वारकानाथ गांगुली यांनी त्या दिशेनं खूपच खटपट केली. विद्यापीठानं नाना सबबी सांगून टाळाटाळ केली. अखेर त्यांच्या चळवळीत आशेचा किरण दिसला तो सर आर्थर हॉबहाऊस या, विद्यापीठाच्या तत्कालीन उपकुलगुरूंच्या रूपानं! ते स्वत: स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते. परीक्षेस तयार असणाऱ्या कादंबिनी व सरला या मुलींची पूर्वपरीक्षा(प्रिलिमिनरी) घेण्यात यावी, असं त्यांनी सुचवलं. दोघी त्यात उत्तीर्ण झाल्या. विद्यापीठाला प्रवेशपरीक्षेसाठी परवानगी द्यावी लागली.
सरला दास हिचं तेवढ्यात लग्न झाल्यानं कादंबिनी एकटीच १८७८ मध्ये प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाली. एक डोंगर तर पार झाला. गव्हर्नर साहेबांनी तिला पुस्तकांची रास भेटीदाखल पाठवली! ही बातमी मुंबई व मद्रास येथे पोचताच उत्साहाची लाट उसळली आणि त्या विद्यापीठांनीही नियमात बदल करून मुलींना मॅटि्न्क परीक्षेस बसण्याची हरकत रद्दबातल केली. बेथ्यून स्कूलला जोडूनच मुलींचं कॉलेज निघालं. त्यातून कादंबिनी, व चर्च ऑफ स्कॉटलंडच्या कॉलेजातून चंद्रमुखी या बी.ए.परीक्षेस बसल्या व चांगल्या तऱ्हेनं उत्तीर्ण झाल्या. ब्रिटिश साम्राज्यातील पहिल्या महिला पदवीधर असा त्यांचा डिंडिम त्या काळी वाजत होता.
दोघी महिलांनी पुढं सार्वजनिक जीवनात भाग घेतला. कादंबिनी तर लंडनला जाऊन डॉक्टर होऊन आली. तिथं तिनं तीन पदव्या मिळवल्या. काँग्रेसच्या चळवळीतही ती अग्रेसर राहिली. १८९० मध्ये अधिवेशनाचे अध्यक्ष सर फिरोजशहा मेहता यांच्या आभार प्रदर्शनाचं भाषण तिनंच केलं. १९०६मध्ये काँग्रेस महिला परिषद संघटित केली. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील चळवळीसाठी तिनं निधी गोळा केला. पुढे बरीच वर्षे पूर्व भारतातील स्त्री मजुरांच्या स्थितीचा अभ्यास, सर्वेक्षण आणि सुधारणा यांना तिनं वाहून घेतलं. चंद्रमुखीनं एम.ए.होऊन स्त्री शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. ती बेथ्यून कॉलेजची प्राचार्य म्हणून ती निवृत्त झाली. चंद्रमुखी(१८६०-१९४४) व कादंबिनी(१८६१-१९२३) या दोघी कर्तबगार महिलांचं आघाडीचं कार्य भारतीय भगिनींना सदैव प्रेरणा देत राहील.
(संदर्भ : गंगाजळी-२)
(`मराठी माणसं' कडून)

घालीतसे वेढे दीसतसे जळी । आकांत सकळी मांडीयेला ।
नामा म्हणे होती दुश्चिन्हे बहूत । गोकुळी समस्त चिंतातूर ।।
कॉलेजांतले राज्य
शाळेचे दिवस संपवून पुढचा शिक्षणक्रम सुरू होण्याचे वय यौवनाच्या उंंबरठ्यावरचे असते. आधीच्या वयात असलेली घरातील व शाळेतील बंंधने सैलावतात. जगाची जाण येेणारे ते वय साशंकतेचे, उत्सुकतेचे, उमेदीचे असते. त्या वयाची रगही अशी असते की, ती कुठेेतरी प्रगट करण्याची खुमखुमीही असते. त्याकरिता त्या त्या शिक्षणसंस्थेकडून काही उपक्रम केले  जात असतात, जायला हवेत. त्यात सहल, संमेलन, खेळ, इत्यादींसह व्हॅलंटाईन डे सुध्दा  हवा. हे सगळे तत्व  म्हणून बरोबर आहे, पण तसल्या कारणांनी  हल्ली वाह्यात उन्माद बहकू लागला आहे. त्या उन्मादाला राजकारणी उपद्रवींचे  `मार्गदर्शन' लाभत असल्यामुळे त्या वयासाठी असणाऱ्या शिक्षणसंस्थांतून शिक्षकांना मारहाण होण्यापासून देशद्रोही आरोपांंच्या चळवळींपर्यंत, आणि तरुण पोरींवरील संकटापासून कॉलेजात कुठेतरी आग लावेपर्यंत कोणताही प्रकार होऊ शकतो अशी भीती संचारली आहे. त्यात कुठे कुणाला जबाबदारीचे भान असल्याचे दिसत नाही ही अधिक चिंतेची बाब आहे.

मध्यंतरी पुण्याच्या एका कॉलेजातून गेलेल्या सहलीचे चौदा विद्यार्थी कोकणातल्या समुद्रात बुडाले, त्यामागे इतर कोणतीही कारणे असली तरी मुलांची अतिउत्साही बेफिेकरी दुर्लक्षित करणे योग्य नाही. समुद्राच्या काठावर धोक्याची सूचना लिहिलेली असताना ती कॉलेजात शिकणाऱ्या मुलांना पुरेशी ठरायला हवी होती. असा अपघात पुन्हा होऊ नये म्हणून कोर्र्टापासून सर्वांनी जे उपाय सुचवले त्यात, समुद्रकाठी देखरेखीसाठी मनोरे  उभारणे किंवा कायमचा रखवालदार ठेेवणे असे चमत्कारिक  उपाय आले आहेत. भारताच्या अनेकानेक ठिकाणच्या समुद्रपुळणींवर अशी योजना करणे शक्य नाही, आणि तशी केल्यावर ती  आमच्या तरुणाईकडून जुमानली जाईल अशी आशा नाही. त्या वयातील तरुणांना शिक्षणसंस्थांनी वेेगळे काहीतरी शिकवले पाहिजे, त्याची खरी गरज आहे.

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये  नेमल्या गेलेेल्या प्राचार्यांविरोधात दीर्घकाळ आंदोलन चाललेे, त्यात भाग घेणारी `मुले' बरीच वर्षे त्याच संस्थेत `राहिलेली' बाप्ये होती हेही उघड झाले. संस्थेचा प्राचार्य अपात्र म्हणून आंदोलन करायचे झाले तर देशातली थोडीच कॉलेजे वगळली जातील. विद्यापीठांच्या कुलगुरूंचेही पवाडे आजकाल ऐकायला मिळतात, पण त्यांच्या अपात्रतेवरून विद्यार्थ्यांंनी तिथे आंदोलन केले गेलेले नव्हते, ते या संस्थेत घडण्याची कारणे फार वेगळी आहेत. त्यातले एक कारण हे विद्यार्थ्यांच्याच पात्रतेवर प्रश्नचिन्ह उमटविणारेे आहे. आपल्याकडे कॉलेजच्या निवडणुका व संमेलने रद्द करण्याचा निर्णय झाला त्यास देशातील असहिष्णुता वगैरे कारणीभूत नाही तर त्या कारणांनी माजणारे सामाजिक अराजक कारण आहे. तरीही जिथे वातावरण त्यातल्या त्यात  ठीक असते,  किंवा मुला-पालकांच्या मागणीचा रेटा असह्य असतोे अशा काही कॉलेजांत  संमेलन न होता बक्षिस वितरण, गुणदर्शन  असल्या काहीतरी नावाखाली कार्यक्रम करावा लागतो. तिथे कोणा प्रमुख पाहुण्याचे भाषण ऐकण्यासाठी थांबण्याची किमान सभ्यताही सांभाळली जात नाही. हे `गुणदर्शन' कसे चालू द्यावे?

या किंंवा या प्रकारच्या गढूळ वातावरणाची आपल्याकडे आता सवय करून घ्यायला हवी, तर मग त्या तुलनेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या भारदस्त नावाच्या दस्तुरखुद्द दिल्लीस्थित संस्थेत, अत्युच्चपदीचा गोंंधळ व्हावा हे ओघानेच येते. काश्मिर खोऱ्यात विघातक कारवाया करण्याच्या आरोपावरून अफजल गुरू नावाच्या `गुरुवर्या'स फाशीची शिक्षा झाली, ती त्याच वेळी अंमलात आली नाही. तब्बल बारा तेरा वर्षांनी तो फासावर चढविला गेला, त्यावेळी काश्मीरच्या निवडणुका तोंडावर होत्या, आणि तिथल्या हिंदू मतांच्या आधाराची काँग्रेसला चिंता होती. त्या राजकीय घाईत तो निर्णय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना घ्यावा लागला. पण काही लोकांस अफजल गुरूविषयी आत्मीयता असू शकते. त्याच्या फाशीच्या दिवशी त्याची `पुण्यतिथी' समजून, घोषणा देण्याचा उद्योग काही विद्यार्थ्यांनी केला. ही बाब कोणत्याही निकषावर कोणत्याही तर्काने टिकणारी नाही.

अफजल गुरू या व्यक्तीला या देशाच्या संविधानाप्रमाणे कायदेशीर शिक्षा झाली. याचा अर्थ तो या देशाचा गुन्हेगार होता. यापुढे त्याचा उदोउदो करणेे कदापि योग्य नाही. जे तसे करू पाहतील त्यांच्यावर कारवाई तर व्हायला हवी. त्याचा गौरव करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नसतात. त्यांचा कैवार घेऊन नसता वितंडवाद घालणाऱ्या विचारवंतांना आवरायचे कसे हा मोठाच प्रश्न होऊन बसला आहे. एकदा या देशाच्या न्यायप्रक्र्रियेतून गेल्यानंतर सर्र्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्र्णय मानावाच लागतो. इतकेच नव्हे तर मनातून तो पटो न पटो त्या निर्णयाचा सन्मान करावा लागतो. इथे तर  असा कुणी भगतसिंह फाशी गेलेला नाही की ज्याचेे बलिदान राष्ट्नसाठी मानावेे! त्याच्याबद्दल कुणाला आपलेपणा वाटत असेल तर तोे त्याच्यापुरता प्रश्न आहे, त्याच्यासाठी दिल्लीतल्या बड्या शिक्षणसंस्थेत उघड नारेबाजी करणे निषेधार्र्ह आहेे, दंडनीय आहे. त्याचा  कैवार घेऊन संसदेपर्यंंत धिंगाणा करण्याचे कारण नव्हते. अर्थात तसे करण्यासाठी निमित्तच हवेे होते असेही असेल.

याच संदर्भात काही ठिकाणी नथुराम गोडसे याचेही नाव निघणार आहे. आज काहीजण नथुरामचे काम फारच थोर असल्यासारखे त्याची पुण्यतिथी वगैरे जाहीर कार्यक्रमात `साजरी' करतात. काही तज्ज्ञ मंडळींच्या मतानुसार गांधीजींच्या खुनाला नथुरामचीच गोळी कारणीभूत झाली असे नाही. वास्तविक त्याही खटल्याचा निकाल लागून नथुरामला फाशीही झाली, हे प्रकरण काळाआड गेले. आज पुन:पुन्हा त्या कारणावरून ब््रााह्मण समाजाला हिणवण्याचा एक विद्वेषी व विखारी उद्योग चालतो, तो जितका वाईट आहे, तितकाच हा पुण्यस्मरण उद्योग आहे. नथुरामचे श्राध्द वगैरे करणे हा कुणाच्या व्यक्तिगत श्रध्देचा भाग होऊ शकतो पण आपल्या स्वतंत्र देेशाच्या सर्वाच्च न्यायासनाने निर्णय ठरविल्यानंतर अशा प्रकारे वेगळा सूर जाहीरपणे लावणे उचित नाही. शास्त्रीजी, नेताजी, आणि अशा काही घटनांतही कुणाला काही वेगळेे वाटू शकते. ते त्यांचे त्यांचे त्यांच्यापुरते मत असेल. पण त्याचा जाहीर बभ्रा करणे असंवैैधानिक, - म्हणून गंभीर दखलपात्र ठरते.

याच कार्याकार्य भावाने किंवा कार्यकारण चिकित्सेने नेहरू विद्यापीठातील तथाकथित विद्यार्थ्यांनी अफजल गुरूच्या गौरवार्थ केलेली नारेबाजी खपवून घेता कामा नये. काश्मीरमध्ये दंगे करणाऱ्या अतिरेक्यांस भारतीय सेना कंठस्नान घालते, त्या अतिरेक्यांना पाकिस्तानात किंवा त्यांच्या तळावर हुतात्मा मानले जात असेल; पण इथे श्रीनगरात कोणी त्यांना जाहीर आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम केला तर त्यास देशद्रोहाखेरीज काय नाव द्यायचे ?

हा सर्व मामला विद्यापीठात होणे हे तर आणखी वाईट आहे. उगवत्या तरुणंाची ही देशस्थिती विषयक कर्तव्यजाणीव मानायची की काय ? तिकडे वेमुलाची आत्महत्या त्याच प्रकारे  `धुमसत' ठेवली जात आहे. यात प्रश्नांमागील मूळ कारणांचा शेाध घेऊन त्यांवर उपाय करण्याचा प्रयत्न कोणीच करतांना दिसत नाही. चांगल्या कामाचे श्रेय घेण्यावरून जसे राजकीय भांडण चालते तसे वाईट घटनेचे अपश्रेय लादण्यासाठी सर्व थरांचे प्रयत्न चालले आहेत. या वाईट प्रथांची लागण कॉलेज विश्वात झाली असून त्या वयोगटाने बेभान होण्याला आधीच्या पिढीचा हा आदर्श कारण ठरतो आहे. संसदेच्या अधिवेशनात खासदारांनी गैरहजर राहणे आणि पोरांनी कॉलेजच्या तासांना दांडी मारणे यांत खूप साम्य आहे. म्हणूनच आजकालच्या कॉलेजविश्वात ज्या घडामोडी चालतात, त्या भावी संकटांची चाहूल असल्याचे भय आहे. संमेलन किंवा सामन्यांपुरत्या त्या मर्यादित राहतील असे नाही, अतिरेक्यांंचा गुणगौरव ही त्यापुढची पायरी असू शकते.

खेड्यांपेक्षा शहरांत समस्या अधिक
शहरांतील झोपडवस्त्यांमध्ये प्रसंगवशात आसरा घ्यावा लागलेल्या समाजसमूहांतील महिलावर्गाला स्वच्छतागृहे आणि शौचालयांच्या असुविधेपायी ज्या प्रकारच्या संकटांचा सामना दररोज करावा लागतो त्यांची कल्पनाही एरवी येणार नाही. तुलनेने खेडेगावातील महिलांचे जीणे बरे, असे म्हणायचे. घरी अथवा गावात सुविधा उपलब्ध नसेल तर प्रातर्विधीसाठी उघड्यावर जाण्याचा पर्याय खेडेगावातील महिलांना निदान खुला तरी असतो. शहरांत गर्दीच्या लोंढ्यांपायी ते देखील महिलांना शक्य होत नाही. नाइलाजाने का होईना पण भर रस्त्यात कडेला वा कोठे तरी आडोशाला देहधर्म उरकणे पुरुष मंडळींना एकवेळ शक्य बनते; मात्र स्त्रियांची या संदर्भात होणारी कोंडी कमालीची दयनीय असते. रोजच उद्भवणाऱ्या या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शहरांतील महिलांनी शोधलेले उपाय व राबवलेली व्यूहरचना त्यांच्या आरोग्यास कमालीची अपायकारक ठरते. वेळेवर मलमूत्रविसर्जन न केले गेल्याने शारीरिक वाढ खुंटणे, पोटाचे व पचनसंस्थेचे विकार होणे, मूत्रमार्गातील विषाणूसंसर्गाला वारंवार बळी पडणे यांसारख्या व्याधी झोपडवस्त्यांमधील महिलावर्गाच्या जणू पाचवीलाच पुजलेल्या दिसतात.
सार्वजनिक शौचालयांचा आसरा घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या एका संकटाची तलवार डोक्यावर असते. सार्वजनिक स्वच्छतागृहे कमालीची अस्वच्छ किंवा वापरण्यायोग्य नसतात. नाइलाजाने तिथे जाणाऱ्या महिलांना मग भय भेडसावत राहते ते अत्याचारांचे! दिल्लीतील चार झोपडवस्त्यांमध्ये अभ्यासकांनी केेलेल्या पाहणीद्वारे पुढ्यात अवतरणारे निष्कर्ष व वास्तव भीषण, चिंताजनक आणि संताप येण्याजोगे आहे. समस्येवर मात करण्याचा महिलांनी शोधलेला उपाय म्हणजे दिवसातून शक्यतो एकदाच देहविधी उरकण्याची सवय शरीराला लावणे. शौचकूपाच्या आजूबाजूलाच इतकी घाण व मैला साठलेला असतो की एकदा तिथे जाऊन आल्यानंतर अन्नावरची वासनाच उडून जाते. नाइलाजाने त्या सुविधेचा आधार घेणाऱ्या महिलांना सामना करावा लागतो तो स्वच्छतागृहांच्या परिसरात उंडारणाऱ्या टोळभैरवांचा. हे सगळे चुकविण्यासाठी काही महिला व विशेषत: तरुण मुली तीन-तीन, चार-चार दिवस देहविधी उरकण्याचेच टाळतात. शौचकूपांच्या खोल्यांमध्ये बाहेरून गोट्या अगर दगड फेकणे, दरवाजाच्या फटींमधून डोकावण्याचा प्रयत्न करणे अशा घृणास्पद चाळयांनाही महिलांना अनेकदा सामोरे जावे लागते.
रस्तोरस्ती वेगळी स्वच्छतागृहे व मुताऱ्यांचा तर घाऊक दुष्काळ दिसतो. शहरांतील पुरुष त्यांची निकड कशीबशी भागवतात. मात्र परिस्थितीवशात हतबल झालेल्या महिलांना शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या तुटपुंज्या झुडुपांचा अथवा रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवलेल्या मोटरगाड्यांचा आसरा घेण्याखेरीज अन्य पर्यायच उरत नाही. हा अनवस्था प्रसंग शक्यतोवर टाळण्यासाठी बहुसंख्य महिला दिवसा अत्यंत कमी पाणी पितात. विकलांग वा व्यंग असलेल्या(स्पेशल) महिलांच्या या संदर्भातील अडचणी तर आपल्या विचारांच्या कक्षेत अजून प्रवेशल्या नसतील. गर्भवती, ऋतुमती स्त्रियांच्या समस्यांचा तर केवळ विचारही अंगावर काटा आणणारा ठरतो.
सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालये यांचा वापर महिला कमालीच्या हतबलतेपायी करत राहतात. हा एक विलक्षण किळसवाणा अनुभव असतो. याचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्यावर अपरिहार्यपणे घडत राहतातच. रोगांना व व्याधींना ही अस्वच्छता निमंत्रण देते. कायिक व मानसिक व्याधींची यादी वाढत जाणारी आहे. यातील बहुतेक आजार परिस्थितीजन्य असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पुरेशी स्वच्छता राखली न गेल्याने आजारांचा प्रादुर्भाव वारंवार होत राहतो असे वैद्यकीय विश्लेषण सांगते. बहुतेक महिला पाणी अत्यंत कमी पितात. अनैसर्गिकपणे प्रदीर्घ काळापर्यंत मलमूत्रावरोध करतात. त्यातूनच शरीरांतर्गत जंतूसंसर्गाला अवसर होतो. झोपडवस्त्यांमधील मुले आजूबाजूलाच शौचास बसतात. तिथेच ती खेळत राहतात. परिसरातील जलसाठे प्रदूषित होतात. औषधोपचारांवरील खर्च वाढतो. रोजगार बुडाल्याने बोजा कुटुंबावर येतोच.
स्वच्छतागृहे व शौचालये यांची सुधारित सुविधा उपलब्ध होणे हे कसे, का आवश्यक आहे याचे अधिक वेगळे विवरण करण्याची गरज पडू नये!
(संदर्भ - अर्थबोधपत्रिका)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन