सुख वाढण्याची कला ऊस तोड करण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा बीड-लातूर कडून कित्येक शेतमजूर पश्चिम महाराष्ट्नत येत असतात. त्यांनी दरवाढीसाठी आखडून धरले. संप-संघटना वगैरे नेतेगिरी झाली, साखर कारखाने खोळंबले. अशा वेळी काही गावातले शेतकरी सरसावले, त्यांनी आपापसात एकी केली. ऊसतोड करण्यासाठी टोळया तयार केल्या, एकमेकांच्या रानातला ऊस तोडायला सुरुवात केली. शेतकरीच होते, सवय मोडली होती पण फार अवघड गेले नाही. काम मार्गी लागले. ही कथा असेल आठ-दहा वर्षांपूर्वीची.
अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं टेबलावर विस्कटतात. `नको' म्हणायच्या आधीच वाटीभर मटकीउसळ ताटातल्या कोशिंबिरीवर पडते. जेवणारी बालकं, तरणी पोरं, बोळक्याच्या आज्ज्या यांचा मगदूर पाहून वाढायचं असतं. पात्री पानाचा दर सगळयांना सारखाच असला तरी आवड, भूक आणि जोश प्रत्येकाचा भिन्न असतो. एखादा तरूण आग्रहाची वाट पाहात असतो त्याचवेळी शेजारच्या भाताला ताक हवं असतं, पण दोघांच्याही समोर `पंचामृत' येतं. यावर नियंत्रण ठेवून एकाच सुरात `वदनी कवळ घेता' आणि एकाच तालात आपोष्णी व्हावी हे कौशल्य वाढप्याकडं असावं लागतं. कोणाला, कशाचा, किती आग्रह खपेल ते जाणून माणसं आकंठ तृप्त करावीत परंतु कोणाच्या ताटात कणभर वाया जाऊ नये हे तर `बेसिक' आहे.... हे सगळं शास्त्र कंत्राटी पोरं सांभाळू शकत नाहीत. अशा जेवणांतून ढेकर येण्याऐवजी कढ येतो.
अशा कार्यक्रमात लफ्फेदार बाया अन् झब्बेधारी पुरुष वावरतात. त्यांना ही जाणीव झाली तरी `हो ना; पण करणार काय!' अशीच आळवणी चालते. त्यांनी दोन तीन पंगती वाढायला घेण्यास काय हरकत आहे? `सवय नाही, वेळ नाही...' वगैरे कौतुकं खरी नव्हेत. आख्ख्या मंडपगर्दीत चारजणी आणि चारजण सहज तयार होतील. `पुढच्यां'ना सराव मिळेल. पैसे वाचविण्याचे राहू दे, पण पंगत अधिक चांगली होईल ना!
गल्ली किंवा सोसायटीची स्वच्छता अशीच एकत्रित करता येईल. बालवाडी वा अंगणवाडीसाठी `योग्य' मावशा आज उपलब्ध नाहीत. आयांनी किंवा आजी-आजोबांनी हे काम एकत्रित करता येईल; बऱ्याच मुलांना एकत्रित शाळेत नेता-आणता येईल. मनासारखं गणपती-अभिषेक-पूजा करता येईल. `कमी तिथं आम्ही' म्हणत पुढं येण्यानं सहजीवन सुखद होईल.
त्यासाठी परस्परांना विचारावं लागेल, एकत्रित वावरावं लागेल, अधिक चांगलं व्हावं - आणि ते आपण करावं - अशी ऊर्मी असावी लागेल. पुढचं सगळं सोपं होईल. परंतु हेच जमणं शक्य नाही असं मानलं तर मग जो जे ताटी वाढेल तसं मुकाट्यानं गिळावं लागेल. आपल्या अडचणींवर तर पुष्कळांची पोटं वाढत असतात!
अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं टेबलावर विस्कटतात. `नको' म्हणायच्या आधीच वाटीभर मटकीउसळ ताटातल्या कोशिंबिरीवर पडते. जेवणारी बालकं, तरणी पोरं, बोळक्याच्या आज्ज्या यांचा मगदूर पाहून वाढायचं असतं. पात्री पानाचा दर सगळयांना सारखाच असला तरी आवड, भूक आणि जोश प्रत्येकाचा भिन्न असतो. एखादा तरूण आग्रहाची वाट पाहात असतो त्याचवेळी शेजारच्या भाताला ताक हवं असतं, पण दोघांच्याही समोर `पंचामृत' येतं. यावर नियंत्रण ठेवून एकाच सुरात `वदनी कवळ घेता' आणि एकाच तालात आपोष्णी व्हावी हे कौशल्य वाढप्याकडं असावं लागतं. कोणाला, कशाचा, किती आग्रह खपेल ते जाणून माणसं आकंठ तृप्त करावीत परंतु कोणाच्या ताटात कणभर वाया जाऊ नये हे तर `बेसिक' आहे.... हे सगळं शास्त्र कंत्राटी पोरं सांभाळू शकत नाहीत. अशा जेवणांतून ढेकर येण्याऐवजी कढ येतो.
अशा कार्यक्रमात लफ्फेदार बाया अन् झब्बेधारी पुरुष वावरतात. त्यांना ही जाणीव झाली तरी `हो ना; पण करणार काय!' अशीच आळवणी चालते. त्यांनी दोन तीन पंगती वाढायला घेण्यास काय हरकत आहे? `सवय नाही, वेळ नाही...' वगैरे कौतुकं खरी नव्हेत. आख्ख्या मंडपगर्दीत चारजणी आणि चारजण सहज तयार होतील. `पुढच्यां'ना सराव मिळेल. पैसे वाचविण्याचे राहू दे, पण पंगत अधिक चांगली होईल ना!
गल्ली किंवा सोसायटीची स्वच्छता अशीच एकत्रित करता येईल. बालवाडी वा अंगणवाडीसाठी `योग्य' मावशा आज उपलब्ध नाहीत. आयांनी किंवा आजी-आजोबांनी हे काम एकत्रित करता येईल; बऱ्याच मुलांना एकत्रित शाळेत नेता-आणता येईल. मनासारखं गणपती-अभिषेक-पूजा करता येईल. `कमी तिथं आम्ही' म्हणत पुढं येण्यानं सहजीवन सुखद होईल.
त्यासाठी परस्परांना विचारावं लागेल, एकत्रित वावरावं लागेल, अधिक चांगलं व्हावं - आणि ते आपण करावं - अशी ऊर्मी असावी लागेल. पुढचं सगळं सोपं होईल. परंतु हेच जमणं शक्य नाही असं मानलं तर मग जो जे ताटी वाढेल तसं मुकाट्यानं गिळावं लागेल. आपल्या अडचणींवर तर पुष्कळांची पोटं वाढत असतात!
Comments
Post a Comment