आनंदीबाई जोशी
(०१/०३/१८६५ - २६/०२/१८८७)
या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. तरुणपणातच क्षयरोग जडलेल्या डॉ.आनंदीबाई जोशी यांच्यावर पुण्यातील तत्कालीन नामांकित वैद्यांनी उपचार करण्यास नकार दिला. कारण आनंदीबाइंर्नी परदेशगमन केल्याच्या कारणावरून, ज्ञानी देशी वैद्यराज आपली विद्या बाटविण्यास तयार नव्हते. परिणामी खडतर परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर एम.डी.पदवी संपादन करणारी केवळ २२ वर्षांची ही बुद्धिमान विवाहित स्त्री मृत्यूमुखी पडली. याच आनंदीबाइंर्नी एम.डी.परीक्षेसाठी `आर्यहिंदूंचे सूतिकाशास्त्र' हा प्रबंध लिहिला होता. सन १८८३ मध्ये आनंदीबाइंर्ना त्यांच्या आवडीनिवडी आणि एकंदरच जीवनाविषयी विचारणा केली असता त्यांनी दिलेली उत्तरे -
इतिहासातील आवडती व्यक्ती - राजा रिचर्ड
शेवटपर्यंत कोणता ग्रंथ बाळगाल, बायबल सोडून - ए हिस्टरी ऑफ द वर्ल्ड
व्यवसाय - सर्वसामान्यांच्या हिताचा
नावडता दुर्गुण - अप्रामाणिकपणा आणि व्याभिचार
तुम्ही सोडून दुसरे कोण होणे आवडेल - कुणीच नाही.
तुमची सुखाची कल्पना - परमेश्वरावर विश्वास
दु:खाची कल्पना - मनमानी वागणे
तुमचा जगावेगळा गुणधर्म - अजून सापडला नाही.
तुमच्या पतीचा - परोपकार
आयुष्याचे ध्येय - उपयोगी पडणे
तुमचे ध्येयवाक्य - देव अवश्य मदत करील
घृणास्पद गोष्ट - गुलामगिरी आणि परावलंबन
Comments
Post a Comment