वानप्रस्थी कर्तव्य
गतकाळातील काळा कालखंडसुद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यावर, कालांतराने रम्य भासू लागतो. माणसाला भविष्याची चिंता सतावते, वर्तमान खडतर भासते; पण भूतपूर्व स्मृती मात्र सुखावतात. साध्यासुध्या व्यक्तीलाही आयुष्याच्या संध्याकाळी संध्यारंगांसमवेत स्मरणरंजन करायला खूप आवडते; मग ज्यांचा सगळा जीवनप्रवास वाटावळणांनी, चढउतारांनी भरून गेलेला असतो, त्याच्या बाबतीत सांगण्याजोगे,-आणि पुढच्या पिढ्यांनी ऐकण्याजोगे किती किती असेल! परंतु अशा अनुभवसंपन्न व्यक्तीसुद्धा स्वत:च्या आठवणी लिहून ठेवत नाहीत, हा प्रवाद नसून सार्वत्रिक वास्तव आहे.
चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकाराने कोणत्याही भाषेचे दालन समृद्ध असते. तथापि ते लिहिले जाण्याकरिता चरित्रनायक महान असला पाहिजे असा गैरसमजही असतो. माणूस अगदी सामान्य, मोरू किंवा बाळू या वर्गातला असला तरी त्याच्या चरित्रकथनात त्या त्या काळातील समाजस्थिती उमटत असते. लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली स्मृतिचित्रे, त्यातील साहित्यगुणामुळे श्रेष्ठ ठरली असे नाही, पण त्या काळची समाजस्थिती त्यांतून समजली, आणि एका साध्या घरच्या महिलेने टिपलेले त्या काळातील क्षण हे आज इतक्या वर्षांनंतर महत्त्वाचे व रंजक ठरले. पु.लं.चे `असा मी असामी' हे अख्खे पुस्तक धोंडो भिकाजी ह्या कारकूनश्रेष्ठाचे बहारदार कथन असून त्याच्याही म्हणण्याप्रमाणे `राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे' तरी चिमणीने उडूच नये की काय? शे-दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या आलतूफालतू पत्रातूनही त्यावेळची स्थिती पुढे येते. इतिहासकारांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो, पण घरच्या कोणा पूर्वजाचे साधेसुधे चिटोरपत्रसुद्धा आज कित्येक घरांतील पुढच्या कितीतरी पिढ्या जपून ठेवत असल्याचे आपण पाहतो. या विशेष कारणासाठी तरी सर्वसाधारण व्यक्तीनेसुद्धा आपल्या वानप्रस्थातील एक स्वयंस्वीकृत कार्य म्हणून, आपले समग्र चरित्र जास्तीत जास्त तपशीलाने लिहायला हवे. अलीकडच्या काळात पुष्कळ घराण्यांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध होत असतात. त्या प्रकल्पाच्या प्रत्येक संयोजकाचे एकच एक मत असे असते की, आपापल्या घरच्या मंडळींबद्दल आणि स्वत:बद्दलसुद्धा माणसे माहितीच देत नाहीत. असे करण्यात त्यांची विनम्रता असू शकेल, कार्यबाहुल्य असू शकेल, किंवा दुर्लक्षही असू शकेल. कदाचित अक्षरशत्रू म्हणण्याएवढे लेखनदुर्भिक्ष्य असू शकेल; पण अशी माहिती नोंद न करण्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने फार मोठा अन्याय घडत असतो हे ध्यानात घेतले पाहिजे.
***
पलूसच्या पं.वि.दि.पलूसकर शिक्षणसंस्थेच्या वतीने `शिक्षणविचार' हे पुस्तक प्रकाशित झाले, त्यात महाराष्ट्नतील नामवंत मंडळींचे विचार संकलित केलेले आहेत. वसंत आपटे यांनी मुलाखती घेऊन व इतर संकलन करून हे पुस्तक संपादित केलेले आहेे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे म्हणतात.....
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून भारतात नव्या युगाचे नवे वारे खेळू लागले आहेत. भारताकडे पाहण्याचा जगाचा आजवरचा दृष्टिकोण बदलत असल्याचा प्रत्यय येत असून विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण, संशोधन, कला-क्रीडा वगैरे क्षेत्रांत भारतीय क्षमतेचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या एक-दीड वर्षांत केंद्र व राज्यस्तरावर सत्तांतर झाल्यानंतर एकूणच आपल्या सांस्कृतिक संपन्नतेलाही सन्मान्य आदराचे स्थान मिळत असल्याचा आनंद जनतेला लाभत आहे. भारताची लोकसंख्या जगात वरच्या क्रमांकावर असल्याने त्याचे `मनुष्यबळा'त रूपांतर होणे जगालाही आता अपेक्षित आहे. अर्थातच त्यासाठी उगवत्या पिढीचे शिक्षण, ही बाब फार महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्नच्या शिक्षणक्षेत्रात त्या दृष्टीने जे बदल होणे आवश्यक आहेत त्यांविषयी सर्वत्र चर्चा होत असते. शाळा-महाविद्यालयांशी संबंधित असणारे सर्वच घटक ती चर्चा उत्सुकतेने ऐकत-वाचत असतात. तथापि या क्षेत्रातून निवृत्त झालेला, अनुभवांतून काही चिंतन केलेला, व त्याआधारे येत्या काळाचा वेध घेऊ शकणारा असा एक मोठा विचार-गट, आपली मत-मतान्तरे एकत्रित मांडू शकला तर ते उचित दिशादर्शन ठरेल यात वाद नाही. म्हणूनच पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहुउद्देशीय शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील, `शिक्षणविचार' या पुस्तकाचा उपक्रम मला स्वागतार्ह वाटतो. शिक्षणसंस्था जर या प्रकारे शिक्षण-विचारांचे प्रकटन करू शकल्या तर तो अभिनव व उपयुक्त प्रयोग ठरेल. शिक्षणविश्वातील सर्व घटकांना या पुस्तकांतून खूप काही मिळेल व त्यातून शासनाच्या शैक्षणिक धोरणांस बळकटीच मिळेल, असा विश्वास वाटतो.
गतकाळातील काळा कालखंडसुद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यावर, कालांतराने रम्य भासू लागतो. माणसाला भविष्याची चिंता सतावते, वर्तमान खडतर भासते; पण भूतपूर्व स्मृती मात्र सुखावतात. साध्यासुध्या व्यक्तीलाही आयुष्याच्या संध्याकाळी संध्यारंगांसमवेत स्मरणरंजन करायला खूप आवडते; मग ज्यांचा सगळा जीवनप्रवास वाटावळणांनी, चढउतारांनी भरून गेलेला असतो, त्याच्या बाबतीत सांगण्याजोगे,-आणि पुढच्या पिढ्यांनी ऐकण्याजोगे किती किती असेल! परंतु अशा अनुभवसंपन्न व्यक्तीसुद्धा स्वत:च्या आठवणी लिहून ठेवत नाहीत, हा प्रवाद नसून सार्वत्रिक वास्तव आहे.
चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकाराने कोणत्याही भाषेचे दालन समृद्ध असते. तथापि ते लिहिले जाण्याकरिता चरित्रनायक महान असला पाहिजे असा गैरसमजही असतो. माणूस अगदी सामान्य, मोरू किंवा बाळू या वर्गातला असला तरी त्याच्या चरित्रकथनात त्या त्या काळातील समाजस्थिती उमटत असते. लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली स्मृतिचित्रे, त्यातील साहित्यगुणामुळे श्रेष्ठ ठरली असे नाही, पण त्या काळची समाजस्थिती त्यांतून समजली, आणि एका साध्या घरच्या महिलेने टिपलेले त्या काळातील क्षण हे आज इतक्या वर्षांनंतर महत्त्वाचे व रंजक ठरले. पु.लं.चे `असा मी असामी' हे अख्खे पुस्तक धोंडो भिकाजी ह्या कारकूनश्रेष्ठाचे बहारदार कथन असून त्याच्याही म्हणण्याप्रमाणे `राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे' तरी चिमणीने उडूच नये की काय? शे-दोनशे वर्षांपूर्वीच्या एखाद्या आलतूफालतू पत्रातूनही त्यावेळची स्थिती पुढे येते. इतिहासकारांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो, पण घरच्या कोणा पूर्वजाचे साधेसुधे चिटोरपत्रसुद्धा आज कित्येक घरांतील पुढच्या कितीतरी पिढ्या जपून ठेवत असल्याचे आपण पाहतो. या विशेष कारणासाठी तरी सर्वसाधारण व्यक्तीनेसुद्धा आपल्या वानप्रस्थातील एक स्वयंस्वीकृत कार्य म्हणून, आपले समग्र चरित्र जास्तीत जास्त तपशीलाने लिहायला हवे. अलीकडच्या काळात पुष्कळ घराण्यांचे कुलवृत्तांत प्रसिद्ध होत असतात. त्या प्रकल्पाच्या प्रत्येक संयोजकाचे एकच एक मत असे असते की, आपापल्या घरच्या मंडळींबद्दल आणि स्वत:बद्दलसुद्धा माणसे माहितीच देत नाहीत. असे करण्यात त्यांची विनम्रता असू शकेल, कार्यबाहुल्य असू शकेल, किंवा दुर्लक्षही असू शकेल. कदाचित अक्षरशत्रू म्हणण्याएवढे लेखनदुर्भिक्ष्य असू शकेल; पण अशी माहिती नोंद न करण्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने फार मोठा अन्याय घडत असतो हे ध्यानात घेतले पाहिजे.
***
पलूसच्या पं.वि.दि.पलूसकर शिक्षणसंस्थेच्या वतीने `शिक्षणविचार' हे पुस्तक प्रकाशित झाले, त्यात महाराष्ट्नतील नामवंत मंडळींचे विचार संकलित केलेले आहेत. वसंत आपटे यांनी मुलाखती घेऊन व इतर संकलन करून हे पुस्तक संपादित केलेले आहेे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे म्हणतात.....
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून भारतात नव्या युगाचे नवे वारे खेळू लागले आहेत. भारताकडे पाहण्याचा जगाचा आजवरचा दृष्टिकोण बदलत असल्याचा प्रत्यय येत असून विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण, संशोधन, कला-क्रीडा वगैरे क्षेत्रांत भारतीय क्षमतेचा प्रभाव वाढत चालला आहे. गेल्या एक-दीड वर्षांत केंद्र व राज्यस्तरावर सत्तांतर झाल्यानंतर एकूणच आपल्या सांस्कृतिक संपन्नतेलाही सन्मान्य आदराचे स्थान मिळत असल्याचा आनंद जनतेला लाभत आहे. भारताची लोकसंख्या जगात वरच्या क्रमांकावर असल्याने त्याचे `मनुष्यबळा'त रूपांतर होणे जगालाही आता अपेक्षित आहे. अर्थातच त्यासाठी उगवत्या पिढीचे शिक्षण, ही बाब फार महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्नच्या शिक्षणक्षेत्रात त्या दृष्टीने जे बदल होणे आवश्यक आहेत त्यांविषयी सर्वत्र चर्चा होत असते. शाळा-महाविद्यालयांशी संबंधित असणारे सर्वच घटक ती चर्चा उत्सुकतेने ऐकत-वाचत असतात. तथापि या क्षेत्रातून निवृत्त झालेला, अनुभवांतून काही चिंतन केलेला, व त्याआधारे येत्या काळाचा वेध घेऊ शकणारा असा एक मोठा विचार-गट, आपली मत-मतान्तरे एकत्रित मांडू शकला तर ते उचित दिशादर्शन ठरेल यात वाद नाही. म्हणूनच पंडित विष्णू दिगंबर पलूसकर बहुउद्देशीय शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील, `शिक्षणविचार' या पुस्तकाचा उपक्रम मला स्वागतार्ह वाटतो. शिक्षणसंस्था जर या प्रकारे शिक्षण-विचारांचे प्रकटन करू शकल्या तर तो अभिनव व उपयुक्त प्रयोग ठरेल. शिक्षणविश्वातील सर्व घटकांना या पुस्तकांतून खूप काही मिळेल व त्यातून शासनाच्या शैक्षणिक धोरणांस बळकटीच मिळेल, असा विश्वास वाटतो.
Comments
Post a Comment