Skip to main content

Posts

2Feb.2015

श्रीपाद जोशी, जत यांचे सावंतपूर वसाहत (किर्लोस्करवाडी) येथे श्री गणेश मंदिरात `गदिमा' या विषयावर अलीकडेच व्याख्यान झाले, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत. गदिमांना उत्तरायुष्यात मान-प्रतिष्ठा मिळाले तरी त्यामागे पूर्वायुष्यातील खडतर परिश्रम उभे होते याची; तसेच त्यांच्या आयुष्यातील हृद्यतेची जाणीव करून देणारे भाष्य - ....गदिमांचा काळ.... ग.दि.माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ला झाला. त्यांच्या मातोश्री बनूताई, आटपाडी तालुक्यातील शेटफळे या त्यांच्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या होत्या. चव्हाणांच्या वाड्यात त्यांचे कुटुंब होते. बनुताइंर्ना प्रसूती वेदना सुरू झाल्या. बनूताइंर्ची प्रसूती झाली, पण जन्मत: बाळाने टॅं%ह करायला हवे, तसे झाले नाही. बाळ मृत जन्मले की काय, या शंकेने तगमग उडाली. परसात खड्डाही खणण्यात आला. रडारड सुरू झाली. तेवढ्यात गावातील एक चलाख सुईण धावत आली. तिने सर्व प्रकार पाहिला, आणि बनूताइंर्ना सांगितले, `तुझी बांगडी फोड.' बांगडी फोडणे सवाष्ण स्त्रीला अशुभ असते. सुईण म्हणाली, `मी सांगते तसं कर!' बांगडी फोडली. फुटक्या बांगडीचे एक टोक पोटात वारेमध्ये खुपसले. वार बाजूल...

26jan2015

वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा, भटवाडी-सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) अठराव्या शतकाच्या अखेरी (१८५४) इंग्रज शासनाने सार्वत्रिक शिक्षणाचा कायदा पास केला. व्ह.फा. किंवा मुलकी परीक्षा पास झाला की बव्हंशी तरुणांना नोकरीची हमी असे. गावात ब्राह्मणेतरांकडे दक्षिणा किरकोळ मिळे. अर्ध्या पैशाचे नाणे, पै चे नाणेही होते. बारीक सारीक कामाला याहून अधिक दक्षिणा नसे. खेड्यापाड्यातला पुरोहितवर्ग गरीबच राहिला. कोणाची बायको म्हणे, `बाजारात, नवे हरभरे आले हात...' यजमान लगेच टिणके `हवेत कशाला हरभरै? आमचें कुळीथ हात तेच बरें!' खेड्यापाड्यांतून अशीही काही घराणी होती, त्या घराण्यांतून वेदपठण तर होत असे, शिवाय शास्त्र, वैद्यक, व्याकरण, ज्योतिष आणि सुंदर हस्ताक्षरात पोथ्या लिहिण्याचे काम अशी सरस्वतीची आराधना होत असे. वालावल गावात उपाध्यांचे घराणे, पुराणिकांचे, भागवतांचे, बिबवण्यात धुपकरांचे, माणगावात साधले, कोनकर, टेंब्ये अशी बरीच घराणी विद्वत्ता सांभाळून होती. त्यातलेच एक सावंतवाडीतील अळवणी यांचे घराणे. सावंतवाडी नगरीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा निघाल्या. अधिपती श्रीमंत श्रीराम सावंत भोसले यांनी आपला मनोदय...

12 - 19 Jan 2015

संगीतोपचार (म्युझिक थेरपी) नाहं वसामि वैकुंठे, योगीनां हृदये, रवौ, मद्भक्ता: यत्र गायन्ती, तत्र तिष्ठामि नारद ।। भगवंतांनी नारदांना सांगितले, ``माझे भक्त जिथे संगीत भजन करत असतील तिथे मी असतो. (मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात, सूर्यबिंबात असत नाही; तरी माझे भक्त जिथे गायन करत असतात तिथे मात्र मी निश्चित सापडेन.) मानवाच्या गळयाला गाण्याचा लळा मुळापासूनच होता, म्हणून त्याने ऋग्वेदाला सामवेदाचे माधुर्य प्राप्त करून दिले. महाराष्ट्नत जात्याच्या घरघरीसंगे गाणे उमटायचे, तेव्हा कुठे पहाट फुटायची. निरक्षरांच्या अंत:करणातूनही समयस्फूर्त अक्षरांच्या लडी उलगडायच्या. त्यांतून ओवी हा काव्याचा पहिला प्रकार उमटला.छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे गीत. ओवी हे पहिले गीत, नंतर अभंग. ज्ञानेश्वरांच्या गीतप्रभेने उजळलेल्या कित्येक रचना, हरिपाठाचे अभंग, गौळणी, विराण्या इत्यादी प्रतिभासंपन्न संगीतकारांच्या नजरेस पडल्या. त्यातील आशयाचे मर्म त्यांना उलगडले. त्यावर अतिशय सहृदयतेने अनुरूप असा स्वरांचा साज त्यांना चढवता आला. परिणामी ही गीते कानाकानांतून मनामनांत जाऊन पोचली. संगीत हे दैवी पोषण आहे. त्यायोगे मानसि...

5 Jan.2015

दि.२५ डिसेंबर २०१४ रोजी बलवडी (भाळवणी) ता.खानापूर येथे स्थानिक साहित्य संमेलन झाले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी प्रगट केलेल्या मनोगताचे संकलन..... अनुभव घ्या, चिकित्सा करा येरळा नदीकाठच्या या संमेलनाविषयी माझ्या मनांत वेगळेच ममत्व आहे; कारण माझी वडिलोपार्जित शेती याच येरळेच्या काठी थोड्या अंतरावर आहे आणि या नदीचे पाणी पिऊनच माझे बालपण गेले आहे. जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही काही सन्मान प्राप्त झाला तरी, स्वत:च्या घरातील कौतुकाचा सोहळा म्हणून मला आजच्या सन्मानाचा विशेष आनंद होत आहे. प्राचीन वाङ्मय सोडल्यास मधल्या प्रदीर्घ काळात ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लिखित स्वरूपात साहित्यनिर्मिती झाली नसेल. शेकडो वर्षे ग्रामीण भागातील बहुजन समाज शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहिला. पण त्याच्या अंत:करणातील ऊर्मी दडपून राहिली नाही. ती वेगळया माध्यमांतून प्रगट झालीच! कधी ती जात्यावरील ओव्यांच्या रूपाने प्रासादिक स्वरूपात प्रगटली, कधी मोटेवरच्या किंवा औतावरील गाण्याच्या रूपाने प्रगट झाली. ते खरेखुरे आणि अस्सल साहित्यच होते. लिखित स्वरूपात नसल्याने पाठांतरातून ते एका पिढीकडून ...

29 Dec.2014

शिकू आनंदे २०१४ लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टचा `शिकू आनंदे' हा कार्यक्रम २ ते १३ डिसेंबर या कालात राबविला गेला. त्याचा सांगता समारंभ १४ डिसेंबर २०१४ रोजी उत्साहात पार पडला. १४ तारखेला सकाळी ११ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी संपला. `शिकू आनंदे'ची टीम शंभरपेक्षा जास्त शाळांमध्ये हा विषय पोचवण्यासाठी आधीचे १३ दिवस दररोज शाळाशाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घेत होती. खरं तर तो त्याही आधी काही महिने सुरू झाला होता जेव्हा ज्ञानप्रबोधिनीच्या श्री.पोंक्षे सरांशी चर्चा होऊन आनंददायी शिक्षण हा विषय लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टने या वर्षीसाठी निवडला. मग त्याची संकल्पना मनात स्पष्ट होणं, या विषयातली शिक्षक, पालक, विद्यार्थी प्रत्येकाची भूमिका नक्की होणं, त्याचा सविस्तर अभ्यासक्रम म्हणता येईल अशी टिपणं तयार होणं, १०७ शाळांमध्ये वक्ते म्हणून काम करू शकतील अशी मंडळी शोधणं, त्यांची प्रशिक्षणं, त्यासाठी साहित्य, शाळांची निश्चिती, वेळापत्रक, प्रवासाची रचना अशी शेकडो कामं तयारीच्या दिवसात मार्गी लागली. १४ तारखेचा समापनाचा कार्यक्रम सर्वांसाठी एकत्रित पण तीन वेगळया सत्रांमध्ये योजिला होता. त्यासाठी त्या...

22 Dec.2014

अ नु ग्र ह तालुक्याला तासाभराचे काम होते. बसमधून उतरलो. तहसील कचेरीतून एक सही-शिक्का घ्यायचा आणि मिळेल त्या एसटी-बसने परतायचे असे नियोजन होते. बसस्टँडच्या बाहेर आलो, तो निदान शंभरभर भाविकांचा समूह घोळका करून उभा होता. कोणाच्या हाती पुष्पगुच्छ होते, कोणाच्या हाती फुलांच्या माळा. सगळयांच्या चेहऱ्यावर लीन भक्तीभाव-आतुरता, विनम्रता. कानावर होते की आज कोणातरी साधु महाराजांचे आगमन होणार. गर्दीतून माझ्या दिशेने शिवराम मुळीक झेपावला. कमरेत किंचित वाकून त्याने अभिवादन केले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. माझा हात हाती घेत शिवराम उत्स्फूर्तपणे म्हणाला, ``या या साहेब! बघा कसे नेमक्या वेळेत, देवासारखे आलात. तुम्ही हो-नाही करत होतात, पण बघा बरं, गुरुरायांनी तुम्हाला नेमके कसे भाग पाडले? अहो त्यांची करणी अगाध आहे. तुम्ही कितीही टाळले तरी गुरुरायाचा आदेशच तो....'' शिवराम काय बोलतो आहे याचा मला काहीही अर्थबोध होईना. ओझरतं आठवलं की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, ``दादा, सोमवारचा दिवस राखून ठेवा. गुरुरायाचे आगमन होणार आहे. आपल्याला दर्शनाला जायचं आहे.'' नुसत्या गुरुर...