मनामनांत दीप लावू...
दिवाळी म्हणजे नरकासुराचा वध, आणि नरक म्हणजे अस्वच्छता, घाण, अमंगल असा भवताल, घर आणि कलुषित मनसुद्धा! या सर्व ठिकाणची साफसफाई करून शुभ संकल्पांचा दीप लावायचा, ही मूळ कल्पना आपण लक्षात घेतली, म्हणजे मग आजच्या काळातील दिवाळी कशी साजरी करावी याची दिशा स्पष्ट कळते.
कधी काळी - पन्नास-साठ वर्षांपूर्वी - साजरी केलेली दिवाळी आपल्या मनांत घर करून राहिलेली असते. त्यावेळी फटाके, फराळ, पहाटेच्या आंघोळी, सोंगट्याचा खेळ या सगळया रूढींचा आनंद घेतला. परंतु आजच्या काळात ते सगळे प्रकार तसे विसंगत आहेत. फटाक्यांच्या आवाजाचे प्रदूषण, शहरी दाट लोकवस्तीला धोका, आणि कागदकपट्याचा कचरा निर्माण करणारा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितका बरा; ही जाणीव आली तरच शुभकाल निर्माण करता येईल. याशिवाय, फटाक्यांच्या कारखान्यांत बालमजूर घातक वातावरणात काम करतात. त्यांना विम्याचे संरक्षणही नसते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्या असंख्य मुलांचा जीव धोक्यात जातो, हा विचार करायला हवा. फराळाचाही वेगळा विचार केला पाहिजे. `त्या' काळी ते जिन्नस अपूर्वाईचे होते. एकत्र कुटुंबातील पाककलेची ती बहार होती. आज बहुतांश घरांत हे पदार्थ विकत आणतात. ते सर्वत्र वर्षभर हवे तेव्हा मिळतात. शिवाय त्याकरिता वापरलेले तेल-धान्य कितपत शुद्ध-ताजे असेल याची खात्री नाही. मग तो फराळ केलाच पाहिजे याचा आग्रह सोडून देणे बरे नाही का?
पूर्वीच्या स्वस्थ जीवनमानात या सणाचा आनंदही स्वस्थपणी घेता येत होता. माणसं दहा-वीस कोसांच्या परीघात असायची. रम्यपणी प्रवास करून एकत्र येत होती. माहेरवाशिणी किंवा जावई किंवा आप्तस्वकीयांचा पाहुणचार स्वस्थतेने आस्वादता येत होता. नव्याने जुळलेले परिचय सहवासातून दृढ करता येत होते. आज अंतर सर्वच बाजूंनी वाढले. उगीच पुण्या-मुंबईहून किंवा गोवा-नागपूरहून एकदोन दिवसांच्या धावपळीतून पाहुणे येण्यात त्रासाचा भाग जास्त. सण-उत्सवाच्या काळात गाड्यांना गर्दी, रात्रीचा प्रवास, आणि आहारातील सैलपणा यात अनारोग्याचा धोका जास्त; सणाचा म्हणून आनंद कमीच. शिवाय कामाधंद्यानिमित्त एरवी प्रवास घडतच असतो. लेक-जावई यांच्या भेटी तर हल्ली लग्नापूर्वीही अनेकदा होऊन गेलेल्या असतात, त्यातले नाविन्य संपलेले!
थोडक्यात असे की, या सणांच्या निमित्ताने जे पूर्वी सुखसोहळे अनुभवले त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मूळ संकल्पना लक्षात घ्याव्यात. पूर्वीच्या घरांतून परसदारी दूर असणाऱ्या संडासात पणती लावण्याची दिवाळीत प्रथा होती. मूर्तिमंत नरकस्थानी दीप लावून, तिथेही स्वच्छतेचा उजेड पाडण्यासाठी तसे करत असतील. आज पुष्कळशा चकचकीत शौचगृहांत विजेचा लख्ख उजेड बारमाही असतोच, मग ती प्रथा नाहीशी होण्यास हरकत नाही. आपली सोसायटी, त्याच्या प्रवेशद्वारापासून स्वत: किंवा सामुदायिकरित्या स्वच्छ करावी. जिने, लिफ्ट, पाण्याच्या टाक्या या जागी अस्वच्छता असते. तिथे आपले हात फिरले पाहिजेत.
फराळाचे पदार्थ दहा-वीस कुटुंबांनी एकत्रित तयार करता येतील. निदान एक फराळ सर्वांनी एकत्र करता येईल. छोटी सहल एकत्र काढता येईल, त्यात पर्यटनाला प्राधान्य असावे. मात्र यातील प्रत्येक गोष्ट सहभागींनी स्वत: करावी. धान्य निवडण्यापासून भांडी घासण्यापर्यंत कुठे मजूरी किंवा कंत्राटी काम देऊ नये. उलट, आपल्या जवळपास, गल्लीत, सोसायटीत एरवी येणाऱ्या कामवाल्यांस सन्मानाने एकत्र बोलावून त्यांचा सन्मान करावा.
आपल्या प्रत्येक (सामुदायिक) वागण्यातून निसर्गाची आणि माणूसकीची जपणूक, संवर्धन, आस्वाद हे अपेक्षित असते. पुढच्या पिढ्यांसमोर आपण काय आणि कसे ठेवतो याचा विचार प्रौढांनी केला पाहिजे. पुढची पिढी, घरटी एक-दोन मुलांची असणार आहे. त्यांना सामुदायिक जीवनाचे धडे या सणांच्या-उत्सवांच्या निमित्ताने दिले पाहिजेत. त्यांना मामा-आत्या ठाऊक नसेल, भावंडे तर नाहीतच. पण आजी-आजोबा, शेजार, मित्रमंडळ, गुरुजन या सर्वांचा सहवास घडवून आणावा. पोस्ट-बँक-फोन-बस अशा सेवेतील कर्मचाऱ्यांचा परिचय करून द्यावा, त्यांना शुभेच्छा देऊन नमस्कार करायला सांगावे. कारण हा `आपला' परिवार असतो. सर्व जीवन परस्परावलंबी असते हे अशा उपक्रमांतून त्यांना समजेल. इतरांविषयी मनांतली अढी कमी होईल.
निसर्ग-विज्ञान-अध्यात्म-धर्म-व्यवहार अशी एक साखळी माणसाच्या आयुष्यात असते. त्यातील प्रत्येक कडे महत्त्वाचे असते. त्या आधारे संस्कृतीचे बंधन तयार होते. त्याचेच दृश्य स्वरूप म्हणजे आपले सण-परंपरा-उत्सव. त्यांचे स्थान अबाधित असते, असले पाहिजे. पण कालानुरूप त्यात परिवर्तन होत गेले पाहिजे. ते परिर्वतन, जितके सहज-सुलभ-आणि वेगाने आपण करू शकू तितकी प्रगती आपण साध्य करू. वर्तन परिवर्तन होत गेले तर हेच सण कालबाह्य न ठरता ते चिरंतन आनंदाचे होतील.
हा विचार करून तो प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी स्वत:ला उच्चभ्रू, विज्ञानवादी, लवचिक समजणाऱ्या वर्गावर सर्वाधिक आहे. नवा विचार, नवा आचार देण्याचीही एक परंपराच तयार होते. ती आपण जपावी. विचारांतील, बुद्धीतील जळमटे साफ करून ज्ञान-विज्ञानाचा दीप या जगी लावण्याचा संकल्प या दिवाळीत करावा.
मुलींच्या सहलीसाठी मदतीचे आवाहन
परिसरातील देवदासी मुलींसाठी आमची संस्था काम करते. त्या मुलींची सहल नेणार आहे. ८ वी - १२ वी च्या सुमारे २०० मुली सात-आठ दिवसांच्या प्रवासाला जातील. त्यासाठी खर्च मोठा आहेच, तो कसा करायचा ही चिंता आहे. या मुलींना स्वत:चे असे कोणी नाही. सगळया मुली संस्थेतच असतात. त्यांच्याखेरीज इतर भटके, विमुक्त, आदिवासी यांचीही कामे असतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. या कार्यास मदत करणारे कमी, उलट त्रास देणारे जास्त. हल्ली तर खूप वेगळी परिस्थिती आहे.
`उत्थान'च्या आश्रयात ३०० हून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. शासनाकडून आम्ही काही घेत नाही. शेतकऱ्यांकडून मदत म्हणून धान्य मिळत असते. `समाजसेवा' ही कार्यकर्त्याचे जगण्याचे साधन होऊ नये. ज्यांना कोणी नसतात अशीच मुले मुली जिद्दीने काहीतरी करून दाखवितात. मिळालेल्या संधीचे सोने करतात हे मी अनेक वर्षे पाहतो आहे. गेली दोन वर्षे उत्तर कर्नाटकात दुष्काळ होता. या मुलींना जगवणार कसे? शिक्षण द्यायला हवे. कॉलेज खर्च खूप आहे. हे सर्व कसे करायचे? जे आपले आहेत अशांना अडचणी सांगत असतो.
- डॉ.भीमराव गस्ती
(भटके - बेरड - पारधी - देवदासी यांच्यासाठी विलक्षण तळमळीने काम करणारे डॉ.भीमराव गस्ती यांच्या `उत्थान' प्रकल्पासाठी मदत, किंवा संपर्क यासाठी पत्ता - १७९, मारुती गल्ली, यमनापूर, बेळगाव मोबा.९७४०६३८९३०, ०९४२२८५९९८२)
राष्ट्न्धर्म जागवावा
- डॉ.विनोद बब्बर
- त्याचे असे झाले की, शहरातील एका वसतीतून मी चाललो होतो. त्याच वेळी त्या गल्लीतील शाळा सुटली आणि पोरांचा लोंढा रस्त्यावर पसरला. त्यातली काही पोरं माझ्याकडे पाहात होती. माझ्या दाढीमुळे ती मला मुस्लिम समजली आणि त्यांनी काही अपशब्द अकारण उच्चारले. मी घाईत होतो, तिथे न रेंगाळता पुढे गेलो, पण मनातून मला वाईट वाटले. काही अंतर चाललो असेन, तिथल्या मदरशाबाहेर काही पोरं उभी होती. माझी दाढी, पण माझ्या ढगळ अंगरख्याचा रंग पाहून मला ती पोरं `बाबाजी' म्हणाली आणि त्यावरून काही अपशब्द त्यांनीही उच्चारले. मी आतून दुखावलो. माझी केवळ वेशभूषा हिंदू आणि मुस्लिम दोहोंच्या अपशब्दांना निमित्त व्हावी? मी `यांना' जवळचा नाही, `त्यांना'ही जवळचा वाटत नाही; मग मी आहे तरी कोण? आतापर्यंत मोठी माणसे धर्माच्या नावावर रणकंदन करत होती, आता या छोट्या पोरांच्या मनात हे विष कोण भिनवत आहे? मी कित्येक वर्षे शाळा-कॉलेजांतून अध्यापन केले आहे. माझे कोणी विद्यार्थी कुठे-कधी भेटतात, तेव्हा असला भेद कुणी मनात न ठेवता आजही आदर व्यक्त करतात, हा माझा अनुभव आहे.
मी लवकरच त्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यांनी आपला अंगरखा झटकला. हा विषय त्यांच्या दृष्टीने नसती डोकेदुखीच होता. मी चिवटपणा दाखवून काही शिक्षकांशी एकत्रित बोललो. त्यावरून त्यांचे मत पुढे आले की, सध्या सरकारी धोरणे या प्रकारच्या भेदांची दरी वाढवत आहे. अल्पसंख्यांकना रोख पैसेवाटप, ती मुले शाळेत न आली तरी नाव रद्द न करणे, अनिवार्य समजून त्यांना उत्तीर्ण करणे, अनुदान त्यांच्या घरी नेऊन पोच करणे अशा कृतींमधून लहान बालकांच्या डोक्यात ही वेगळेपणाची भावना वाढते आहे. एका शिक्षकाच्या सांगण्यानुसार, एका बालकाने विचारले, `सर, हा माझा मित्र तर सगळा माझ्यासारखाच आहे; तर मग त्याला मुसलमान का म्हणायचं?' - यावर त्याची समजूत घालणे सोपे नाही. काही सुज्ञ लोकांनीही अशी मदत, अनुदान वगैरे गोष्टी धर्माशी जोडणे निखालस चूक असल्याचे मत दिले. पण आपले पंतप्रधान तर म्हणतात की, `देशाच्या संसाधनांवर प्रथम अधिकार अल्पसंख्यांकचा आहे.' असल्या विधानांवरून त्यांना `आर्थिक किंवा कोणत्याही बाबतीत कमजोर असणाऱ्यांना मदत देण्याच्या विषयात धर्माचा कुठे विचार करू नका', हे कोण कसे समजावून सांगणार?
कोणत्याही एका जाती-पंथ-संप्रदाय यातील पारंपरिक, भावनिक हितसंबंध समान असणार, हे तर निश्चित आहे. तथापि समाजात आर्थिक वर्गवारी असते, गरीब-श्रीमंत अशी विषमता असते; तोवर एकाच धर्माचे असूनही त्यांच्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक हितसंबंध समान असूच शकत नाहीत. एखादा हिंदू मजूर, किंवा कोणी मुस्लिम मजूर हा जरी आपल्याच धर्माच्या कारखानदाराकडे चाकरी करीत असेल तरी तो भांडवलदार, आपल्या फायद्यासाठी त्या आपल्याच धर्मातील मजूराचे `शोषण' करू पाहणार! त्याउलट हिंदू व मुस्लिम अशा दोन कारखानदारांचा दृष्टिकोण किंवा हित, आणि दोन भिन्नधर्मी मजूरांचे जीवनमान, शिक्षण-स्वास्थ्य, कार्यशैली समान असणार हे निर्विवाद आहे. परंतु काही अनुदान वगैरे किंवा हज यात्रेला मदत, असल्या गोष्टींव्यतिरिक्त त्या दोन्ही धर्मीय वर्गांत तसा काही फरक दिसत नाही.
वास्तविक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हजसाठी अनुदान देण्याची मागणी `गैर इस्लामी' म्हणून फेटाळली. त्या विषयाच्या औचित्याबद्दल इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीने चर्चा व्हायला हवी होती. पाकिस्तानप्रमाणे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला असता तर ती `धर्मात ढवळाढवळ' ठरवून, वेगळा काही `संसदीय' मार्ग काढला गेला असता. अहिंदू पोलिस अधिकारी मारला गेला तर त्याच्या घरी जाऊन मुख्यमंत्री सांत्वन करतात, त्याच्या वारसाला नोकरी देण्याची घोषणा करतात. खरे तर त्यात चूक काहीच नाही, पण तसे सर्वांच्याच बाबतीत घडत नाही. अशा प्रकारच्या मतलबी, राजकारणी, मतसंबंधी वागण्यातून समाजमनांत भेदभाव वाढून तो पोराटोरांपर्यंत जातो.
ही भेदभावाची वेदना घेऊन मी काही अन्यधर्मीय शाळांतून गेलो. आधुनिक, विज्ञानवादी शिक्षण मुलांसाठी उपलब्ध करण्याऐवजी त्यांनी धार्मिक शिक्षणालाच प्राधान्य दिले. `सर्वधर्म समान' हे मानायला त्यांची जीभ वळत नव्हती. `जगात सर्वश्रेेष्ठ केवळ आमचीच विचारधारा-' यावर ते ठाम होते. समाधान इतकेच की, `प्रामाणिकपणा व सभ्यपणा आणण्याची' सूचना त्यांना पटली असावी, ते गप्प राहिले. शाळेत धार्मिक शिक्षण देण्यास एका धर्माला सवलत आणि दुसऱ्यांवर बंधने, हेही आश्चर्य नाही काय? यातून शिक्षक व मुले काय बोध घेतील?
इथे मी `हिंदूंचे ते सगळे उत्तम', असे काही मानणारा मुळीच नाही. यातले काहीजण उचापती आहेतच. परंतु सर्वसाधारण हिंदू लोक आज सर्वधर्मांतील समभावाचा आदर करतात. आवश्यकता अशी आहे की, प्रत्येक धर्माचे `राष्ट्नीयकरण' व्हायला हवे. सर्वात आधी देश! जे देशहिताच्या विरुद्ध असेल, तो धर्मच नव्हे. आपसातील संबंधांत जो दरी निर्माण करतो तो भारतीय नाही, त्याचे नागरिकत्त्व रद्द करावे.
धर्म हे आपल्या व्यक्तिगत विश्वासाचे, श्रद्धेचे दुसरे नाव आहे. आपल्या सार्वजनिक जीवनात त्याचे प्रदर्शन नव्हे, नैतिक दर्शन झाले पाहिजे. योग्य-अयोग्य काय हे समजत असूनही मतांच्या गठ्ठ्यासाठी दुर्लक्ष करणारे लोक राष्ट्न्द्रोहीच आहेत. ते हिंदू, की मुसलमान - की अन्य कोणी हा प्रश्नच नाही; ते माणूस तरी कसे म्हणावेत? अशा लोकांना प्रोत्साहन देणाऱ्यांइतकेच, त्यांना गप्प राहून सहन करणारे आपण लोकही अन्नात विष मिसळू देण्यात सहभागीच मानावे लागेल.
सामान्य माणूस गप्प राहून सहन करतो, उगीच धार्मिक तेढ वाढून मारामाऱ्या होतील अशी भीती त्यामागे असते. गोरगरीब सामान्य माणसांना भडकावून त्यांना एकमेकांविरुद्ध खडे करणाऱ्या या धर्ममार्तंडांना हे कधी कळणार नाही की, बेकारी, भूक, भ्रष्टाचार यांविरुद्ध खरी लढाई असते. इंग्रजांनी तर त्याच फूटपाडी राजकीय धोरणाने आपल्यावर दीर्घकाळ राज्य केले. धर्म जर इथल्या स्वस्थ सुखी अस्तित्त्वाबद्दल खात्री देऊ शकत असेल तर, आपल्यातूनच फुटून वेगळया झालेल्या शेजारच्या मुलखात रोजची हिंसा, लूट, दंगे, अराजक का चालते? अफगाणिस्तान उध्वस्त का झाला? तिथे खऱ्या धर्मावर धर्मांधता अरेरावी करते, त्यामुळे धर्माच्या नावावरच शेकडो बळी पडतात, हे नाकारण्यात काय अर्थ आहे?
आपण सच्चे हिंदू-मुस्लिम नव्हे, तर सच्चे भारतीय कसे, कधी होऊ? हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम लॉ असली फुटीरता जाऊन सर्वसमावेशक समान कायदा कधी होणार? केवळ पाणीच नव्हे तर आता हवामानसुद्धा विषारी बनले आहे, विष कालविणारे कृतिशील आहेत. त्यांना थोडेसे तरी यश येते, हे दुर्दैवी आहे. आपल्या सर्वांनी या गोष्टीला प्राधान्य द्यायलाच हवे की, पुढच्या पिढीत तरी हा दुरावा, तिरस्कार आणि शत्रुत्त्वाचे विष किंचितही भिनणार-उतरणार नाही! संकल्प असा हवा की, भांडत न बसता मिसळून राहूया. दंगा नको, प्रगती करूया.
अमन के दुष्मन बहुतेरें, चमन को उजाड देंगे ।
अगर हम न जागे तो वे बखिया अुखाड देंगे ।।
- डॉ.विनोद बब्बर
संपादक `रट्निंकाष्कर',
(हिंदुस्थान समाचार, नवोत्थान सेवा)
कायद्याने अंधश्रद्धा थांबेल?
अंधश्रद्धा, दाभोळकर हत्त्या याबद्दल मी लिहिणारच होतो. आपल्या संपादकीयात त्याच विषयाला स्पर्श केलात म्हणून माझे विचार सांगतो. दाभोळकर आपल्याला भेटलेही असतील कदाचित, पण अंधश्रद्धा हा विषय कायद्याच्या व्याख्येत बसत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोणत्याही तथाकथित धर्माला विरोध नाही हे त्यांनी शतवार सांगूनही सनातनवाले त्यांना विरोध करतात. जादूटोणा, मंत्रतंत्र यामुळे होणारी फसवणूक थांबावी, विज्ञाननिष्ठा वाढावी हे घटनेतच नमूद केले आहे. एका देवदासीची जट कापताना तिच्या गळयातील माळ सौ.दाभोळकरांनी आपल्या गळयात घातली त्यांना काही कोप झाला नाही.
- सतीश पटवर्धन, कागवाड
(फोन : ०८३३९-२६४७०५)
सिद्धीविनायक मंदीर : आवाहन
दोणवली (ता.चिपळूण) येथे श्री सिद्धीविनायक मंदिर आहे. देऊळ सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वीचे आहे. सभामंडप जीर्ण शीर्ण आहे. श्री.परचुरे (गावचे खोत) यांच्या मालकी वहिवाटीचे आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे ते देवळाची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. गावात ब्राह्मणांची तीन घरे उरली आहेत. तीसुद्धा टिकणार नाहीत.
दोन पर्याय आहेत, हतबलतेने पाहात राहणे किंवा काही योजना करून देऊळ सुस्थितीत ठेवणे. देवळाचा न्यास (ट्न्स्ट) स्थापन केला आहे. प्राथमिक गरज म्हणून मुख्य भागाची दुरुस्ती, रंगकाम वगैरे केले आहे. त्यासाठी १.५० लाख खर्च केला आहे. सभामंडपाचे काम करावयाचे आहे. भविष्यात देवळाची व्यवस्था, पूजाअर्चा यासाठी तरतूद करावयाची आहे. या सर्व कामासाठी रु.१५ लाख खर्च अपेक्षित आहे. कळकळीने आर्थिक मदतीसाठी विनंती.
चिपळूण-गुहागर रस्त्यावर सुमारे १० किमी.वर गणेशखिंड आहेे. उत्तरेकडील रस्त्याने जाताना भोम-लालबाग या तिठ्यावर पोसरे गावाच्या पुढे परटवणे पऱ्यापासून दोणवली गावाची हद्द सुरू होते. दोणवली येथे सिद्धीविनायकाचे पेशवेकालीन मंदिर आहे. थोरले माधवराव पेशवे यांनी १७७० मध्ये हे देऊळ बांधले. गावाला रुंदी नसली तरी लांबी सात किलोमीटर आहे. पायथ्याला वाहणारी नदी, जी पुढे सुतवी बंदरामध्ये वशिष्ठी खाडीला मिळते. नदीपासून अर्धा डोंगर चढल्यावर वाड्यावाड्यांची वसती आहे. कोकणी वैशिष्ट्याने वसलेला हिरव्यागर्द झाडीचा गाव.
सिद्धीविनायकाचे मंदिर चौरस, पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यावर तीन स्तरांवर वीस मोदकसदृश छोटे घुमट आहेत.एकविसावा मोठा मोदक कळसावर आहे. घडवलेल्या जांभ्या चिऱ्यांची पोवळी आहे. मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती फिकट लालसर संगमरवरी पाषाणाची आहे. सिद्धासनामध्ये कमलासनावर बसलेली वरदमूर्ती आहे. गाभाऱ्यात श्री त्र्यंबकेश्वराची पिंडी आणि श्री विठ्ठलाची मूर्तीही आहे. हे देवस्थान परचुरे कुटुंबाच्या मालकीचे आहे. दोन फडके कुटुंबेही सक्रिय सहभाग घेतात. आलटून पालटून उत्सव साजरा करतात.
अध्यक्ष - वसंत सदाशिव परचुरे उपाध्यक्ष - मधुकर अ. फडके
खजिनदार - वीणा विश्वास गोगटे सचिव - अनिल दत्तात्रय फडके
बँकेचे नाव - बँक ऑफ महाराष्ट्न्, चिपळूण (खाते क्र.६०१०६७५६६०७)
संपर्क - श्रीकृष्ण वा. फडके, (फोन ०२२-२५४०५२५१, मो.९९२०२०८०३९)
सी-१, परमसुख सोसायटी, गावंड पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४४०६०२
दिवाळी म्हणजे नरकासुराचा वध, आणि नरक म्हणजे अस्वच्छता, घाण, अमंगल असा भवताल, घर आणि कलुषित मनसुद्धा! या सर्व ठिकाणची साफसफाई करून शुभ संकल्पांचा दीप लावायचा, ही मूळ कल्पना आपण लक्षात घेतली, म्हणजे मग आजच्या काळातील दिवाळी कशी साजरी करावी याची दिशा स्पष्ट कळते.
कधी काळी - पन्नास-साठ वर्षांपूर्वी - साजरी केलेली दिवाळी आपल्या मनांत घर करून राहिलेली असते. त्यावेळी फटाके, फराळ, पहाटेच्या आंघोळी, सोंगट्याचा खेळ या सगळया रूढींचा आनंद घेतला. परंतु आजच्या काळात ते सगळे प्रकार तसे विसंगत आहेत. फटाक्यांच्या आवाजाचे प्रदूषण, शहरी दाट लोकवस्तीला धोका, आणि कागदकपट्याचा कचरा निर्माण करणारा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितका बरा; ही जाणीव आली तरच शुभकाल निर्माण करता येईल. याशिवाय, फटाक्यांच्या कारखान्यांत बालमजूर घातक वातावरणात काम करतात. त्यांना विम्याचे संरक्षणही नसते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्या असंख्य मुलांचा जीव धोक्यात जातो, हा विचार करायला हवा. फराळाचाही वेगळा विचार केला पाहिजे. `त्या' काळी ते जिन्नस अपूर्वाईचे होते. एकत्र कुटुंबातील पाककलेची ती बहार होती. आज बहुतांश घरांत हे पदार्थ विकत आणतात. ते सर्वत्र वर्षभर हवे तेव्हा मिळतात. शिवाय त्याकरिता वापरलेले तेल-धान्य कितपत शुद्ध-ताजे असेल याची खात्री नाही. मग तो फराळ केलाच पाहिजे याचा आग्रह सोडून देणे बरे नाही का?
पूर्वीच्या स्वस्थ जीवनमानात या सणाचा आनंदही स्वस्थपणी घेता येत होता. माणसं दहा-वीस कोसांच्या परीघात असायची. रम्यपणी प्रवास करून एकत्र येत होती. माहेरवाशिणी किंवा जावई किंवा आप्तस्वकीयांचा पाहुणचार स्वस्थतेने आस्वादता येत होता. नव्याने जुळलेले परिचय सहवासातून दृढ करता येत होते. आज अंतर सर्वच बाजूंनी वाढले. उगीच पुण्या-मुंबईहून किंवा गोवा-नागपूरहून एकदोन दिवसांच्या धावपळीतून पाहुणे येण्यात त्रासाचा भाग जास्त. सण-उत्सवाच्या काळात गाड्यांना गर्दी, रात्रीचा प्रवास, आणि आहारातील सैलपणा यात अनारोग्याचा धोका जास्त; सणाचा म्हणून आनंद कमीच. शिवाय कामाधंद्यानिमित्त एरवी प्रवास घडतच असतो. लेक-जावई यांच्या भेटी तर हल्ली लग्नापूर्वीही अनेकदा होऊन गेलेल्या असतात, त्यातले नाविन्य संपलेले!
थोडक्यात असे की, या सणांच्या निमित्ताने जे पूर्वी सुखसोहळे अनुभवले त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मूळ संकल्पना लक्षात घ्याव्यात. पूर्वीच्या घरांतून परसदारी दूर असणाऱ्या संडासात पणती लावण्याची दिवाळीत प्रथा होती. मूर्तिमंत नरकस्थानी दीप लावून, तिथेही स्वच्छतेचा उजेड पाडण्यासाठी तसे करत असतील. आज पुष्कळशा चकचकीत शौचगृहांत विजेचा लख्ख उजेड बारमाही असतोच, मग ती प्रथा नाहीशी होण्यास हरकत नाही. आपली सोसायटी, त्याच्या प्रवेशद्वारापासून स्वत: किंवा सामुदायिकरित्या स्वच्छ करावी. जिने, लिफ्ट, पाण्याच्या टाक्या या जागी अस्वच्छता असते. तिथे आपले हात फिरले पाहिजेत.
फराळाचे पदार्थ दहा-वीस कुटुंबांनी एकत्रित तयार करता येतील. निदान एक फराळ सर्वांनी एकत्र करता येईल. छोटी सहल एकत्र काढता येईल, त्यात पर्यटनाला प्राधान्य असावे. मात्र यातील प्रत्येक गोष्ट सहभागींनी स्वत: करावी. धान्य निवडण्यापासून भांडी घासण्यापर्यंत कुठे मजूरी किंवा कंत्राटी काम देऊ नये. उलट, आपल्या जवळपास, गल्लीत, सोसायटीत एरवी येणाऱ्या कामवाल्यांस सन्मानाने एकत्र बोलावून त्यांचा सन्मान करावा.
आपल्या प्रत्येक (सामुदायिक) वागण्यातून निसर्गाची आणि माणूसकीची जपणूक, संवर्धन, आस्वाद हे अपेक्षित असते. पुढच्या पिढ्यांसमोर आपण काय आणि कसे ठेवतो याचा विचार प्रौढांनी केला पाहिजे. पुढची पिढी, घरटी एक-दोन मुलांची असणार आहे. त्यांना सामुदायिक जीवनाचे धडे या सणांच्या-उत्सवांच्या निमित्ताने दिले पाहिजेत. त्यांना मामा-आत्या ठाऊक नसेल, भावंडे तर नाहीतच. पण आजी-आजोबा, शेजार, मित्रमंडळ, गुरुजन या सर्वांचा सहवास घडवून आणावा. पोस्ट-बँक-फोन-बस अशा सेवेतील कर्मचाऱ्यांचा परिचय करून द्यावा, त्यांना शुभेच्छा देऊन नमस्कार करायला सांगावे. कारण हा `आपला' परिवार असतो. सर्व जीवन परस्परावलंबी असते हे अशा उपक्रमांतून त्यांना समजेल. इतरांविषयी मनांतली अढी कमी होईल.
निसर्ग-विज्ञान-अध्यात्म-धर्म-व्यवहार अशी एक साखळी माणसाच्या आयुष्यात असते. त्यातील प्रत्येक कडे महत्त्वाचे असते. त्या आधारे संस्कृतीचे बंधन तयार होते. त्याचेच दृश्य स्वरूप म्हणजे आपले सण-परंपरा-उत्सव. त्यांचे स्थान अबाधित असते, असले पाहिजे. पण कालानुरूप त्यात परिवर्तन होत गेले पाहिजे. ते परिर्वतन, जितके सहज-सुलभ-आणि वेगाने आपण करू शकू तितकी प्रगती आपण साध्य करू. वर्तन परिवर्तन होत गेले तर हेच सण कालबाह्य न ठरता ते चिरंतन आनंदाचे होतील.
हा विचार करून तो प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी स्वत:ला उच्चभ्रू, विज्ञानवादी, लवचिक समजणाऱ्या वर्गावर सर्वाधिक आहे. नवा विचार, नवा आचार देण्याचीही एक परंपराच तयार होते. ती आपण जपावी. विचारांतील, बुद्धीतील जळमटे साफ करून ज्ञान-विज्ञानाचा दीप या जगी लावण्याचा संकल्प या दिवाळीत करावा.
मुलींच्या सहलीसाठी मदतीचे आवाहन
परिसरातील देवदासी मुलींसाठी आमची संस्था काम करते. त्या मुलींची सहल नेणार आहे. ८ वी - १२ वी च्या सुमारे २०० मुली सात-आठ दिवसांच्या प्रवासाला जातील. त्यासाठी खर्च मोठा आहेच, तो कसा करायचा ही चिंता आहे. या मुलींना स्वत:चे असे कोणी नाही. सगळया मुली संस्थेतच असतात. त्यांच्याखेरीज इतर भटके, विमुक्त, आदिवासी यांचीही कामे असतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. या कार्यास मदत करणारे कमी, उलट त्रास देणारे जास्त. हल्ली तर खूप वेगळी परिस्थिती आहे.
`उत्थान'च्या आश्रयात ३०० हून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. शासनाकडून आम्ही काही घेत नाही. शेतकऱ्यांकडून मदत म्हणून धान्य मिळत असते. `समाजसेवा' ही कार्यकर्त्याचे जगण्याचे साधन होऊ नये. ज्यांना कोणी नसतात अशीच मुले मुली जिद्दीने काहीतरी करून दाखवितात. मिळालेल्या संधीचे सोने करतात हे मी अनेक वर्षे पाहतो आहे. गेली दोन वर्षे उत्तर कर्नाटकात दुष्काळ होता. या मुलींना जगवणार कसे? शिक्षण द्यायला हवे. कॉलेज खर्च खूप आहे. हे सर्व कसे करायचे? जे आपले आहेत अशांना अडचणी सांगत असतो.
- डॉ.भीमराव गस्ती
(भटके - बेरड - पारधी - देवदासी यांच्यासाठी विलक्षण तळमळीने काम करणारे डॉ.भीमराव गस्ती यांच्या `उत्थान' प्रकल्पासाठी मदत, किंवा संपर्क यासाठी पत्ता - १७९, मारुती गल्ली, यमनापूर, बेळगाव मोबा.९७४०६३८९३०, ०९४२२८५९९८२)
राष्ट्न्धर्म जागवावा
- डॉ.विनोद बब्बर
- त्याचे असे झाले की, शहरातील एका वसतीतून मी चाललो होतो. त्याच वेळी त्या गल्लीतील शाळा सुटली आणि पोरांचा लोंढा रस्त्यावर पसरला. त्यातली काही पोरं माझ्याकडे पाहात होती. माझ्या दाढीमुळे ती मला मुस्लिम समजली आणि त्यांनी काही अपशब्द अकारण उच्चारले. मी घाईत होतो, तिथे न रेंगाळता पुढे गेलो, पण मनातून मला वाईट वाटले. काही अंतर चाललो असेन, तिथल्या मदरशाबाहेर काही पोरं उभी होती. माझी दाढी, पण माझ्या ढगळ अंगरख्याचा रंग पाहून मला ती पोरं `बाबाजी' म्हणाली आणि त्यावरून काही अपशब्द त्यांनीही उच्चारले. मी आतून दुखावलो. माझी केवळ वेशभूषा हिंदू आणि मुस्लिम दोहोंच्या अपशब्दांना निमित्त व्हावी? मी `यांना' जवळचा नाही, `त्यांना'ही जवळचा वाटत नाही; मग मी आहे तरी कोण? आतापर्यंत मोठी माणसे धर्माच्या नावावर रणकंदन करत होती, आता या छोट्या पोरांच्या मनात हे विष कोण भिनवत आहे? मी कित्येक वर्षे शाळा-कॉलेजांतून अध्यापन केले आहे. माझे कोणी विद्यार्थी कुठे-कधी भेटतात, तेव्हा असला भेद कुणी मनात न ठेवता आजही आदर व्यक्त करतात, हा माझा अनुभव आहे.
मी लवकरच त्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यांनी आपला अंगरखा झटकला. हा विषय त्यांच्या दृष्टीने नसती डोकेदुखीच होता. मी चिवटपणा दाखवून काही शिक्षकांशी एकत्रित बोललो. त्यावरून त्यांचे मत पुढे आले की, सध्या सरकारी धोरणे या प्रकारच्या भेदांची दरी वाढवत आहे. अल्पसंख्यांकना रोख पैसेवाटप, ती मुले शाळेत न आली तरी नाव रद्द न करणे, अनिवार्य समजून त्यांना उत्तीर्ण करणे, अनुदान त्यांच्या घरी नेऊन पोच करणे अशा कृतींमधून लहान बालकांच्या डोक्यात ही वेगळेपणाची भावना वाढते आहे. एका शिक्षकाच्या सांगण्यानुसार, एका बालकाने विचारले, `सर, हा माझा मित्र तर सगळा माझ्यासारखाच आहे; तर मग त्याला मुसलमान का म्हणायचं?' - यावर त्याची समजूत घालणे सोपे नाही. काही सुज्ञ लोकांनीही अशी मदत, अनुदान वगैरे गोष्टी धर्माशी जोडणे निखालस चूक असल्याचे मत दिले. पण आपले पंतप्रधान तर म्हणतात की, `देशाच्या संसाधनांवर प्रथम अधिकार अल्पसंख्यांकचा आहे.' असल्या विधानांवरून त्यांना `आर्थिक किंवा कोणत्याही बाबतीत कमजोर असणाऱ्यांना मदत देण्याच्या विषयात धर्माचा कुठे विचार करू नका', हे कोण कसे समजावून सांगणार?
कोणत्याही एका जाती-पंथ-संप्रदाय यातील पारंपरिक, भावनिक हितसंबंध समान असणार, हे तर निश्चित आहे. तथापि समाजात आर्थिक वर्गवारी असते, गरीब-श्रीमंत अशी विषमता असते; तोवर एकाच धर्माचे असूनही त्यांच्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक हितसंबंध समान असूच शकत नाहीत. एखादा हिंदू मजूर, किंवा कोणी मुस्लिम मजूर हा जरी आपल्याच धर्माच्या कारखानदाराकडे चाकरी करीत असेल तरी तो भांडवलदार, आपल्या फायद्यासाठी त्या आपल्याच धर्मातील मजूराचे `शोषण' करू पाहणार! त्याउलट हिंदू व मुस्लिम अशा दोन कारखानदारांचा दृष्टिकोण किंवा हित, आणि दोन भिन्नधर्मी मजूरांचे जीवनमान, शिक्षण-स्वास्थ्य, कार्यशैली समान असणार हे निर्विवाद आहे. परंतु काही अनुदान वगैरे किंवा हज यात्रेला मदत, असल्या गोष्टींव्यतिरिक्त त्या दोन्ही धर्मीय वर्गांत तसा काही फरक दिसत नाही.
वास्तविक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हजसाठी अनुदान देण्याची मागणी `गैर इस्लामी' म्हणून फेटाळली. त्या विषयाच्या औचित्याबद्दल इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीने चर्चा व्हायला हवी होती. पाकिस्तानप्रमाणे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला असता तर ती `धर्मात ढवळाढवळ' ठरवून, वेगळा काही `संसदीय' मार्ग काढला गेला असता. अहिंदू पोलिस अधिकारी मारला गेला तर त्याच्या घरी जाऊन मुख्यमंत्री सांत्वन करतात, त्याच्या वारसाला नोकरी देण्याची घोषणा करतात. खरे तर त्यात चूक काहीच नाही, पण तसे सर्वांच्याच बाबतीत घडत नाही. अशा प्रकारच्या मतलबी, राजकारणी, मतसंबंधी वागण्यातून समाजमनांत भेदभाव वाढून तो पोराटोरांपर्यंत जातो.
ही भेदभावाची वेदना घेऊन मी काही अन्यधर्मीय शाळांतून गेलो. आधुनिक, विज्ञानवादी शिक्षण मुलांसाठी उपलब्ध करण्याऐवजी त्यांनी धार्मिक शिक्षणालाच प्राधान्य दिले. `सर्वधर्म समान' हे मानायला त्यांची जीभ वळत नव्हती. `जगात सर्वश्रेेष्ठ केवळ आमचीच विचारधारा-' यावर ते ठाम होते. समाधान इतकेच की, `प्रामाणिकपणा व सभ्यपणा आणण्याची' सूचना त्यांना पटली असावी, ते गप्प राहिले. शाळेत धार्मिक शिक्षण देण्यास एका धर्माला सवलत आणि दुसऱ्यांवर बंधने, हेही आश्चर्य नाही काय? यातून शिक्षक व मुले काय बोध घेतील?
इथे मी `हिंदूंचे ते सगळे उत्तम', असे काही मानणारा मुळीच नाही. यातले काहीजण उचापती आहेतच. परंतु सर्वसाधारण हिंदू लोक आज सर्वधर्मांतील समभावाचा आदर करतात. आवश्यकता अशी आहे की, प्रत्येक धर्माचे `राष्ट्नीयकरण' व्हायला हवे. सर्वात आधी देश! जे देशहिताच्या विरुद्ध असेल, तो धर्मच नव्हे. आपसातील संबंधांत जो दरी निर्माण करतो तो भारतीय नाही, त्याचे नागरिकत्त्व रद्द करावे.
धर्म हे आपल्या व्यक्तिगत विश्वासाचे, श्रद्धेचे दुसरे नाव आहे. आपल्या सार्वजनिक जीवनात त्याचे प्रदर्शन नव्हे, नैतिक दर्शन झाले पाहिजे. योग्य-अयोग्य काय हे समजत असूनही मतांच्या गठ्ठ्यासाठी दुर्लक्ष करणारे लोक राष्ट्न्द्रोहीच आहेत. ते हिंदू, की मुसलमान - की अन्य कोणी हा प्रश्नच नाही; ते माणूस तरी कसे म्हणावेत? अशा लोकांना प्रोत्साहन देणाऱ्यांइतकेच, त्यांना गप्प राहून सहन करणारे आपण लोकही अन्नात विष मिसळू देण्यात सहभागीच मानावे लागेल.
सामान्य माणूस गप्प राहून सहन करतो, उगीच धार्मिक तेढ वाढून मारामाऱ्या होतील अशी भीती त्यामागे असते. गोरगरीब सामान्य माणसांना भडकावून त्यांना एकमेकांविरुद्ध खडे करणाऱ्या या धर्ममार्तंडांना हे कधी कळणार नाही की, बेकारी, भूक, भ्रष्टाचार यांविरुद्ध खरी लढाई असते. इंग्रजांनी तर त्याच फूटपाडी राजकीय धोरणाने आपल्यावर दीर्घकाळ राज्य केले. धर्म जर इथल्या स्वस्थ सुखी अस्तित्त्वाबद्दल खात्री देऊ शकत असेल तर, आपल्यातूनच फुटून वेगळया झालेल्या शेजारच्या मुलखात रोजची हिंसा, लूट, दंगे, अराजक का चालते? अफगाणिस्तान उध्वस्त का झाला? तिथे खऱ्या धर्मावर धर्मांधता अरेरावी करते, त्यामुळे धर्माच्या नावावरच शेकडो बळी पडतात, हे नाकारण्यात काय अर्थ आहे?
आपण सच्चे हिंदू-मुस्लिम नव्हे, तर सच्चे भारतीय कसे, कधी होऊ? हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम लॉ असली फुटीरता जाऊन सर्वसमावेशक समान कायदा कधी होणार? केवळ पाणीच नव्हे तर आता हवामानसुद्धा विषारी बनले आहे, विष कालविणारे कृतिशील आहेत. त्यांना थोडेसे तरी यश येते, हे दुर्दैवी आहे. आपल्या सर्वांनी या गोष्टीला प्राधान्य द्यायलाच हवे की, पुढच्या पिढीत तरी हा दुरावा, तिरस्कार आणि शत्रुत्त्वाचे विष किंचितही भिनणार-उतरणार नाही! संकल्प असा हवा की, भांडत न बसता मिसळून राहूया. दंगा नको, प्रगती करूया.
अमन के दुष्मन बहुतेरें, चमन को उजाड देंगे ।
अगर हम न जागे तो वे बखिया अुखाड देंगे ।।
- डॉ.विनोद बब्बर
संपादक `रट्निंकाष्कर',
(हिंदुस्थान समाचार, नवोत्थान सेवा)
कायद्याने अंधश्रद्धा थांबेल?
अंधश्रद्धा, दाभोळकर हत्त्या याबद्दल मी लिहिणारच होतो. आपल्या संपादकीयात त्याच विषयाला स्पर्श केलात म्हणून माझे विचार सांगतो. दाभोळकर आपल्याला भेटलेही असतील कदाचित, पण अंधश्रद्धा हा विषय कायद्याच्या व्याख्येत बसत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोणत्याही तथाकथित धर्माला विरोध नाही हे त्यांनी शतवार सांगूनही सनातनवाले त्यांना विरोध करतात. जादूटोणा, मंत्रतंत्र यामुळे होणारी फसवणूक थांबावी, विज्ञाननिष्ठा वाढावी हे घटनेतच नमूद केले आहे. एका देवदासीची जट कापताना तिच्या गळयातील माळ सौ.दाभोळकरांनी आपल्या गळयात घातली त्यांना काही कोप झाला नाही.
- सतीश पटवर्धन, कागवाड
(फोन : ०८३३९-२६४७०५)
सिद्धीविनायक मंदीर : आवाहन
दोणवली (ता.चिपळूण) येथे श्री सिद्धीविनायक मंदिर आहे. देऊळ सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वीचे आहे. सभामंडप जीर्ण शीर्ण आहे. श्री.परचुरे (गावचे खोत) यांच्या मालकी वहिवाटीचे आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे ते देवळाची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. गावात ब्राह्मणांची तीन घरे उरली आहेत. तीसुद्धा टिकणार नाहीत.
दोन पर्याय आहेत, हतबलतेने पाहात राहणे किंवा काही योजना करून देऊळ सुस्थितीत ठेवणे. देवळाचा न्यास (ट्न्स्ट) स्थापन केला आहे. प्राथमिक गरज म्हणून मुख्य भागाची दुरुस्ती, रंगकाम वगैरे केले आहे. त्यासाठी १.५० लाख खर्च केला आहे. सभामंडपाचे काम करावयाचे आहे. भविष्यात देवळाची व्यवस्था, पूजाअर्चा यासाठी तरतूद करावयाची आहे. या सर्व कामासाठी रु.१५ लाख खर्च अपेक्षित आहे. कळकळीने आर्थिक मदतीसाठी विनंती.
चिपळूण-गुहागर रस्त्यावर सुमारे १० किमी.वर गणेशखिंड आहेे. उत्तरेकडील रस्त्याने जाताना भोम-लालबाग या तिठ्यावर पोसरे गावाच्या पुढे परटवणे पऱ्यापासून दोणवली गावाची हद्द सुरू होते. दोणवली येथे सिद्धीविनायकाचे पेशवेकालीन मंदिर आहे. थोरले माधवराव पेशवे यांनी १७७० मध्ये हे देऊळ बांधले. गावाला रुंदी नसली तरी लांबी सात किलोमीटर आहे. पायथ्याला वाहणारी नदी, जी पुढे सुतवी बंदरामध्ये वशिष्ठी खाडीला मिळते. नदीपासून अर्धा डोंगर चढल्यावर वाड्यावाड्यांची वसती आहे. कोकणी वैशिष्ट्याने वसलेला हिरव्यागर्द झाडीचा गाव.
सिद्धीविनायकाचे मंदिर चौरस, पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यावर तीन स्तरांवर वीस मोदकसदृश छोटे घुमट आहेत.एकविसावा मोठा मोदक कळसावर आहे. घडवलेल्या जांभ्या चिऱ्यांची पोवळी आहे. मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती फिकट लालसर संगमरवरी पाषाणाची आहे. सिद्धासनामध्ये कमलासनावर बसलेली वरदमूर्ती आहे. गाभाऱ्यात श्री त्र्यंबकेश्वराची पिंडी आणि श्री विठ्ठलाची मूर्तीही आहे. हे देवस्थान परचुरे कुटुंबाच्या मालकीचे आहे. दोन फडके कुटुंबेही सक्रिय सहभाग घेतात. आलटून पालटून उत्सव साजरा करतात.
अध्यक्ष - वसंत सदाशिव परचुरे उपाध्यक्ष - मधुकर अ. फडके
खजिनदार - वीणा विश्वास गोगटे सचिव - अनिल दत्तात्रय फडके
बँकेचे नाव - बँक ऑफ महाराष्ट्न्, चिपळूण (खाते क्र.६०१०६७५६६०७)
संपर्क - श्रीकृष्ण वा. फडके, (फोन ०२२-२५४०५२५१, मो.९९२०२०८०३९)
सी-१, परमसुख सोसायटी, गावंड पथ, नौपाडा, ठाणे (प.) ४४०६०२
Comments
Post a Comment