गोव्यातील आल्मोद हायस्कूलचे शतक
आपले पूर्वदिव्य
लोकमान्य टिळकांचे दोन विश्वासू देशभक्त छात्र हरी गणेश फाटक आणि दत्तात्रय विष्णू आपटे यांना लोकमान्यांनी शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेण्याकरिता आणि ते जमले नाही तर गोव्यात शैक्षणिक कार्य करण्यासाठी १९११ मध्ये पुण्यातून गोव्याला पाठविले. फाटक-आपटे या जोडीने पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात तळ ठोकून कारवाया चालू ठेवल्या. त्यावेळी अहवाल गुप्तहेर खात्याने मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोचविला. परंतु पोर्तुगीज शासनाने फाटक-आपटे जोडीविरुद्ध काही कारवाई केली नाही.
ब्रिटीशांविरोधात गोव्यात राहून काही करता येईल असे या दोघांना वाटेना. त्यांनी गणेशचतुर्थी १९११ या मुहूर्तावर `आल्मेद' या पोर्तुगीज शासकाच्या नावाने शिक्षणसंस्थेची स्थापना केली. केरीचे प्रसिद्ध देशभक्त समाजसेवक दादा वैद्य यांनी यासाठी पुढाकार घेऊन या तरुणांना गोमंतकात बोलावून घेतलेले होतेे. या त्रिकूटाने १९११ मध्ये स्थापन केलेल्या गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या `आल्मोदा हायस्कूल'ने शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यानिमित्ताने त्यांची छायाचित्रे संस्थेच्या कार्यालयात नुकतीच लावण्यात आली.
दत्तात्रय विष्णू आपटे यांचा जन्म १८८० चा. जमखिंडी (कर्नाटक) येथे मॅटि्न्क झाल्यावर पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (१९०२), वंगभंग चळवळीत सहभाग, यवतमाळच्या राष्ट्नीय शाळेत हरीभाऊ फाटक या ज्येष्ठ आचार्याचे सहकारी म्हणून अध्यापन करीत असतानाच `हरिकिशोर' साप्ताहिकात लेखन. त्यानंतर मुंबईत राष्ट्न्मत दैनिकात सहसंपादक. ते बंद पडल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या आदेशावरून हरिभाऊ फाटक यांच्याबरोबर गोमंतकात येऊन `आल्मोद हायस्कूल'ची स्थापना करण्यात सहभाग. तिथे संस्कृताध्यापक म्हणून काम करीत असतानाच पोर्तुगीज भाषा शिकले. परंतु पाच वर्षांत दुसरे महायुद्ध सुरू होताच तिथे राहणे अशक्य झाले आणि हरिभाऊ फाटक यांच्याबरोबर पुण्यात आले. `इतिहास संशोधक' म्हणून कीर्तिमान होऊन १९४३ मध्ये अमर झाले.
पुणे येथे प्रथम दत्तात्रय आपटे पत्रकार क्षेत्रात `चित्रमयजगत्' व `शालापत्रक' या मासिकांचे संपादकीय काम पाहात. त्यानंतर `आनंदाश्रम' संस्थेचे व्यवस्थापक पदही त्यांनी सांभाळले. मुधोळकर महाराजांनी यांच्याकडून मुधोळ राजघराण्याचा इतिहास लिहून घेतला. इतिहासकार राजवाडे यांचे शिष्योत्तम या नात्याने आपटे यांनी व्यासंगी अभ्यासकांची प्रभावळ उत्पन्न केली. मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल व्यासंग करून १)इतिहास मंजिरी २) श्रीरंगपट्टणची मोहीम ३) शिवचरित्र प्रदीप ४) शिवभारत-प्रस्तावना ५) घोरपडे घराण्याचा इतिहास ६) शिवचरित्र निबंधावली ७) पत्रकारसंग्रह ही ऐतिहासिक महत्तेची ग्रंथसंपदा निर्माण केली.
इतिहासाप्रमाणेच `गणित ज्योतिष' या संस्कृत विद्या-विश्वातील महत्त्वाच्या शास्त्रावर त्यांचा गाढा व्यासंग होता. करणकौस्तुभ, बीजगणित, लीलावती या प्राचीन गणितशास्त्र विषयक ग्रंथरत्नांचे विवरण केले. केरोपन्ती साधनांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. पुणे भारत इतिहास संशोधन मंडळ या विश्वख्यात संस्थेचे नुसते सन्मान्य आजीव सदस्यच नव्हे तर ते उपाध्यक्षही होते.
हरिभाऊ फाटक यांचा जन्म १०/११/१८७४. मृत्यू २५/५/१९६७. फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (१८९५) झाल्यानंतर आठ वर्षे विदर्भातील अकोट विद्यालयात ते शिक्षक होते. राष्ट्न्सेवेसाठीच जीवन समर्पण ही शपथ घेऊन यवतमाळच्या राष्ट्नीय शिक्षण विद्यालयात `आचार्य' म्हणून विद्यादानाचे व्रत घेतले. रा.स्व.संघ संस्थापक डॉ.हेडगेवार यांनी लाडक्या विद्यार्थ्याला राष्ट्न्सेवेची शपथ दिली.
लोकमान्य टिळकांचा `गोव्यात जा' हा आदेश शिरसावंद्य मानून हरिभाऊ फाटक दत्तोपंत आपटे यांच्यासह १९११ मध्ये गोव्यात आले. त्यांनी जर्मनीकडून शस्त्रास्त्रे मिळविल्याचा प्रयत्न केल्याचे सांगतात. १९१८ मध्ये महात्मा गांधींना सर्वप्रथम पुणेकरांसमोर आणले ते हरिभाऊ फाटक यांनीच. १९१६ ते १८ होमरूल लीगचे कार्य केल्यानंतर १९२१ च्या मुळशी सत्त्याग्रहात ते सेनापती बापटांचे साक्षीदार होते. १९३०, ३२, ४२ असा तीनदा त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला. सर्वोदयी राष्ट्न्भक्त या नात्याने त्यांनी वनमहोत्सव, स्वच्छता मोहीम, पर्वतीवर वृक्षारोपण, विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना इ. कार्ये करीतच या थोर राष्ट्न्भक्ताने शेवटचा श्वास घेतला. असे हे सच्चे देशभक्त `आल्मोद' (फोंडा-गोवा)चा एक संस्थापक होते हे आज महाराष्ट्नत किती माहीत आहे?
- पं. वसंत अनंत गाडगीळ
(श्री.रामचंद्र आपटे-फोंडा गोवा यांच्या सौजन्याने : फोन ०८३२-२३१४२०२)
Comments
Post a Comment