Skip to main content

Posts

24 Nov.2014

अमेरिकेतील सुखान्त अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर हॉस्पिस (हॉस्पीटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंतकाळ जवळ आलेला असतो अशांना `हॉस्पिस'मध्ये ठेवतात. अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांत व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. अमेरिकेतील हॉस्पिसमध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री-अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने ...

17 Nov.2014

स्वत:ला शोधताना निवृत्त झाल्यानंतर वर्षभरातच सचिनने  'झश्ररूळपस खीं चू थरू' हे आत्मचरित्र साजेशा दिमाखात, गाजावाजा करत `बाजारात' आणलं; सचिनच्या विक्रमांना साजेशी तडाखेबंद नोंदणीही झाली. हे पुस्तक आकडेवारीचे काही विक्रम नोंदवेल. अनेक सचिनप्रेमींनी पुस्तकासाठी प्रयत्न केले, पण बहुतेकांची निराशा झाली. तरीही `बाजारा'च्या नव्या तंत्रानुसार पुस्तकाची परीक्षणं मात्र पुढच्या दोन-तीन दिवसातच धडाधड यायला लागली. `हे पुस्तक, सचिन कसा घडला या बाबतीत ठार निराशा करतं,' `हे पुस्तक म्हणजे निव्वळ मॅचेसची वृत्तांकनं-आकडेवारी याची जंत्री आहे', `याला साहित्यिक मूल्य मुळीच नाही', `अनेक अप्रकाशित घटनांवर प्रकाश टाकणारे', `अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करणारे'.... अशी मते व्यक्त होऊ लागली. या सर्वाचा पुस्तकाच्या खपावर परिणाम होणार नाही, कारण सचिनविषयीचे प्रेम, कौतुक याबरोबरच त्याच्या उत्तुंग कारकीर्दीबद्दल आणि त्याच्या संयमी व्यक्तिमत्त्वाबद्दलचे कुतुहल. क्रिकेटचे दर्दी वा जाणकार नसलेल्यांना विविध खेळाडू, प्रशिक्षक, संघनायक यांच्याविषयी विधानांबद्दल रस नसेल. ही सगळी मते त्यान...

4Nov.2014

न र्म दे ह र ! आम्ही उभयतांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली. साधारणपणे ३२०० किमी. अंतर चालण्यास १२५ दिवस लागले. केवळ नर्मदा मैय्याच्या कृपेमुळेच ही परिक्रमा कोणतीही अडचण न येता व त्रास न होता आनंदाने पूर्ण झाली. म्हणतात ना, `मूकं करोति वाचालं पङ्गुं लंघयते गिरिम् ।       यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ।' नर्मदा मैय्या उजव्या हाताला ठेवून तिच्या तीरावरून पूर्ण प्रदक्षिणा घालणे म्हणजे परिक्रमा. साधारणपणे मध्यप्रदेशमधील आेंकारेश्वर तीर्थक्षेत्रातील गोमुख घाटावर परिक्रमेचा संकल्प करून, अंकलेश्वर मार्गे कठपोरला समुद्र पार करणे, मीठीतलाईपासून उत्तर तटावरून गरुडेश्वरमार्गे अमरकंटकला जल अर्पण करणे व ज्या कुंडातून मैय्या उगम पावली आहे त्या कुंडातील जल घेऊन परत दक्षिण तटावरून होशंगाबादमार्गे आेंकारेश्वर गोमुख घाटावर परिक्रमा पूर्ण होते. मग मैय्या ओलांडून आेंकारेश्वरला $ आकाराच्या डोंगराची म्हणजे `मधांताची' परिक्रमा करावी. घरी परतल्यावर आप्तेष्टांसमवेत मैय्या पूजन करून कन्या पूजन व महाप्रसाद करतात. परिक्रमेचे संकेत : चतुर्मासामध्ये परिक्रमा चालू ठेवता येत न...

8 Sept.2014

अचानक प्रगटणारी राजापूरची गंगा भारतातील सात पवित्र नद्यांपैकी गंगेला पहिला मान जातो. भगिरथ राजाने गंगेला हिमालयातून भूतलावर आणले म्हणून तिला `भागीरथी' म्हणूनही ओळखतात. राजा भगिरथाच्या अथक तपश्चर्येतून गंगा भूतलावर आली परंतु तिचा प्रवाह अतिप्रचंड वेगवान असल्याने भगवान शंकराने आपल्या मस्तकी जटेमध्ये तिचा स्त्रोत सामावून घेतला. सप्तधारा मार्गाने ती पृथ्वीतलावर अवतरली. गंगेचा उगम टेहरी गढवालमध्ये समुद्रसपाटीपासून १३,८०० हात उंच गंगोत्रीजवळ एका हिमनगामध्ये झाला. पौराणिक उल्लेखात त्याला `गोमुखी' म्हणतात. यामुन पर्वतापासून नंदादेवीपर्यंत गंगेचे प्रसवन्नक्षेत्र आहे. मंदरगिरी, यामुन, बंदरपूछ, द्रोणागिरी, घौलगंगा, विष्णुप्रयाग, नंदप्रभाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, गंगोत्री, ऋषीकेश, मिरत, रोहिलखंड, पुरुकबाद, अवध, प्रयाग, मिर्झापुर, वाराणशी, बलिया, पश्चिम बंगाल, अलमोडा, राणीखेत, नैनीताल, मध्यप्रदेश, अंतर्वेदी वगैरे भौगोलिक परिसर या प्रवाहाकाठी आहे. वाटेत शोणनदी, गंडकी, कोशी गाग्रा, पद्मा, ब्रह्मपुत्रा तिला येऊन मिळतात व तिचे पात्र महाप्रवण होते. पुढे या विशाल पात्रात मेघना नदी येऊन बं...

1Sept.2014

सोशल नेटवर्किंग माणूस जन्मजात समाजप्रिय प्राणी आहे. सामाजिकता ही त्याची स्वाभाविक गरज आहे. एखादा माणूसघाणा असला तरीही उर्वरित समाजाच्या सोबतीने तो त्याच समाजात वास्तव्य करत असतो, त्याच्याही नकळत! आदिमानवही टोळया करून राहायचा. यातून सामाजिकता जपण्याबरोबरच त्याला संरक्षणाची हमीही मिळे. पुढे माणूस प्रगत झाला तसा विवाहसमारंभ, सण-उत्सव अशा मोजक्या प्रसंगी सामाजिक अभिसरण घडून येऊ लागले. आज त्याची जागा सोशल नेटवर्किंगने घेतली आहे. अनेक परस्पर-आंतरक्रिया घडणारी सामाजिक संरचना म्हणजे सोशल नेटवर्किंग होय. आज आपल्या आयुष्यात याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याद्वारे लोक आपल्या मित्रपरिवाराशी त्याचप्रमाणे अन्य समूहांच्या सदस्यांशीही संपर्क साधू शकतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सगळे हल्ली या विषयाशी परिचित झाले आहेत. आपल्यातील सृजनाला लाखो प्रेक्षक मिळवून देणारा मंच म्हणूनही याकडे पाहता येईल. अत्यंत माहितीप्रचुर, करमणूकप्रधान आणि सजग करणारी अशी ही सामाजिक घटना आहे. आपल्या सभोवताली, एवढेच काय जगभरात चालणाऱ्या घडामोडी यातून क्षणार्धात आपल्यासमोर येतात. त्यातून आपले दृष्टिकोण प्रगल्भ ह...

21 August 2014

ओठापोटाचं जागतिकीकरण प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा आधार मानला जातो, तो म्हणजे स्वयंपाकाची साधने. त्या संस्कृतीच्या चालीरिती, प्रगती, भौगोलिक आणि सांपत्तिक परिस्थिती याविषयीचे अंदाज स्वयंपाकाच्या साधनांवरून बांधले जातात. कारण माणसाच्या खाण्याच्या सवयी आणि स्वयंपाकाची साधने ही शक्यतो बदलत नाहीत; आणि बदललीच तर त्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात असा पुरातत्त्व विद्वानांचा सिद्धांत आहे. विळीचं पातं स्थिर ठेवायचं आणि भाजी चिरणारा हात हालता ठेवायचा ही द्रविडी परंपरा आहे; तर भाजी हाताच्या मुठीत स्थिर धरून सुरीचे पाते हालते ठेवायचे ही म्हणे आर्यांची पद्धत आहे. सध्याच्या महाराष्ट्नचा विचार केला तर, कधी काळी हा महाराष्ट्न् भुईत गाडला गेल्यावर शेकडो वर्षांनी उत्खननात गावं, घरं सापडतील आणि त्यावेळी घरोघरी विळया पाहून `महाराष्ट्नत या काळात द्रविड संस्कृती होती' असा निष्कर्ष तेव्हाचे संशोधक काढतील. हे सारं एका भाषणात मी कधीतरी ऐकल्याचं आठवतं. त्या त्या ठिकाणचं हवापाणी, त्यानुसार निघणारी पिकं, फळं-भाजी हेच त्या गावचं प्रमुख अन्न असणार हे एकेकाळी ठीक होतं. निसर्गनियमाने तेच अन्...

18 August 2014

देशाची फाळणी स्वीकारून आपण १९४७ साली स्वातंत्र्य घेतले. त्यापाठोपाठच पाकिस्तानातल्या अत्याचारांत भाजून अनेक कुटुंबे विभक्त भारतात आश्रयाला आली. त्यापैकी सिंधूकाठचा सिंधी समाज बराचसा मुंबई व महाराष्ट्नत आला. त्यावेळी विस्थापितांच्या छावण्यात राहिलेले हे लोक अनंत उद्योग करत इकडे स्थिरावले. त्यांनी कधी कुणाकडे हात पसरला नाही, याचना केली नाही. चिकाटीने श्रीमंतीही  कमावली. फाळणीच्या आठवणी आता पुसायला हव्यात, तसेच या सिंधु समाजाकडून काही शिकावे. देशाच्या फाळणीतून जीवनाच्या जुळणीकडे सुमारे १५०० वर्षांपासूनच्या या समाजाच्या इतिहासावर ओझरती नजर टाकली तर असे म्हणता येईल की, आजच्या जमान्यात जगभरचा सिंधी समाज जेवढा सुखी आहे तेवढा या गतकाळात कधीच नव्हता. सिंध भूमीत राजा दाहिरसिंगाचा पराभव इ.स.७१२ मध्ये महंमद बिन कासीम या आक्रमकाने केला आणि त्यानंतर इथल्या यवन राज्यकर्त्यांना १८४३ मध्ये इंग्रजांनी पराभूत केले. तोवर म्हणजे सुमारे हजार-बाराशे वर्षे सुखस्वास्थ्याची झोप या भूमीला मिळू शकली नाही. या राजवटीत सिंधी लोकांच्या अंगी सुप्त राहिलेली शक्ती इंग्रजी राजवटीत बहरून येऊ शकली आणि जीवनाच्या अन...