Skip to main content

28 May 2018

आपले श्रीनगर
        दंगे दंगली दगडफेक असल्या अतिरेकी धुडगुसांच्या कथा ऐकल्या तरच श्रीनगर हे नाव आपल्याला परिचयाचे वाटते.  परंतु त्याव्यतिरिक्त शांत रमणीय श्रीनगर ही अनुभवण्याची गोष्ट आहे.  साक्षात् श्री-नगर म्हणून आमच्या अनुभवात आलेले हे निसर्गसंपन्न नगर कोणालाही  धर्मसंस्कृतीचा प्रसन्न प्रत्यय देअू शकते.
पुण्यातील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा या संस्थेच्या कार्याविषयी आम्ही जाणून होतो. त्या कार्याबद्दल आस्था व अभिमान होता. वेदपाठशाळेने रट्निहाष्तासाठी व सीमेवरील सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी श्रीनगरला एक कार्यक्रम आयोजित केला, असे आम्हाला समजले. या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे असे ठरविले. त्याचे कारण श्रीनगर या स्वर्गभूमीवर जाण्याची संधी मिळते. या श्रीनगर भेटीचे वैशिष्ट्य असे की, सकाळी ऋग्वेद संहिता महायज्ञ, दुपारी श्रीनगर दर्शन, संध्याकाळी यज्ञशाळेत आरती, मंत्रपुष्प, अष्टावधान सेवा असा कार्यक्रम होता. संहिता महायज्ञामुळे शुद्ध ऋग्वेद मंत्रांचे श्रवण व दुपारी ऐतिहासिक मंदिरांना भेटी व दर्शन घडले. श्रीनगरमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरे असून, त्या मंदिरांचे निर्माण शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देते. अनेक कठीण काळामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहेत, अशा मंदिरांना भेटी व दर्शन, या कार्यक्रमांतून मला खऱ्या श्रीनगरचा अनुभव आला. वर्तमानपत्रांतून व विविध माध्यमांतून ऐकू येणारे श्रीनगर व प्रत्यक्ष दिसणारे श्रीनगर, कान आणि डोळे यांच्यामधील अंतर कमी करणारे होते, ते प्रत्यक्ष अनुभवता आले.
देशात काही सेवा सतत चालू असतात, यामध्येच देशाच्या सीमेवर नैसर्गिक आपत्तीशी सामना करत देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक! सैनिकांबद्दल आदर आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे. आपण त्यांच्या या सेवेबद्दल नतमस्तक असतो. जवानांबद्दल आदर असल्यामुळे कोणी राखी पाठवितात, कोणी पत्र पाठवितात, कोणी जवानांच्या कुटुंबियांशी संपर्क ठेवून त्यांना पाठिंबा देत असतात. याच भावनेतून वेदाचार्य घैसास गुुरुजी वेदपाठशाळेने श्रीनगरसारख्या परिसरात जाऊन यज्ञाचे आयोजन केले होते. यज्ञाचा संकल्प `अखंड भारताच्या अंतर्गत असलेल्या जम्मू-काश्मिर प्रांतात रट्निवाष्रोध, द्वेष, वाईट आचरण यांचा परिहार व्हावा, त्याचबरोबर सगळयांचे आत्मबल, उत्कर्ष, धर्मरक्षा, धर्माचा अभ्युदय, बंधुभाव, देशकल्याण असा होता. या संकल्पाचा उच्चार करून `देशाच्या हितासाठी व श्रीनगरच्या जनतेसाठी ही वेदमंत्राची प्रार्थना आम्ही आजपासून करत आहोत' ही संकल्पपूर्वक  वेदप्रार्थना व आहुती असा कार्यक्रम होता. यामध्ये जवानांबरोबर तेथील लोकांमध्ये देशाबद्दल सद््भावना निर्माण व्हावी हा हेतू होता.
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी दिलेल्या प्रेरणेतून, वेदमहर्षी कै.विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रीनगरमधील पुरातन ज्येष्ठामाता मंदिराच्या शांत, पवित्र व नयनरम्य परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्याबरोबर पुणे, त्र्यंबकेश्वर, बार्शी, गोवा आणि गया येथून वेदप्रेमी मंडळी होती. श्रीनगरमध्ये प्रवेश करेपर्यंत धाकधूक होत होती, परंतु घैसास गुरुजींचे कार्यक्रमाचे नियोजन व श्रीनगरमध्ये कायम राहात असल्यासारखे हिंडणे पाहाता आश्चर्यचकित झालो. ते स्वत: व त्यांचे काही सहकारी अगोदरच श्रीनगरमध्ये दाखल झाले होेते. आमच्या स्वागतासाठी ते स्वत: विमानतळावर आलेले पाहून आमच्या मनातील धाकधूक संपलीच. सर्व प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी नाझिर नावाच्या एका योग्य व्यक्तीची नेमणूक केली होती. नाझिरने पुढील ८-१० दिवसांत ती खरी करून दाखवली. आम्ही श्रीनगर शहरातून जात होतो, तेव्हा आपण ज्या शहराविषयी ऐकतो, तेच हे शहर का? -असा मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला. आम्ही सर्वजण जेव्हा प्रत्यक्ष ज्येष्ठामाता मंदिरात पोहोचलो तेव्हा मात्र पुण्यातील एक वैदिक हजारो मैल दूर येऊन एका पवित्र स्थळाचा शोध घेऊन अशा प्रकारचे कार्य करू शकतो हे कौतुकास्पद वाटले. `योजक: तत्र दुर्लभ: ।' म्हणतात.
आम्ही रोज दुपारी १ ते ६ या वेळात श्रीनगरमधील विविध स्थळांना भेट देण्यासाठी जात होतो, यामध्ये क्षीरभवानी मंदिर, सूूर्यमंदिर, रणवीर महेश मंदिर, गुप्तगंगा, चक्रेश्वर मंदिर, हरीप्रिया पर्वत, पेहलगाम मधील आमलेश्वर मंदिर, त्याचबरोबर मुघल गार्डन, निशाद गार्डन, ट्युलिप गार्डन हे पाहण्याचा योग आला.
श्रीनगरमधील मंदिरांचा इतिहास हा ३०० ते १००० वर्षे जुना असून ही मंदिरे आजसुद्धा सुस्थितीत आहे. तेथील पूजाअर्चा सुरू आहे. या सर्व मंदिरांसाठी वेगळी सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. श्रीनगरमधील शंकराचार्य टेकडी टोकावर महादेवाचे मंदिर असून या मंदिराची निर्मिती अंदाजे ४००० वर्षांपूर्वीची असावी. तेथेच श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली गुंफा असून टेकडीवर जाताना दुतर्फा देवदार, चिनार अशा वृक्षांनी निसर्गरम्य आहे. त्या टेकडीवरून होणारे श्रीनगरचे दर्शन घेऊन आपल्या इतिहासाने माझी छाती भरून आली.
खीरभवानी मंदिराची एक आख्यायिका असून लंकेतून रावण वधानंतर हनुमंताला आदेश देऊन माता पार्वती ही जलरूपाने आणून हनुमानाने तिची तळयामध्ये स्थापना केली. या तळयाचा रंग कधी लाल, कधी निळा, तर कधी हिरवा होतो.
सूर्यमंदिर या ठिकाणी मार्कंडेय, श्रीराम अशा अनेक देवतांची ऐतिहासिक मंदिरे व भव्य तलाव असून या तलावात डोंगरातून बारमाही खळखळणारे पाणी अत्यंत थंड  असते, या पाण्यामध्ये सुंदर मासे असून त्यांना मंदिरात येणारे भक्त खाऊ घालत असतात. २५० वर्षांपूर्वीच्या रणवीर मंदिराचे बांधकाम राजा गुलाबसिंग याने केले असून पार्वतीमातेला तहान लागली व भगवान शंकरांनी या ठिकाणी योगशक्तीने गंगेला आवाहन करून या कुंडामध्ये तिची स्थापना केली, असे सांगतात.
जगद् अंबा शरीका चक्रेश्वर मंदिर हे श्रीनगरचे आणखी एक प्रसिद्ध मंदीर. त्रिकोण आणि गोल यांनी बनलेल्या हिंदंूच्या पवित्र श्रीयंत्रामुळे त्रिकोणांना श्रीकंथ असे म्हणतात, हे त्रिकोण शक्तीचे प्रतीक मानले जाते. मध्य बिंदू हा शंकराची मूळ प्रकृती मानली जाते. अशा मंदिरात अंबा शरीकेची १२ फूट उंचीची स्वयंभू मूर्ती असून हे मंदीर पण अंदाजे १००० फूट उंचीवर आहे. या मंदिरातूनही श्रीनगरचे मनोहारी दर्शन घडते.
पहेलगाममध्ये नयनरम्य खोऱ्यातून चारही दिशांना बर्फाच्छादित शिखरे दिसतात. यामध्ये ११५० साली जयसीकबा राजाने बांधलेले अमलेश्वराचे भव्य दगडांची रचना असलेले मंदिर, त्यावर सोनेरी कळस आहे. मंदिराच्या पुढे शुद्ध स्फेटकासारखे पाणी असणारे कुंड आहे. अशा अनेक मंदिरांना भेटी दिल्या.
काश्मिरचा इतिहास किती जुना आहे याची कल्पना येते. श्रीनगरच्या उत्पत्तीची पुराणात एक आख्यायिका आहे, या ठिकाणी सती सरोवर असे एक मोठे सरोवर होते. महादेवांच्या पत्नी सती पार्वती येथे नौका विहार करीत असत. या सरोवरात जलोद्भव नावाचा राक्षस राहात होता, तो पार्वतीच्या नावेला त्रास द्यायचा, तसेच आसपासच्या नाग लोकांना त्रास देत असे, ही माहिती कश्यप ऋषींना समजली. म्हणून त्यांनी वराहमुल्ला (सध्याचे बारामुल्ला) याठिकाणी असलेल्या पर्वतांची रांग फोडून सरोवरातील पाणी बाहेर सोडून दिले. त्यामुळे हा जलोद्भव नावाचा राक्षस मारला गेला. कश्यप ऋषींनी त्या भागातील लोकांना आणून नगर उभे केले. सरोवर आटवून निर्माण केलेली जागा म्हणून या भूमीस कश्यपमीर असे नाव मिळाले व पुढे काश्मीर हे नाव रूढ झाले.
श्रीनगरला आपण सर्वांनी जायला हवे. आपली संस्कृती दर्शविणारी मंदिरे पाहून, पुढील पिढीस सांगून, या देवनिर्मित भूलोकीच्या स्वर्गास भेट देण्यास उद्युक्त करावे.
                                                      -सुभाष दांडेकर  (`वेदभवन'कडून आलेली वार्ता) 
                                                       फोन-०२०-२५२८२५६८

 संपादकीय
धर्माने बांधील असलेला समाज
अधिक महिना हा माणसाने आपल्या सोयीच्या  कालगणनेसाठी रूढ केला. त्याचा खगोलाशी, सूर्यचंद्र आणि पृथ्वी यांच्या भ्रमणाशी आणि आपापल्या प्रादेशिक ऋतुमानाशी संबंध आहे. म्हणजे त्या अर्थानेे अधिक मास वैज्ञानिक आहे, पण त्याच्याशी जोडलेले  सामाजिकतेचे अंगही नाकारता येत नाही. काहीतरी कारणाने दानाचा `धर्म' घडावा, चार लोकांत मिसळावे, चार द्यावेतघ्यावेत, सभोवारच्या वातावरणात आनंद निर्माण करून तो आितरांसमवेत साजरा करावा असा अुद्देश लक्षात येत नसला तरी, अनायासे तो साधला जाण्यात काही गैर नाही. याच्याही पुढे जाअून कित्येकजण यज्ञयाग, तीर्थस्थानयात्रा, सकलहितरक्षणार्थ म्हणून काही तथाकथित धर्मकार्य करीत असतात. या महिन्यात लग्नकार्य किंवा तत्सम काही विधी नाकारले जातात, त्यामुळे माणसाच्या अुत्सवप्रियतेला काहीतरी निमित्य लागते. ते अशा धार्मिक अुत्सवांच्या रूपाने मिळते. अेरवी भोजनावळी आणि सोवळे मिरविण्याची हौस तरी कशी भागविणार? अशा धार्मिक कार्यक्रमांतून काय साधते याचा विचार वैज्ञानिक म्हणविणाऱ्यांनी करताना, केवळ विज्ञानाचे निकष लावून चालत नाही. कारण माणसांचे आयुष्य केवळ विज्ञानावर सुरू होत नाही आणि संपत नाही. तिथे भावना मन आणि सामाजिक प्रतिष्ठा यांनाही स्थान असतेच असते.

आपल्या पूर्वजांनी याचा विचार करून अशा काही रूढी घालून दिल्या. त्यात व्रतवैकल्यांना धर्माच्या चौकटीत बसविले, आणि `असे धर्मकार्य केलेत तर सकलहिताचे रक्षण होआील ' अशी पुडी सोडून दिली. निष्ठेने असो, अज्ञानाने असो किंवा वावदूक धार्मिकतेच्या प्रभावाने असो, सामान्यजनांकडून त्या व्रतरूढी मनोभावे आचरणात येत राहिल्या. पर्यटन, पर्यावरण, सामुदायिकता, स्वच्छता, आणि मन:शांती  अशा आजच्या दृष्टीने वैज्ञानिक म्हटल्या जाणाऱ्या गोष्टी जाता जाता सहजभावाने  त्यांतून घडवून आणल्या. पंढरीची वारी करण्याने देव भेटेल की नाही याविषयी ज्ञानेश्वर तुकारामाच्या मनात किंचितमात्र शंका नसेल; पण त्यायोगे माणूस माणसाला भेटेल, आीश्वरनिष्ठांना दुरित भेटतील आणि त्यंाच्यातील व्यंकटी सांडेल अेवढे त्यांना अपेक्षित असणारच. म्हणून त्यांनी त्याचे समर्थन केले. टिळकांनी गणेशोत्सव घराबाहेर आणला त्याचे कारण तर अुघडअुघड समाजकारण आणि राजकारण होते. त्यामुळे आपण सर्वसाधारणत: ज्यांस धार्मिक कार्यक्रम म्हणतो त्यातले धार्मिकपण फोल ठरविता येआीलही, पण त्यातला सामुदायिक आचरणांचा सुप्त हेतू फोल मानता येत नाही. परंतु तरीही त्याविषयी वाद अुठतात, ते त्यात कोणकोण आणि नेमके कशासाठी सहभागी होत असते, त्यावरून!

कोणत्याही कारणाने माणसे जमली की, तिथे राजकीय पुढारी टपकतात, त्याचे कारण त्यांना त्या माणसांच्या गर्दीत स्वारस्य असते, त्याला ते लोकसंपर्क मानतात. अेरवी ती माणसे काय म्हणून जमलेली असतात, ते कदाचित त्यांना ठाअूकही नसते. त्यामुळे सत्यनारायण वा आीद असो, कुणाचा अंत्यविधी असो किंवा कुणाचा विवाहसोहळा असो, त्यांना `जावे लागते'. त्याचप्रमाणे ज्यांना माणसांत जायचे असते, त्यानी अशा धार्मिक मेळाव्यांना नावे ठेवूून धर्मनिरपेक्षता चालत नाही. राहुल गांधी हे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे अध्यक्ष, परंतु जी काही मतदार माणसे आहेत, त्यांना आपलेपण दाखविण्यासाठी त्यांनी  आपल्या गळयातील नसते जानवे अुघडे करून सव्यापसव्य करणे आले. तो काही त्यांचा श्रद्धेय सहभाग म्हणता येत नाही, त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्याचेही कारण नाही.  पण अशा मठाश्रमांत आणि तत्संबंधीच्या कर्मकांडांत सहभागी होण्याची ओढ किती, त्याचे प्रमाण किती, यावरती त्या त्या व्यक्तीची धर्मनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा समजून येते. तोच खरा आजच्या काळजीचा विषय होअू पाहात आहे.

आजकाल माणसांची गर्दी सर्वत्र होते. थंड हवेच्या ठिकाणी होते आणि रुग्णाला भेटण्यासाठी दवाखान्यातही गर्दी होते. रेशनच्या रांगेत होते, आणि पासपोर्टच्या रांगेतही होते. परंतु देवाधर्मासाठी होणारी गर्दी हे काही धार्मिक श्र्रद्धेचे मोजमाप म्हणून लावता येत नाही. तिरुपतीला साआीबाबाला आणि कुठल्यातरी आडगावच्या जीर्ण झालेल्या देवालाही माणसे लोटत असतात. यावरून माणसे धर्मश्रद्ध झाली असून सदाचाऱ्यांची गर्दी वाढत आहे असे म्हणवत नाही. साहित्य संमेलनांस(ही)  जशी गर्दी लोटते, पण चांगली पुस्तके खपत नाहीत ही तक्रार राहते, तसाच प्रकार प्रत्येक बाबतीत आहे. कोणत्याही देवळाच्या दारी अभिषेकासाठी रांगा लागतात, पण दर्शनासाठी आतून ज्यास्तीचे पैसे देणाऱ्यांना आणि ते घेणाऱ्यांना कोणत्या धर्मात बसवायचे हे काही मनोविज्ञानालाही सांगता येत नाही.

अधिकांश जनांचा प्रवाहो असाच चालिलेला असतो. तो चालायला हवा!  -परंतु ज्यांना विचारी, विज्ञानवादी, तर्क संगत, आधुनिकतेचे पुरस्कर्ते वगैरे मनोमनी  मानलेले असते, त्यांच्याशी आजवर त्या समजुतींनी बोलणे होत असते, धर्माधारित कर्मकांडांचा फोलपणा चर्चिलेला असतो अशा सुहृदस्नेहीजनांनी तीच वाट चोखाळावी याचा धक्का मनाला चटका लावून जातोच. त्यांनी तसे करावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा आणि त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यांचा आदर आहे. पण मग त्यांनी आजवर जे वैज्ञानिक विचारांचे अकारण गारुड केले त्यात आपण चकलो कसे याचे आश्चर्य लपत नाही. २८ मे ही ज्याची जयंती आहे त्या सावरकर नावाच्या अेका महान विज्ञानवाद्याला, भंकस कर्मकांडांवर तुटून पडणाऱ्या अेका सच्च्या पुरोगामी समाज-सुधारकाला, या दांभिक समाजरीतीने कधीचेच जातीधर्मवादी बूर्झ्वा ठरविलेले आहे. तोच अनुभव आजच्या कुणा प्रामाणिक विचारनिष्ठाला येत असतो, त्याचे वैषम्य आहे.

साधारण मनुष्याचे मन हे कर्मकांडावरच श्रद्धा ठेवणारे असते. पण जे कोणी अशा श्रद्धांना नावे ठेवतात, देवाच्या दारी लागलेल्या रांगांना नाके मुरडतात, प्रसंगवशात् त्यांची टवाळी करतात, असे पुरोगामी भासविणारे आधुनिकमनस्क समजले जाणारे लोक, त्यांच्या  दांभिकतेमुळे सामाजमनाच्या विकासाकरिता अधिक धोकादायक ठरतात. कारण त्यांच्याकडून अधिक फसगत होते. असे लोक पोथीनिष्ठच असतात, कुठल्या तरी देवाला फेऱ्या घालून आपले संकट टाळण्यासाठी देवाला संकटात टाकणारे अंधश्रद्धच असतात; पण ते आव आणतात तो मात्र आपण चार्वाकाचे आणि शंकराचार्यांचेही अवतार असल्याचा! सामाजिक स्नेहभावाला आणि मनोविकासाला तो दांभिकपणा त्रासदायक फसवा आणि अडचणीचाच आहे. आजच्या वैज्ञानिक पुरोगामीत्वाच्या काळात, अशा धर्मकांडांसाठी होणारी संभावितांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे.

मत-मतांतरेे
सावरकर नावाची प्रेरणाशक्ती
१८८३ साली वासुदेव बळवंत फडके यांचे निर्वाण झाले, आणि योगायोगाने त्याच साली विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला. नियतीने वासुदेव बळवंताचे कार्य पुढे नेण्यासाठी सावरकरांना जन्माला घातले असावे. हा विलक्षण कृतिशील देशभक्त आणि समाजसुधारक. त्यांच्या घराण्याने अुभ्या आयुष्यात केवळ देशभक्तीचाच राग आळविला.
सावरकरांच्या आयुष्यात चार महत्वाची पर्वे आहेत. १८९८ ते १९११ या कालखंडात सावरकरानी सशस्त्र क्रांतिकार्यासाठी संघटना अुभारल्या, त्यांचे नेतृत्व केले आणि ब्रिटिश सत्तेला धक्के दिले. १९११ ते १९२४ हा दुसरा कालखंड. त्यात कष्टमय बंदिवास भोगत असताना, तुरुंगात कोलू ओढत असतानाही `कमला'सारखे अजरामर काव्य लिहिले. १९२४ ते १९३७ या तिसऱ्या टप्प्यात ते रत्नागिरी येथे नजरकैदेत राहिले, तरीही त्यांचे धडपडणारे शरीर आणि मन स्वस्थ राहिलेे नाही. त्या काळात त्यांनी खूप लेखन केले. संन्यस्त खड्ग, अुग्रमंगल, अुत्तरक्रिया या त्यांच्या नाट्यकृती त्या काळातील आहेत. शिवाय अस्पृश्योद्धाराचे महान कार्य त्यांनी त्या काळात केले. रत्नागिरीतील धनिक भागोजीशेठ कीर यांच्याकरवी पतितपावन मंदीर बांधून घेतले, अेका अस्पृश्य मुलाचा हात धरून त्याला गाभाऱ्यात नेले. अनेक ठिकाणी सहभोजने योजिली. सामुदायिक हळदीकुंकू  करून त्यासाठी अस्पृश्य स्त्रियांना आमंत्रित केले. सनातन्यांच्या गावात हे सारे प्रयोग केले म्हणून त्यांना कृतिशूर समाजसुधारक म्हणायचे. शेवटचा १९३७ ते १९४९ हा कालखंड, त्यांनी साऱ्या भारतात दौरे काढून, भारतीय जनतेने आपल्या पूर्व पराक्रमाला आणि संस्कृतीला साजेल असेच वागावे यासाठी जनजागृती केली.
सावरकर हे क्रांतिकारकांचे मेरूमणी होते; मदनलाल, कान्हेरे अशांना त्यांनी तयार केले. समाजकारण, राजकारण, साहित्य, कवित्व, शिक्षण यांसारख्या विविध आघाड्या सांभाळत ते `बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे' असा अुद्घोष करत होते. परदेशी कपड्यांची होळी करताना, विलायतेतून पिस्तुले पाठविताना, बोटीतून अुडी मारताना, भोंगळ विचारसरणीवर आग पाखडताना, पावलोपावली त्याना दिव्य दाहक व्रताचे चटके बसले; पण कशाचीही पर्वा  न  करता ते आपल्या व्रताशी प्रामाणिक आणि ठाम राहिले. माडगूळकर लिहून गेले -
आकाशाहुन विशाल भासे याचे व्यक्तित्व
कर्पुरसे जो जाळी अपुले अवघे कर्तृत्व
चिरंजीव हा हौतात्म्याचा विजयी अभिमान
आितिहासाविण कुणी करावा याचा सन्मान ।।
सावरकरांचा सन्मान मृत्यूनेच केला. अेखाद्या झुंजार नेत्याला शेाभेल असे शांत क्लांत मरण त्यांनी पत्करले. सावरकरांसारखी माणसे देहाने गेली तरी कार्याने, त्यागाने, प्रतिभेने अमर राहतात. या भरतखंडात भावी काळ असा येआील की सारे राष्ट्न् चैतन्याने रसरसून अुठेल, आपली मातृभूमी कर्तृत्वाने अुजळून निघेल. सावरकरांचा आत्मा त्या अुज्ज्वल काळाची वाट पाहात तिष्ठत असेल. त्या काळासमीप आल्यावर तो तिथूनही घोषणा करेल -
भारतमाता की जय, वन्दे मातरम् ।
-मधुकर पां. खरे,  सांगली.  दूरभाष : ९४०३ ७२५ ४४८

ही भांडणे टाळावीत
अलीगढ मुस्लिम विद्याापीठात बॅ.जिन्हांचा फोटो लावलेला आहे, तो हटविण्यावरून वाद चालू आहे. हे वादळ पाहून मला असे वाटते की, त्याचे मूळ कारण त्या विद्यापीठाच्या नावातील `मुस्लिम' या अुल्लेखाचे आहे. बनारस हिंदू विद्यापीठातही तसा अुल्लेख आहे. दोनही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत, आता `त्या' नावांची गरज नाही. अेकूणातच सध्या आितिहास पुसून टाकण्यावर अकारण भर दिला जात आहे. औरंगजेब रोड हे नाव बदलण्याचा प्रकार त्यातलाच आहे. आधीच सध्याचे सरकार हिंदुत्ववादी म्हणून टीकापात्र होते आहे. आधी विकासाच्या वाटेवर पुरेशी चाल होअूदे, मग सावकाशीने असले अस्मितेचे मुद्दे काढत बसावेेत. रस्ते, शेती, अूर्जा असे प्रश्न सोडविण्यासाठी प््रााधान्य असले पाहिजे. आितिहासापासून हे शिकायचे असते. नावे बदलण्याने आितिहास पुसला जात नाही. जिन्हांनी सर्वांच्या बरोबरीने `अखंड हिंदुस्थान'च्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. फाळणीला कारणे वेगळी आहेत, ती आता विसरावीत हे बरे! सामाजिक सलोखा ही आजची खरी गरज आहे.
-सतीश पटवर्धन, कागवाड
(हे पत्र पोचल्यानंतर दि.१७ मे२०१८ रोजी प्रा. सतीश विनायक पटवर्धन यांचे ७९व्या वर्षी निधन झाले. त्यांनी नेत्रदान व देहदान केले.) 
-जयश्री पटवर्धन, र्कागवाड (ता.अथणी)  फोन-७४०६९८३२७३


आठवांचे साठव
मुद्रणकलेचे (बाळू)काका
ऑफसेट छपाआीचं तंत्र आमच्याकडं १९८१ साली आलं. त्यातलं ओ की ठो माहीत नव्हतं. मुंबआीच्या ज्या स्विफ्ट कंपनीचं मशीन घेतलं त्यांच्याकडून प्रारंभी भरघोस आश्वासनं देण्यात आली होती, पण मशीन आम्ही खरेदी केल्यावर विक्रीनंतरची सेवा समाधानकारक नव्हती. आपल्याकडं ती अपेक्षितच नसते, आम्हीही फार अपेक्षा केलेल्या नव्हत्या. कारण अशी सेवा मिळण्याबाबत हेच चालतं असं आम्ही समजून होेतो. त्यामुळं या सगळयातील गोम आत्मसात होण्यासाठी आपल्याला गिच्चे घालावे लागणार हे मान्य होतं, पण ते अेवढ्या कमालीच्या टोकाचे घालावेे लागले हे जरा जास्तच झालं. आमची दमछाक होत होती. पण आम्ही लढत होतो. अनेक प्रयोग करत होतो. त्यात पैसे मिळत नव्हते, पण अुड्या मारणं चालू होतं. असं म्हणतात की, संधी कधी सोडायची नसते, `संधी दिसली की घे अुडी' असं करावं लागतं. पण मग ती संधी आलेली ओळखायची कशी? -त्याचं अुत्तर म्हणजे अुड्या मारत राहायचं; जी अुडी यशस्वी होते, ती संधी असते..! आम्हाला त्याचा प्रत्यय येत होता. आम्ही अुड्या मारत राहिलो, त्यातली कोणतीच अुडी संधी ठरली नाही. तरीही अनुभव खूप आले हे काय कमी? नाहीतरी आयुष्य शिकत राहण्यासाठीच असतं ना; पैसा काय आज आहे अुद्या नाही... हे  तत्वज्ञान आम्हाला नाआिलाजानं सुचायला लागलं.
हे नवे तंत्रज्ञान शिकण्यात आम्हाला ज्यांनी सर्वतोपरी मदत केली, ते भले गृहस्थ म्हणजे पुण्याचे बाळूकाका दाते. `कलाभुवन' हा त्यांचा ब्लॉक मेकिंग स्टुडिओ होता. त्याला नव्या तंत्राची जोड त्यांनी दिली होती. निगेटिव्ह-पॉझिटिव्हज् करून त्याच्या प्लेट्स तयार करण्याची त्यांची `कलासेवा' होती. आमच्या बाबतीत त्यांचे काम खरोखरीच `कलासेवा' होते. कोणतीही गोष्ट आमच्यासाठी ते कौतुकानं, समजावणीनं, तत्परतेनं करीत असत. पैशाचं कधी विचारायचेच नाहीत; आम्ही देअू तसे तेव्हा चालायचे.
आितकेच नव्हे तर त्यांच्या पुणेरी घरी मलासुद्धा प्रवेश होता. काकू अगत्यानं पण पुणेरी शैलीनं वडी लाडू द्यायच्या. माझा मुक्काम साधारणत: अुद्यान कार्यालयाच्या वरती खोलीवर असायचा. काम वेळेत न संपता माझा मुक्काम पडणार असा अंदाज आला की काका विचारायचे, `काय चंद्रशेखर, आज संध्याकाळची पुडी कुठं आहे?' माझी दाढी आणि चेहरेपट्टी बघून त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्र्याचं नाव मला दिलं होतं. संध्याकाळचं माझं काही ठरलेलं नसायचं; मग तेच म्हणायचे, `मग चला अमूक तमूक कडं जाअू.' त्या वेळी तळजाआी डोंगरावर संघाचं महाशिबिर घेण्याची तयारी चालू होती, तिकडं अेकदा दोनदा चक्कर टाकली, अेकदा बापूसाहेब भिशीकर यांच्या घरी गप्पा झाल्या. दोनदा मोतीबागेत त्यांचे चुलतभाअू दामूआण्णा दाते यांच्याकडं बसलो. चं प भिशीकर हे स्टुडिओच्या सुटीची वेळ गाठून बाळूकाकांकडं येत, तिथं त्यांचा अड्डा जमायचा, त्यात मला कधीतरी घेत. बऱ्याचदा त्यांच्याच घरी कॉफीपान होत असे. त्यांच्याकडं राहिलेले संघप्रचारक भागवतकाका यांच्या मठीत मी अेका रात्री राहिलो होतो. दातेवाडीतल्या समोरच्याच भागात कृष्णशास्त्री अर्जुनवाडकर यांचं कार्यालय होतं, तिथं अेकदा त्यांची कॉफी झाली. दातेवाडीचे तीन भाग होते; त्यात अेकीकडे तेजस, अेकीकडे ओजस अशी नावं होती. मी बाळूकाकांना विचारलं, `आिकडं ओजस -आिकडं तेजस, मग तुमची बाजू?' ते पट्कन् म्हणाले `भंकस!' भारतीय विचार साधना या संघ-प्रकाशन विभागाचे बाळूकाका पदाधिकारी होते,तिथं प्रथम मी त्यांच्याच बरोबर गेलो; आणि नंतरच्या काळात मी `त्या' संदर्भातलं पुस्तक संपादन केलं ते आवर्जून त्याच संस्थेकडं प्रकाशनासाठी (प्रयत्नपूर्वक) दिलं. अेकदा तर कुठं जावं हे ठरलेलं नसताना बाळूकाका म्हणाले, `कोणी रूपाली दीपाली वैशाली भेटते का पाहूया.' ही नावे फर्गसन कॉलेजसमोरच्या कॉफीगृहांची, तिथं जाण्यासाठी बाळूकाकांची `कायहो' असायची, हे नावही त्यांनी आपल्या कायनेटिक होंडाचं लघुरूप केलेलं. अशा ठिकाणी गेलं की, पुण्याच्या `आतलं बरच काही' मला समजून येत असे. अेकंदरीत त्यांच्याशी माझे नाते सच्च्या सक्ख्या काकासारखे होते.
त्यांच्या स्टुडिओत फारसा कुणाला प्रवेश नसे, पण मला मुक्तद्वार होतं. दुपारच्या सुटीत त्यांचे जोशी गोखले पाटणकर वगैरे कर्मचारी पुणेरी रिवाजाप्रमाणं वामकुक्षीसाठी गारव्याला आडवे झालेले असत, त्यांना मी जाअून अुठवत असे आणि मैत्रीनं लवकर कामाला लावत असे. त्याला बाळूकाकांची संमती असायची. तांत्रिक दृष्ट्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या तालमीत शिकायला मिळाल्या. पण त्यांनी कधीही अनैतिकपणाला मलाही थारा दिला नाही. सुरुवातीला अेक क्रॅलंेडर छपाआीचं काम मी घेतलं आणि त्याच्या प्लेट्स बनवायला बाळूकाकांकडं गेलो. तिथं त्याच पध्दतीची कुणा दुसऱ्या ग्राहकाची क्रॅलेंडरं प्लेटांसाठी आली होती. साहजिकच मला वाटलं, त्यांच्या निगेटिव्हज् वापरून मी प्लेटा केल्या तर माझा मोठा खर्च वाचेल. त्यांना तशी विनंती केल्यावर बाळूकाकांनी ती थेट नाकारली. माझ्या कामासाठी मला वेगळे डिझाआीन करून न्यावे लागले, त्याचा खर्च करावा लागला. मला योग्य धडा आयुष्यासाठी शिकता आला.
त्याचा परिणाम आयुष्यावरच झालेली अेक कथा सांगण्याजोगी आहे. सांगलीच्या अेका व्यापाऱ्याचा खाद्यतेलविक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या मोठ्या डब्यांवर चिकटविण्यासाठी साधारण नअू आिंच मोठी लेबले आमच्याकडं छापायला आली. त्याची सारी डिझाआीन प्रक्रिया करून प्लेट्स तयार केल्या आणि सत्तर पैशाला अेक याप्रमाणे ५० हजार लेबलांची ऑर्डर पूर्ण केली. नंतर तेच काम आणखी दोनतीनदा मिळाले, तेही पूर्ण केले, त्याचे पैसे मिळाले. नंतर अेके दिवशी सातारा जिल्ह्यातील अेक तेलव्यापारी भल्या सकाळी आमच्याकडे आले आणि त्यांची `तश्शीच' लेबले छापण्याची ऑर्डर द्यायची म्हणाले. फक्त खाली त्यांचे नाव टाकायचे, बाकी डिझाआीन तेच. थोडक्यात म्हणजे हा नकली (डुप्लीकेट) लेबलांचा अुद्योग करायचा होता. त्यांनी त्यासाठी प्रलोभने दाखविली आणि त्याचा दरही वाढवत नेला. हळूहळू सत्तर पैशाचे लेबल सात रुपयाला घेण्याची त्यांनी तयारी दाखविली, अशी १० हजार लेबले त्यांना हवी होती.  -म्हणजे सात हजाराअैवजी आम्हाला सत्तर हजार मिळणार होते. ऑफसेट तंत्राचा हा फायदा आम्हाला माहीत नव्हता, पण त्या मोहाविरुध्द निर्णय घेण्यासाठी बाळूकाकानी घालून दिलेले अुदाहरण आमच्यापुढे होते.माझ्याही  नकळत अेखादी बाब अव्यवहार्य अप्रामाणिक घडण्याची शक्यता वाटली तर बाळूकाका ती रोखत असत; आणि मी त्यांचं मनापासून मानत असे. म्हणूनच बहुधा त्यांनी मला अेवढी जवळीक दिली.

बारा मोटांची विहीर
सातारा भुआींज रस्त्याला अुजव्या बाजूस शेरी लिंब नावाचे गाव आहे. तिथे अेक शिवकालीन विहीर आहे. त्या काळातील स्थापत्यशास्त्राचे अेक अद्भुत अुदाहरण म्हणजे ही बारा मोटांची विहीर. ही विहीर आहे की भुयारी राजवाडा, असा प्रश्न पडेल.
विहिरीत अुतरण्यासाठी प्रशस्त जिना आहे. कमान असलेला भक्कम दरवाजा, मध्यावरती दुमजली महाल, आणि त्याच्या दोनही बाजूंस दोन विहिरी. अेका बाजूची मुख्य विहीर अष्टकोनी, आणि दुसऱ्या बाजूची जोडविहीर आयताकृती आहे. दोन्हींस जोडणारी आिमारत म्हणजे महाल आहे. साधारण शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर आहे.  अष्टकोनी विहिरीच्या आतील बाजूला चार वाघांची शिल्पे आहेत. जिन्यातून आत जाताना खाली अुतरण्याच्या चोरवाटा आहेत. त्या विहिरीवर बारा मोटांसाठी दगडी चौथरे (मोटवणे) दिसतात.
विहिरीचे बांधकाम १६४१ ते १६४६ या काळात झाले, श्रीमंत सौ.विरुबाआी भोसले यांनी ते केले. विहिरीची खोली ३५ मीटर (११०फूट), आणि व्यास १५ मीटर (५०फूट) आहे. आलीशान जिना अुतरून महालाच्या तळमजल्यावर पोचता येते. तिथून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी  दोन चोरवाटा आहेत. आिंग्रजी अेल् आकाराच्या जिन्याने वर गेल्यावर छोटेखानी महालात प्रवेश होतो. त्या महालाला चार खांब, प्रत्येक खांबावर शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान, त्याबरोबर गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र आहे. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराज आहेत. शिवाय नक्षी आणि फुले कोरलेली आहेत.या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास कमानीशेजारी दोन शरभशिल्पे आहेत.
अेवढे सारे अवशेष पाहून महालाच्या छतावर आले की सिंहासन आणि समेची बैठक व्यवस्थाा दिसते. साताऱ्याचे श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची गुप्त खलबते या महालात चालत असावीत. आितिहासातील ही विहीर तशी दुर्लक्षित राहिली याचे आश्चर्य वाटते.
-सुहास खानवलकर, पुणे, फोन नं. ९४० ३९२ ८५२०   (`विजयंत'वर आधारित)

जम्मूचे साठे 
सुसेरी या मूळ गावाहून वाआीमार्गे अुत्तरेत स्थलांतर झालेल्या साठे कुटुंबाचा आितिहास मोठा रोमहर्षक वाटतो. पेशव्यांच्या दिमतीस राहिलेल्या या कुटुंबातील भास्करराव साठे हे पानिपतच्या मोहिमेसाठी विश्वासरावांच्या फौजेसोबत १७६१ साली अुत्तरेत गेले. पानिपतच्या लढाआीत स्वत: विश्वासराव आणि सदाशिवराव संपले. सैन्याची पांगापांग झाली. महादेवभट्ट साठे हे दिल्लीत आले, जीव मुठीत घेअून जम्मूजवळच्या रामगढ येथे पोचले. तिथे महाराज रणजितसिंह यांना भेटले, त्यांच्या आदेशानुसार  तेथील शिवमंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहिले. परिस्थितीमुळे अेक सैनिक आपली तरवार म्यान करून धर्मकारणाकडे वळला.
त्यांच्या पुढच्या पिढ्या मात्र लष्करात रमल्या. महादेवभटांचे नातू सोनूसिंग हे ब्रिटिश फौजेत लेह लद्दाख सीमेवरती लेफ्टनंट होते. त्यांच्या पुढच्या पिढ्या काश्मीरच्या राजाकडे लष्करात तैनात होत्या. तेथून सातव्या पिढीतील कात्यायनीकुमार गौरीशंकर हे (१९१५ ते २००३) फाळणीच्या वेळी महाराजा हरीसिंग यांच्या फौजेत मेजर होते. पाकव्याप्त काश्मीर आपल्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते, पण ते घडले नाही. थोडक्यात असे की, जम्मूत असलेले हे साठे कुटुंब गेल्या २५० वर्षांच्या काश्मीर आितिहासाचे साक्षी आहे.
श्री.सुरेशराव साठे हे साठे न्यासाचे आणि कुलसंघटनेचे काम तडफेने करत असतात. त्यांना कै. कात्यायनीकुमार हे २००२मध्ये मुंबआीत समक्ष भेटले. कै.हेमंत जगदीशचंद्र हे जम्मूकर, मुंबआीच्या साठे विभागीय मेळाव्यात प्रमुख कुटुंबीय म्हणून आले होते. त्यांनी हा सारा आितिहास कथन केलाच होता. आज जम्मू शहरात त्यांच्या ९व्या १०व्या पिढ्या नांदत आहेत. राजतिलक रोडवर सब्जीमंडी भागात त्यांची तीन मोठी घरे आहेत. तिथे लवनीश, माधव, प्रणय हे स्वतंत्र व्यवसाय करतात. २००५मध्ये ठाणे येथील साठे संमेलनात विनोद भागवत प्रसाद हे अुपस्थित राहिले होते. जम्मूजवळ रामनगर येथे त्यांचे घर आहेे. वैष्णोदेवी यात्रेसाठी येथूनच जावे लागते. लवनीश यांचे अुधमपूरजवळ पटणी स्टॉप येथे शिवा आिंटर नॅशनल नावाचे हॉटेल आहे.
चिपळूणचे श्री.सुरेशराव साठे यांची कन्या सायली ही जम्मूजवळच्या नगरोटा येथे असते, जावआी स्वानंद दामले हेे गुप्तहेर खात्यात कर्नल आहेत. नुकतेच सुरेशराव हेे त्यांच्या कन्येकडे जम्मू भागात जाअून आले. तिथे वाढदिवस, बारसे आणि अन्य काही धार्मिक कार्यक्रम झाले. सुमारे २५ साठे मंडळी तिथे दिवसभराच्या कार्यक्रमासाठी जमली होती.
-(`साठे कुलवार्ता'. सुरेशराव साठे यांचा संपर्क : (०२०)२४३०२२०५)

कलावंताच्या लेखणीतून कलावती
कै.दत्तत्राय गणेश (द.ग.)गोडसे हे चित्रकार, नेपथ्यकार, कलासमीक्षक म्हणून प्रसिद्ध होते; तसेच ते आितिहास संशोधक, आणि साहित्यिक होते. बडोदे विद्यापीठात ते फाआीन आर्ट्सचे विभागप्रमुुख होते. मुंबआी विद्यापीठाच्या सौंदर्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांस ते चित्रकलेवर व्याख्याने देत. टाआीम्सच्या कलाविभागातही त्यांनी काही काळ काम केले. शंभरावर नाटकांसाठी त्यांनी नेपथ्य केले. चित्रपटक्षेत्रातही ते अल्पकाळ होते, आणि त्यांनी संगीतसाधनाही केली.
पेशवे काळातील मस्तानी हे अेक गूढ व्यक्तिमत्व जे अफवा, चमत्कार, सौंदर्य, प्रेम आणि विश्वास यांसाठी प्रसिद्धी पावले. द.ग.गोडसे यांनी `मस्तानी' या त्यांच्या पुस्तकातून तिच्याविषयी प्रश्नांची अुत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बाजीराव आणि मस्तानीची प्रेमकहाणी अनेक अर्थांनी चर्चेत असते. बाजीराव हा हिंदू चित्पावन ब्राह्मण कुळातील सेनानी; आणि मस्तानी ही बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची मुलगी. हा राजा हिंदू पण मुस्लिम स्त्रीपासून झालेली त्याची कन्या. मस्तानीच्या कारणावरून कौटुंबिक कलह आणि राजसत्तेची कर्तव्ये यांबाबत द्विधा मनस्थितीत बाजीरावांपुढे अनेक वितुष्टे आली.
मस्तानीसाठी प्रत्येक संस्कृती महत्वाचीच होती, त्या वातावरणात ती मोठी झालेली होती. ती कधी नमाज पढताना दिसते तर कधी कृष्णाची पूजा करताना दिसते. तिचे लावण्य, नृत्य,गायन, तिरंदाजी ही वैशिष्ट्ये आकर्षकच होती. तिला संतसाहित्याची जाण होती, आणि अुर्दू व कुराणाचा अभ्यास होता. बखरींतून तिच्याबद्दल काही संदर्भ आहेत, आणि कित्येक भाकडकथाही प्रचलित आहेत. त्या रहस्यांचा शोध गोडसे यांनी मस्तानी या पुस्तकातून घेतलेला आहे. १९८९ साली हे पुस्तक प्रकाशित झाले, ते आजही लोकप्रिय आहे. गोडसे स्वत: म्हणतात, `मस्तानी हे पेशवाआी काळातले धुके होत... अजूनही धुकेच आहे. धुक्यासारखेच धुंद, धूसर, भुरकट, अस्पष्ट!'

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन