Skip to main content

lekh in 1 oct 2012


व्यक्तीची सामाजिक जाणीव

या समाजाचे आपण काही देणे लागतो ही गोष्ट प्रत्येकाला मान्य असते, परंतु आपले देणे आपल्या घेण्यावरती अवलंबून राहू नये तसेच आपल्यावरचे समाजऋण जशाच्या तशा पद्धतीनेच शंभर टक्के फेडणे शक्य नसते. व्यवहारात जशास तसे हा न्याय आपण उपयोगात आणू पाहतो तसे समाजऋणाच्या बाबतीत होत नाही. एका माणसाला एका स्कुटरवाल्याने धक्का दिला आणि त्याचा पाय मोडला. दुसऱ्या एकाने त्याला दवाखान्यात नेलं, औषधपाणी केलं, घरी कळवलं, खूप मदत केली. या ऋणाची परतफेड करायला हवी म्हणून या पेशंटने बरे झाल्यानंतर स्कुटर बाहेर काढली आणि त्या उपकारकर्त्याचा शोध घेऊन त्याला धडक दिली. नंतर दवाखान्यात वगैरे नेलं. अशा पद्धतीने ऋण फिटत नाही. त्यासाठी अपघाताने अडचणीत सापडलेल्या दुसऱ्या कोणालाही मदत केली पाहिजे.
धर्म तरी वेगळे काय सांगतो? स्वत:शिवाय दुसऱ्याच्या हितासाठी आपण जे करतो ते म्हणजे धर्म. आपण स्वत:साठी घर बांधतो पण इतर गावातला कुणी पांतस्थ येईल त्याला राहण्यासाठी काही व्यवस्था आपण केली की ती धर्मशाळा होते. स्वत:च्या भविष्यासाठी आपण पैसे बाजूला ठेवतो, पण दुसऱ्यासाठी काही पैसे बाजूला ठेवले तर ते धर्मादाय होतात. स्वत:सह इतरांच्या कामासाठी श्रम करणे, पैसा देणे म्हणजे सामाजिक कार्य - म्हणजे धर्म. त्यासाठी संस्कारांची गरज असते. हे संस्कार होण्याच्या तीन जागा आहेत - घर, समाज आणि शाळा. दोष इतरांच्यात आहेत असे आपण धरून चालतो. व्यक्तिगत स्वत:ला वगळून समाज होत नाही.  व्यक्तीची उन्नती तेव्हाच होते जेव्हा ती स्वत:ला `माझे समाजासाठी काही योगदान दिलेच पाहिजे' असे मानते. व्यक्ती आणि समष्टी यांचे नाते असे असते. समुद्र असेल तरच लाटा तयार होतात. या लाटांमुळे आपल्याला समुद्राची जाणीव होते. आपण व्यवहाराशी जास्त निगडित राहतो. वस्तूची किंवा श्रमाची किंमत ठरवून ती देऊ पाहतो. पण त्याचे मूल्य जाणून घेतले पाहिजे. चोरीचा माल विकत घेतला तर त्याची किंमत दिल्याचे समर्थन करता येईल पण त्याचे मोल भलतेच महाग पडेल. इथे व्यक्तिगत व्यवहाराचा समाजाशी संबंध येतो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन