Skip to main content

MAZA COLOMN in 8 AUG 2011

पोळणारं वास्तव
 एका दानशूर गृहस्थानं भलीमोठी रक्कम बाजूला काढून त्याचा ट्न्स्ट केला. हेतू चांगला होता. गुणीजनांसाठी प्रोत्साहन, अडल्या नडल्यांस मदत वगैरे. एकूणात समाजासाठी म्हणून खर्च करायला घसघशीत रक्कम होती. ही रक्कम अर्थातच सत्पात्री पडावी अशी दात्याची आणि त्याच्याशी संबंधित सर्व `कार्यकर्त्यां'ची प्रामाणिक इच्छा होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले.
 पहिला शोध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा करायचा होता. हा गुणवत्तेचा शोध लागता लागेना. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त शंभर कार्ये आपल्या यादीवर आणण्यासाठी सर्वांनी घोषणा केल्या. प्रत्येकाला ही यादी करण्याची जबाबदारी अगदीच किरकोळ वाटली. प्रत्येकजण `कसा'चा होता, त्यामुळं या पात्रतेसाठी निकष केवळ विश्वासाचा होता. निवडलेलं कार्य खऱ्या पात्रतेचं असावं एवढीच माफक अपेक्षा. संस्था नोंदलेली असायला हवी असं नाही, संस्थाच हवी असंही नाही... एकांडी शिलेदारी चालेल, ऑडिट-हिशेब यांबद्दल आग्रह नाही, कार्याचा विषय (अपंग-अनाथ-पर्यावरण-अध्यात्म-रुग्णसेवा वगैरे) कोणताही असेल, दाखले-शिफारसी-अर्ज यांची गरज नाही.... तर आपण खरी तळमळ शोधायची आहे!! शंभर संस्था किंवा व्यक्ती दूरच राहोत, चाळीस-पन्नास च्या पुढं जमेना. काही कार्ये समायिक रीत्या पुढं यायची - म्हणजे तीच ती व्यक्ती बरेचजण सांगायचे. या लोकांचे प्रयत्न कमी म्हणा किंवा दृष्टी अधू म्हणा, चांगली कार्ये सापडेनात. कुणाला `सुचव' म्हटलं की अमूकराव युवा मंच, तमूकराव क्रीडा मंडळ, अशा पठडीतली उपद्रवी वा अनुदानित थोर थोर कार्ये चिकटायला येऊ लागली.
 मग काही पुरस्कार देण्याची टूम निघाली. त्यावर आपसात वाद सुरू झाले. त्यासंबंधात कुठे कुणकुण लागली तर तिथून चार-सहा `केसीस' येऊ लागल्या. छानपैकी प्लॅस्टिक डॉकेटात रंगीत फोटो, परिचय, शिफारसी-दाखले, आणि याआधी मिळालेल्या पुरस्कारांची यादी. एकानं तर सरावाप्रमाणे पालकमंत्र्याचं पत्र जोडलं. गंमत म्हणून ते सगळं पाहून, ती केस बाजूला करायची. पुरस्कार द्यायचा कुणाला हा पेच सुटेना. बाबा आमटे, अभय बंग वगैरे नावं सगळयांना ठाऊक असतात पण स्वत:च्या जिल्ह्यात - महानगरात अशी यादी करायला फार कष्ट पडू लागले.
 कालीदासाची थोरवी गाणारा एक श्लोक सांगतात की, कधी एकदा म्हणे महाकवींची गणना करण्याचा प्रसंग आला. मिटल्या मुठीची करंगळी उघडून कालीदासाचं पहिलं नाव घेतलं आणि पुढचं तसं मोठं नाव सुचेना. त्यामुळं शेजारच्या पुढल्या बोटाचं `अनामिका' हे नाव सार्थ झालं, कारण दुसरा कवीच दृष्टीपुढं येईना. (अनामिका सार्थवती बभूव.) असाच प्रकार श्रेष्ठ कार्याच्या शोधाचा होऊ लागला. आपल्या सभोवती खरं कार्य करणारी माणसं फार तुरळक होती, किंवा ती यांना सापडत नव्हती.
 या शोधातून एक नवा शोध लागला. तो असा की या प्रकारे काही देऊ इच्छिणारे बरेच आहेत. व्यक्ती आहेत, ट्न्स्ट आहेत, संस्था आहेत, उद्योग आहेत. परंतु त्यांच्याहीपुढे तोच प्रश्न आहे. `चांगल्या कामाला कुणी पैसा देत नाही' या विधानाचाही व्यत्यास असतो. काही ज्ञातिसंस्था `आपल्यातल्या' गुणवंताना गरजवंताना काही द्यायला उत्सुक असतात परंतु खरा गुणवंत शोधणे हेच काम मोठे होते. त्यास सवड होत नाही, मार्ग सापडत नाही, कोणी कळवत नाही. मग वेळ साजरी करण्यासाठी असतील त्यात चांगला पाहायचा, पुढच्या वेळी सुधारणा करू म्हणायचं!
 याचं एक कारण असं असू शकेल की, खऱ्या चांगल्याचा शोध घेण्यासाठी, त्याचं चांगुलपण जाणण्यासाठी शोधकही चांगला असावा लागतो. सभोवती उडणारी पाखरं आपल्या सर्वांना दररोज दिसतात पण एखाद्यालाच त्या पाखरात सौंदर्य सापडतं. `गुणी: गुणान्वेत्ति' (गुणी माणसालाच गुणांची किंमत कळते) हे खरे असेल तर समाजात तळमळीचे खरेखुरे कार्य सापडत नाही, या वास्तवाचा आपल्याला चटका बसतो. मदत करू पाहणारा पैसा आपल्याजवळ असतो; पण चांगले जाणण्याची तळमळ आपल्यात कमी पडत असावी! आणि ज्याच्याकडे खूप तळमळ असते, त्याच्याजवळ पैसा कुठून असणार?  

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...